Reshimbandh Class 12 Marathi Chapter 8 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 8 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 8 रेशीमबंध Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

रेशीमबंध 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 8 रेशीमबंध Textbook Questions and Answers

कृती

1. कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 5

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 6

प्रश्न इ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 7

प्रश्न ई.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 4
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 8.1

2. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न अ.
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण…
उत्तर :
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो; कारण नुकते कुठे तीन-साडेतीन वाजलेले असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न आ.
मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण…
उत्तर :
मानवाला निसर्गाची ओढ लागते; कारण माणसाच्या मनात आदिमत्वही भरून राहिलेले असते.

3. अ. पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

प्रश्न 1.
सायली –
उत्तर :
सायलीच्या इवल्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते.

प्रश्न 2.
गुलमोहोर –
उत्तर :
गुलमोहोराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी, केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 3.
जॅक्रांडा –
उत्तर :
जॅक्रांडाची निळीजांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पागोष्टी करत असतात.

प्रश्न 4.
चाफा –
उत्तर :
चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो; पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो.

आ. वर्णन करा.

प्रश्न 1.
उत्तररात्रीचे आगमन
उत्तर :
मध्यरात्र उलटली की उत्तररात्र हलकेच आकाशात पाऊल टाकते. उत्तररात्रीची पावले मुळातच मुलायम, त्यात ती रात्र आपली मुलायम पावले हळुवारपणे, अलगद ठेवीत येते. कुणालाही चाहूल लागणे कठीण. मात्र लेखकांचे उत्तररात्रीशी अत्यंत जवळिकेचे नाते आहे. त्यामुळे तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने लेखकांच्या मनात उमटत राहतात. लेखकांना झोप लागत नाही. आपली झोप जणू पूर्ण झाली आहे, असेच त्यांना वाटत राहते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 2.
पहाट व पाखरे यांच्यातील नात
उत्तर :
लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो. पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जणू एकमेकांना विचारताहेत, ” पहाट आली का? ” पहाटेचे हळुवार येणे पाहून लेखकांना वाटते की, पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते की, “मी येऊ का?” त्या दोघांमधले हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे.

इ. खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

प्रश्न 1.

  1. वृक्ष – …………..
  2. वेली – …………
  3. फुले – ………..
  4. पाखरे – ………….

उत्तर :

  1. वृक्ष – डोळा लागलेला असतो.
  2. वेली – डोळा लागलेला असतो.
  3. फुले – विसावलेली, सुखावलेली असतात.
  4. पाखरे – गाढ झोपलेली असतात.

4. व्याकरण.

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
मन समेवर येणे-
उत्तर :
अर्थ – मन शांत व एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे.
वाक्य – राहुल रात्रभर भरकटणारे मन प्रभातफेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले.

प्रश्न 2.
साखरझोपेत असणे-
उत्तर :
अर्थ – पहाटेच्या गाढ स्वप्निल निद्रेत असणे.
वाक्य – पहाटे मोहन साखरझोपेत असताना बाहेर पाऊस पडत होता.

आ. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

प्रश्न 1.
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला
उत्तर :
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 2.
निशिगंध म्हणजे निशिगंधच
उत्तर :
निशिगंध म्हणजे निशिगंधच!

इ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 9
उत्तर :
वाक्यप्रकार → उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी → वृक्षवेली आपल्याला तजेला आणि विरंगुळा देतात.

वाक्यप्रकार → विधानार्थी वाक्य
उद्गारार्थी → किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोल्हासाला!

वाक्यप्रकार → होकारार्थी वाक्य
नकारार्थी → वाफे तर ओले नाहीतच.

ई. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 10
उत्तर :

सामासिक शब्दसमासाचा विग्रहसमासाचे नाव
पांढराशुभ्रशुभ्र असा पांढराकर्मधारय
वृक्षवेलीवृक्ष आणि वेलीइतरेतर द्वंद्व
गप्पागोष्टीगप्पा, गोष्टी वगैरेसमाहार द्वंद्व
सुखदुःखसुख किंवा दुःखवैकल्पिक द्वंद्व

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

उ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.

  1. खिडकी हलकेच उघडतो.
  2. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.
  3. तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल.

उत्तर :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग

5. स्वमत.

प्रश्न अ.
‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?…’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
उत्तर :
उत्तररात्रीचे दृश्य खरोखरच विलक्षण असते. सर्वत्र, सर्व काही शांतनिवांत असते. दिवसा इकडेतिकडे सतत धावणारी, कोणती ना कोणती कामे करीत राहणारी, एकमेकांशी बोलणारी, एकमेकांशी भांडणारी, एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसे निवांत झोपलेली असतात. काहीजण दिवसा चिंतांनी ग्रासलेली असतात. काहीजण मिळालेल्या यशामुळे आनंदाच्या, सुखाच्या शिखरावर असतात. या सर्व भावभावना, सर्व सुखदु:खे उत्तररात्रीच्या क्षणांमध्ये विरून गेलेल्या असतात.

दुष्ट विचार, दुष्ट भावना आणि चांगल्या माणसांच्या मनातले चांगले विचार, चांगल्या भावना हे सर्व काही त्या क्षणी दूर निघून गेलेले असते. माणसे भांडतात तेव्हाचे त्यांचे भाव आठवून पाहा. सर्व त्वेष, द्वेष, राग, संताप उफाळून आलेला असतो. तीच माणसे उत्तररात्री या सर्व भावभावनांचे गाठोडे बाजूला ठेवून निवांत झालेली असतात. सज्जन व दुर्जन दोघेही शेजारी शेजारी झोपलेले असतील, तर त्यांच्यातला चांगला कोण व वाईट कोण हे नुसते पाहून ठरवताच येणार नाही. त्या क्षणी सर्वांचे मन निर्मळ, शुद्ध झालेले असते.

सर्व प्राणिमात्रांमध्ये, वनस्पतींमध्ये हाच शुद्ध भाव वसत असतो. आणि हा शुद्ध भाव अनादी काळापासून सर्वांच्या मनात वस्ती करून आहे. माणसाचे मन या मूळ भावनेकडेच धाव घेत असते. आदिम खूप खूप पूर्वीचे. ऋजू म्हणजे साधे, सरळ, निर्मळ, पारदर्शी. त्यात कोणतेही किल्मिष, वाईट भावनेचा लवलेशही नसतो. सगळ्यांच्याच ठायी हा भाव असल्याने सर्वजण एकमेकांशी हसतखेळत बोलू शकतात. एकमेकांच्या मदतीला धावतात. एकमेकांवर प्रेम करतात. त्या शुद्ध, निर्मळ भावनेने एकमेकांशी बांधले जातात. लेखकांना या वाक्यातून हेच सांगायचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न आ.
‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
लेखकांचे निसर्गाशी अत्यंत कोमल, हळुवार, नाजूक नाते आहे. त्यांच्या मते, सर्व माणसांचेच तसे नाते असते. या हळुवार, कोमल नात्याचे दर्शन लेखक या पाठात घडवतात. हे नाते रेशमासारखे तलम, मुलायम आहे. म्हणून ते रेशीमबंध.

हे रेशीमबंध लेखकांनी अत्यंत मुलायमपणे, हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत. नीरव शांततेत उत्तररात्र हळुवारपणे कोमल पावले टाकत येते. कोणाला चाहूलही लागत नाही. पण लेखकांच्या मनात त्या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात. त्यांचे मन तितक्याच हळुवारपणे ती स्पंदने टिपते. त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा रेशमी मुलायम पण इथे जाणवतो.

साखरझोपेत जग विसावलेले असते. साऱ्या काळज्या-चिंता मिटून गेलेल्या असतात. मन सुखदुःखांच्या पलीकडे गेलेले असते. एक निर्मळ, शुद्ध असे स्वरूप मनाला प्राप्त होते. निसर्गाचा आत्माच त्यात असतो. लेखकांचे नाते या निर्मळपणाशी, त्या आत्म्याशी जडले आहे. त्यांना त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा जाणवतो.

या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या आत्म्याशी, निर्मळपणाशी आहे. कोणालाही चाहूल लागू न देता पहाट अलगद अवतरते, पण लेखक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना चाहूल लागते. त्या अनोख्या, नाजूक, तरल क्षणाचा लेखकांना अनुभव येतो. बागेतल्या वृक्षवेलींच्या रूपांनी, त्यांचे विविध रंग व सुगंध यांच्या रूपांनी लेखकांना स्वत:चे आदिमतेशी असलेले नाते जाणवते.

या पाठात लेखक निसर्गाशी असलेल्या स्वत:च्या नात्याचा शोध घेत आहेत. स्वतः प्रमाणे सगळीच माणसे निसर्गाशी कोमल, नाजूक, हळुवार भावनांनी बांधली गेली आहेत. ते बंध सहजासहजी दिसत नाहीत; दाखवून देता येत नाहीत. ते सूक्ष्म, तरल, कोमल भावनांचे बंध असतात. ते रेशमाप्रमाणे तलम, मुलायम असतात. म्हणून लेखक या बंधांना रेशीमबंध म्हणतात. संपूर्ण पाठाच्या केंद्रस्थानी हे रेशीमबंधच आहेत. म्हणून या पाठाला रेशीमबंध’ हे शीर्षक खूप साजते.

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की, मला प्रचंड आनंद होतो. खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते, असे नाही. आमच्या वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणींना सहलीचा विषय आला की, अमाप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की, खूप आनंद मिळतो. नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते. तेच रानावनात भटकतानाही वाटत असते. झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा येतच नाही. हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते. हे असे का होत असावे?

वनस्पती या सजीव आहेत; त्यांना माणसांसारख्याच भावभावना असतात. वनस्पतींनाही आनंद होतो, दुःख होते. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला, तर त्याही सुखावतात, हे सर्व आता लहानथोरांपासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की, माणसे खवळतात. शहरात माणसाला स्वत:चे वृक्षप्रेम जपता येत नाही, म्हणून माणसे कुंड्यांमध्ये रोपटी लावतात आणि त्यांचा आनंद घेतात. अमाप वृक्षतोड होऊ लागली, तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमीने ‘चिपको आंदोलन’ उभारले. त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले, याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे. ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले, त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे. आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत. आपण, अन्य प्राणी आणि वनस्पती ही सर्व भावंडेच आहेत. आपणा सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे. निसर्गच आपले पालनपोषण करतो. तोच अन्नपाणी देतो. तोच हवाही देतो. आपल्याला तोच जिवंत ठेवतो. आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे. हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न आ.
डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.
उत्तर :
डॉ. यू. म. पठाण यांच्या भाषेचे सर्वांत पहिले जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी, सरळ, भाषा स्वतःचा अनुभव ते पारदर्शीपणे व्यक्त करतात. उत्तररात्रीचे आकाशात पडणारे पाऊल हळुवारपणे, अलगद, मुलायम, कुणालाही चाहूल लागू न देणारे’ असे असते. पावलाचा हळुवारपणा, नाजुकपणा, मुलायम पण त्या वाक्यातून सहज प्रत्ययाला येतो. उदा., उत्तररात्र प्रवेश करते, त्याचे वर्णन करणारे वाक्य पाहा – ‘उत्तररात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं येथे पाऊल ‘पडत’ नाही किंवा ‘टाकले जात नाही. उत्तररात्र ‘हलकेच पाऊल ठेवते’ अत्यंत योग्य अशा क्रियापद योजनेमुळे भाषेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा प्रत्यय येतो. वाचकाला ती भाषा भावते. हे एक उदाहरण झाले. पण संपूर्ण पाठभर अशी अनुभवाचा प्रत्यय देणारी भाषा आढळते.

लेखकांना सृष्टीतले मानवेतर घटक कोरडे, भावनाविरहित वाटतच नाहीत. ते त्यांना माणसांप्रमाणेच भावभावनांनी भिजलेले, सजीव, चैतन्यपर्ण वाटतात. ते घटक वर्णनामध्ये मानवी रूपच घेऊन येतात. म्हणून पाखरे ‘हळूहळू डोळे किलकिले’ करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना ‘खुणावतात ‘. पाखरे ‘कुजबुजली’. बोगनवेल ‘सळसळू’ लागते. दोन्ही वाफे ‘एकमेकांशी हितगुज’ करतात. मोगरा ‘खुदखुद हसतो’. तो कधी रुसून बसतो’. झाडे-वेली ‘भावुक होतात’ अशा रितीने सर्व घटक मानवी रूप घेऊन येतात. लेखन हृद्य बनते. लेखनातला अनुभव भावभावनांशी रसरशीत बनतो.

उत्तररात्री आगमन, सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले मन, त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा, पहाटेचे अलवार आगमन असे अत्यंत तरल, मुलायम, नाजूक अनुभव प्रत्ययदर्शी होतात. आणखी एक वैशिष्ट्य बघा. असं कोणतं बरं नातं’, ‘का बरं म्हटलं असावं’ ही शब्दरूपे पाहा. ही छापील वळणाची शब्दरूपे नाहीत. ही दैनंदिन जीवनातली बोलण्यातली शब्दरूपे आहेत. एखादा माणूस आपल्या जिवलग मित्राशी जिवाभावाच्या गप्पागोष्टी करीत बसला असावा, तसे हा लेख वाचताना वाटत राहते. म्हणूनच संपूर्ण लेखात भाषेला एक वेगळाच गोडवा प्राप्त झाल्याचे दिसून येते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न इ.
संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
उत्तर :
थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की, मनाला खूप आल्हाद मिळतो. शहरात आखीव रेखीव रस्ते आणि तशाच आखीव रेखीव इमारती. इमारतीतल्या प्रत्येक घराचा चेहरा सारखाच. याउलट, रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. तिथे एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते. एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. एक हिरवा रंग पाहा.

त्या एका हिरव्या रंगांच्या शेकडो छटांचे दर्शन तिथे घडते. हजारो आकार, हजारो रंग, हजारो आवाज, हजारो गंध. तिथे पंचेद्रियांच्या सुखाची लयलूट असते. किती विविधता! पक्षी, प्राणी, किडेमुंग्या यांच्या हजारो जाती. त्यांच्यातही रंग, आकार, हालचाली यांचे हजारो प्रकार. निसर्गातली ही विविधता मनाला मोहवते. मन त्या सौंदर्यात बुडून जाते. कृत्रिमतेची चढलेली पुटे हळूहळू गळून पडतात. मन मोकळे होते. सौंदर्याचा, आनंदाचा अनुभव घेऊ लागते.

तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला. माणसात असलेल्या सर्व कुभावनांपासून मुक्ती मिळावी; आपला आत्मा त्या कुभावनांपासून मुक्त व्हावा; ईश्वराचे निर्मळ, सोज्वळ रूप दिसावे; त्याच्याशी एकरूप होता यावे; म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपसूक मुक्त होते. मनाची ही अवस्था ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था. वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच, त्या रूपाच्या सान्निध्यात राहावे, षड्रिपू चा त्याग करावा म्हणजे आपण अलगद ईश्वराच्या जवळ जाऊन ठेपतो.

आपल्याला सर्व सुंदर, निर्मळ, चांगलेच दिसते. या चांगुलपणाचाच आस्वाद घेत राहावा, असे वाटू लागते. म्हणजे ईश्वराच्या दर्शनातच, त्याच्या स्मरणातच आकंठ बुडून जावे अशी अवस्था होऊन जाते. तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठायी माणसाचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराची रूपे होत. त्यांच्या सहवासातच ईश्वरभक्ती फुलते. वृक्षवल्ली, सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात गेले. वृक्षवल्लींना सोयरी’ मानले.

उपक्रम :

अ. तुमच्या परिसरातील देशी व विदेशी फुलांची माहिती इंटरनेटच्या माध्यमांतून मिळवून ती तुमच्या कनिष्ठ महाविदयालयातील काचफलकात प्रदर्शित करा.

आ. हिवाळ्यातील उत्तररात्री किंवा अगदी पहाटेच्या वेळी तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. पाहिलेल्या निसर्गसौंदर्याचे वर्णन शब्दबद्ध करा. ते वर्गात वाचून दाखवा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

तोंडी परीक्षा.

शिक्षकांनी वाचून दाखवलेला उतारा ऐका. सारांश लिहा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 8 रेशीमबंध Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 11
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 12

कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
उत्तररात्र हळुवारपणे अलगद पाऊल टाकते; कारण ………
उत्तर :
उत्तररात्र हळुवारपणे अलगद पाऊल टाकते; कारण तिच्या आगमनाची चाहूल कोणलाही लागू नये, अशी तिची इच्छा असते.

प्रश्न 2.
लेखक डायनिंग टेबलजवळची खिडकी हलकेच उघडतात कारण ……….
उत्तर :
लेखक डायनिंग टेबलजवळची खिडकी हलकेच उघडतात कारण रात्रीच्या नीरव शांततेचा भंग होऊ नये, असे लेखकांना वाटत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 3.
पाखरांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही; कारण ……….
उत्तर :
पाखरांनी पंख फडफडवल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही; कारण पाखरांची झोपमोड होऊ नये, असे पहाटेला मनोमन वाटत असते.

प्रश्न 4.
निसर्ग आणि मानव यांना एकमेकांची ओढ लागलेली असते; कारण …………..
उत्तर :
निसर्ग आणि मानव यांना एकमेकांची ओढ लागलेली असते; कारण त्या दोघांमध्ये युगानुयुगे आदिम, ऋजू स्नेहबंध निर्माण झाले आहेत.

वर्णन करा :

प्रश्न 1.
1. पहाटेचे आगमन.
2. मोगऱ्यात घडणारे मानवी भावभावनांचे दर्शन.
3. उजाडत जाणाऱ्या पहाटेसोबत आल्हादाला येणारी भरती.
4. पहाट व पाखरे यांच्यातील नाते.
उत्तर :
1. पहाटेचे आगमन : उत्तररात्रीचा काळोख हळूहळू विरत जातो. हळुवारपणे उजाडू लागते. गुलमोहोरावरील घरट्यांतून, जैक्रांडाच्या फांदयांवरून पाखरे डोळे किलकिले करून पाहू लागतात. त्यांचा आपापसातला आवाज कुजबुजीसारखा भासू लागतो. हळूहळू एखादया उत्सवासारखा हा चिवचिवाट वाढत जातो. सायली, बोगनवेल, क्रोटन्स, गुलमोहोर, जॅक्रांडा हे सर्वच सळसळू लागतात. हलू डोलू लागतात. अशा प्रकारे पहाटेचे आगमन होते.

2. मोगऱ्यात घडणारे मानवी भावभावनांचे दर्शन : लेखकांचे निसर्गाशी असलेले अत्यंत हृदय असे नाते या उताऱ्यातून व्यक्त झाले आहे. भोवतालच्या वृक्षवेली, पाखरे, पहाट, सकाळ हे सर्व मानवेतर घटक माणसासारख्याच भावभावनांनिशी वावरू लागतात. म्हणूनच पाणी न मिळाल्यामुळे कोमेजलेला मोगरा लेखकांना रुसल्यासारखा भासतो आणि पाणी मिळाल्यावर कळया आल्या की खुदखुद हसल्यासारखा भासतो. झाडेवेली भावुक होतात. कधीतरी थोडीफार रुसलीफुगली तरी त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवला, त्यांना पाणी दिले की गोंडस फुले देऊन आपल्याला केवडातरी विरंगुळा, तजेला देतात. अशी मानवी भावनांची देवाणघेवाण लेखकांना जाणवत राहते.

3. उजाडत जाणाऱ्या पहाटेसोबत आल्हादाला येणारी भरती : उत्तररात्रीचा काळोख विरत जातो आणि पहाटेचा उजेड सुरू होतो. हा काळोख नेमका कोणत्या क्षणी संपतो आणि उजेड कोणत्या क्षणी सुरू होतो हे सांगणे केवळ अशक्य असते. इतका तो क्षण तरल असतो. त्या क्षणी लेखकांना अनोख्या, लोभसवाण्या नाजूक अनुभवाचा प्रत्यय येतो. ही आल्हाददायकता निसर्गाच्या सर्व घटकांमध्ये लेखकांना दिसते. झाडांच्या, वेलींच्या सळसळण्यात, हलण्याडोलण्यात दिसते. सुरुवातीला मंद मंद असलेला चिवचिवाट हर्षोल्हासाचे रूप धारण करतो. जणू आनंदाला, आल्हादाला आलेली भरतीच वाटते.

4. पहाट व पाखरे यांच्यातील नाते : लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो. पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जणू एकमेकांना विचारताहेत, ” पहाट आली का?” पहाटेचे हळुवार येणे पाहन लेखकांना वाटते की, पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते की, “मी येऊ का?” त्या दोघांमधले हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

केव्हा ते लिहा :

प्रश्न 1.
1. पहाट आकाशात हलकेच पाऊल टाकते, जेव्हा
2. पाखरांचा चिवचिवाट वाढत जातो, जेव्हा
उत्तर :
1. पहाट आकाशात हलकेच पाऊल टाकते, जेव्हा पाखरांच्या पंखांची फडफड त्याला ऐकू येते.
2. पाखरांचा चिवचिवाट वाढत जातो, जेव्हा पहाट हळूहळू उजाडत जाते.

म्हणजे काय ते लिहा :

प्रश्न 1.

  1. गुलमोहोरावरची पाखरे आपापसात कुजबुजू लागतात, म्हणजे जणू काही ………
  2. मोगऱ्याला चुकून एखादया दिवशी पाणी घालायचे राहून गेले, तर तो कोमेजू लागतो, म्हणजे जणू काही ……
  3. पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी मोगऱ्याला कळ्या येतात, म्हणजे जणू काही …………

उत्तर :

  1. गुलमोहोरावरची पाखरे आपापसात कुजबुजू लागतात, म्हणजे जणू काही तो त्यांच्या आल्हादाचा उत्सव असतो.
  2. मोगऱ्याला चुकून एखादया दिवशी पाणी घालायचे राहून गेले, तर तो कोमेजू लागतो, म्हणजे जणू काही तो लेखकांवर रुसून बसतो.
  3. पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी मोगऱ्याला कळ्या येतात, म्हणजे जणू काही तो कळ्यांच्या रूपाने लेखकांकडे पाहून खुदखुद हसू लागतो.

रेशीमबंध Summary in Marathi

शब्दार्थ :

  1. उत्तररात्र – मध्यरात्रीनंतरचा काळ.
  2. विरणे – विरविरीत होणे, विरळ होणे.
  3. असोशी – ओढ.
  4. आदिमत्व – आदिम म्हणजे पहिला, मूळचा, आदिमत्व म्हणजे मूळची अवस्था.
  5. ऋजू – सरळ, साधा, निर्मळ, पारदर्शी.
  6. आस – इच्छा.
  7. नितळ – गाळ, गढूळपणा नसलेले, स्वच्छ, शुद्ध.
  8. लोभस – उत्कटपणे आवडणारा.
  9. नजाकत – सुबकपणा.

Vinchu Chavala Class 12 Marathi Chapter 7 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 7 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 7 विंचू चावला… Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

विंचू चावला… 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 7 विंचू चावला… Textbook Questions and Answers

कृती

1. अ. योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

प्रश्न 1.
तम घाम अंगासी आला, म्हणजे ……..
अ. संपूर्ण शरीराला घाम आला
आ. घामाने असह्यता आली
इ. घामामुळे मन अस्थिर झाले
ई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली
उत्तर :
ई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.

प्रश्न 2.
मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे ………..
अ. माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते
आ. मनुष्याला इंगळी चावणे वाईट
इ. इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते
ई. मनुष्याला इंगळी नांगा मारते
उत्तर :
अ. माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते

प्रश्न 3.
सत्त्व उतारा देऊन, म्हणजे …….
अ. जीवनसत्त्व देऊन
आ. सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन
इ. सात्त्विक आहार देऊन
ई. सत्त्वाचे महत्त्व सांगून
उत्तर :
आ. सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

प्रश्न 4.
‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे ……..
अ. भारूड उत्तम गाता येते
आ. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो
इ. भारूडाला अर्थप्राप्त होतो
ई. भारूड अधिक रंजक बनत
उत्तर :
आ. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला 2

इ. खालील शब्दांचे अर्थ लिहा.

प्रश्न 1.

  1. वृश्चिक ………
  2. दाह ………
  3. क्रोध ………
  4. दारुण ………

उत्तर :

  1. वृश्चिक – विंचू
  2. दाह – आग
  3. क्रोध – राग, संताप
  4. दारुण – भयंकर

2. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां ।।
उत्तर :
अर्थ : काम-क्रोधरूपी विंचू चावला, तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात – विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून दया. त्यांचा त्याग करा. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्त्विक गुणांचा अंगारा लावा. म्हणजे विंचू-इंगळीरूपी विकार पटकन दूर होतील.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।4।।
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम-क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा, याचा ऊहापोह केला आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकूळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल, तर त्यावर सत्त्वगुणाचा अंगारा लावावा. मग सत्त्वगुणाच्या उताऱ्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्त्वगुणाच्या उताऱ्याने वेदना शमते. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच, तर गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे.

तमोगुण व सात्त्विक गुण यांचा परिणाम या ओळींमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्ययकारीरीत्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

4. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।1।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।2।।
उत्तर :
आशयसौंदर्य : संत एकनाथ महाराज यांनी ‘विंचू चावला’ या भारुडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम-क्रोधरूपी विंचवाचा दाह कसा शमवावा, याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. काम-क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारतात नाट्यमयरीत्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे.

काव्यसौंदर्य : काम-क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो, तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. तामसवृत्ती उफाळून येते. त्यामुळे जीव व्याकूळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाला दाह होतो; कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे. तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते. असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो.

भाषिक वैशिष्ट्ये : लोकशिक्षण देणारे ‘विंचू चावला’ हे आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडाची भाषा द्विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षड्विकारांवर सद्गुणांनी मात करा, असा मोलाचा संदेश हे भारूड देते. ‘विंचू, वृश्चिक व इंगळी’ अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात. ‘तमघाम, दाह, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते. ही भारूड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरली आहे.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर :
माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते; पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो. मनासारखे काही झाले नाही की, मी वैतागून समोरच्याला बोलतो. दुसरा असा की, मी वेळेवर जेवण, झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही. त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले, तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले.

पहिले म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला, तरी तो नाहक आहे, हे जाणून घेतले. एखादया गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का, याची शहानिशा मी मनाशी करू लागलो नि माझ्या लक्षात आले की, माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले नि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे, ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश आले. मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

प्रश्न आ.
‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.
उत्तर :
‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुणरूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा, यांचा उपदेश मार्मिक प्रतीकांतून केला आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकूळ करतो. येथे काम-क्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठायी वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता.

म्हणून यावर उपाय एकच आहे. सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे. सत्संग सदा घडायला हवा. म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.

उपक्रम :

संत एकनाथ महाराज यांची इतर भारुडे मिळवून वाचा.

तोंडी परीक्षा.

‘विंचू चावला’ हे भारूड सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 7 विंचू चावला… Additional Important Questions and Answers

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. विंचू या अर्थाची दोन नावे → [ ] व [ ]
  2. घामाचे नाव → [ ]
  3. व्याकूळ झालेला → [ ]
  4. अतिभयंकर असलेली → [ ]
  5. फुणफुण शांत करणारे → [ ]

उत्तर :

  1. विंचू या अर्थाची दोन नावे → वृश्चिक व इंगळी
  2. घामाचे नाव → तम घाम
  3. व्याकूळ झालेला → पंचप्राण
  4. अतिभयंकर असलेली → मनुष्य इंगळी
  5. फुणफुण शांत करणारे → जनार्दन स्वामी

व्याकरण 

वाक्यप्रकार :

क्रियापदाच्या रूपावरून पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :

प्रश्न 1.

  1. पाऊस पडला असता, तर हवेत गारवा आला असता. → [ ]
  2. मनुष्य-इंगळी अतिदारुण आहे. → [ ]
  3. तुम्ही नक्की परीक्षेत यश मिळवाल. → [ ]
  4. संत एकनाथ महाराजांनी भारुडातून लोकशिक्षण दिले. → [ ]

उत्तर :

  1. संकेतार्थी वाक्य
  2. स्वार्थी वाक्य
  3. स्वार्थी वाक्य
  4. स्वार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.
1. भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला. (नकारार्थी करा.)
2. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये. (होकारार्थी करा.)
उत्तर :
1. भारतीय क्रिकेटसंघ पराभूत झाला नाही.
2. प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे.

समास :

तक्ता पूर्ण करा :

प्रश्न 1.

सामासिक शब्दसमासाचे नाव
1. नीलकमल………………….
2. ……………..इतरेतर द्वद्व
3. यथाशक्ती………………….
4. ……………..बहुव्रीही

उत्तर :

सामासिक शब्दसमासाचे नाव
1. नीलकमलइतरेतर दवद्व
2. भाऊबहीणइतरेतर द्वद्व
3. यथाशक्तीअव्ययीभाव
4. भालचंद्रबहुव्रीही

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

प्रयोग :

पुढील प्रयोगांच्या वैशिष्ट्यांवरून प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदात कुठलाच बदल होत नाही. → [ ]
2. कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपात बदल होतो. → [ ]
उत्तर :
1. भावे प्रयोग
2. कर्मणी प्रयोग

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. → [ ]
2. एखादया गोष्टीचे वा प्रसंगाचे वा व्यक्तीचे वर्णन करताना असंभाव्य कल्पना केली जाते. → [ ]
उत्तर :
1. अर्थान्तरन्यास अलंकार
2. अतिशयोक्ती अलंकार

विंचू चावला… Summary in Marathi

कवितेचा (भारुडाचा) भावार्थ :

‘बहुरूङ’ ते भारूड होय. भारुडात ‘आध्यात्मिक रूपक’ वापरलेले असते. प्रतीकांमधून लोकशिक्षण देणारी नाट्यमय रचना म्हणजे भारूड होय. ___ ‘विंचू चावला’ या भारुडामध्ये मनुष्याच्या ठायी असलेल्या दुर्गुणांवर प्रहार करताना संत एकनाथ महाराज म्हणतात – मला (मनुष्याला) विंचू चावला. काम व क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की, माझ्या अंगाला दुर्गुणाचा घाम फुटला. ।। धृ ।।

काम-क्रोधरूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंखाने माझा जीव व्याकूळ झाला. प्राण कंठाशी आले. प्राण जाईल अशा वेदना मला होत आहेत. माझ्या तनामनाची आग झाली आहे.।।1।।

मनुष्यरूपी ही इंगळी (विंचू) इतकी भयंकर आहे की, तिने नांगी मारताच त्या दंशाने सर्वांगाला वेदना झाली. ठणका लागला. त्या इंगळीचे विष सर्वांगभर पसरले.।।2।।

या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून दया, त्याचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्त्विक गुणांचा अंगारा लावा, या सत्त्वगुणाच्या अंगाऱ्याने विंचू-इंगळीरूपी विकार पटकन् दूर होतील.।।3।।

अशा प्रकारे सात्त्विक गुणाचा उतारा घेऊन सगळी तामसवृत्ती, दुर्गुण दूर केले, थोडीशी ठसठस राहिली आहे, ती गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने शांत केली.।।4।।

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

शब्दार्थ :

  1. वृश्चिक – विंचू.
  2. तम – (येथे अर्थ) दुर्गुण.
  3. पंचप्राण – जीव.
  4. सांग – सगळे अंग.
  5. दाह – आग.
  6. इंगळी – (मोठा) विंचू.
  7. अतिदारुण – खूप भयंकर.
  8. मज – मला.
  9. नांगा – दंश.
  10. वेदना – कळ.
  11. सत्त्वगुण – चांगले गुण.
  12. अंगारा – उदी.
  13. झरझरा – पटकन.
  14. अवघा – सगळा.
  15. सारिला – मागे केला.
  16. फुणफुण – ठसठस.

Class 12 Marathi Yuvakbharati Textbook Solutions

Atmavishvasa Sarkhi Shakti Nahi Class 12 Marathi Chapter 6.1 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 6.1 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Textbook Questions and Answers

नमुना कृती

1. कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 2.1

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 4.1

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

2. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.
उत्तर :
आत्मविश्वास म्हणजे स्वत:चा स्वत:वरील विश्वास. व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते. आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो. ते कळते. मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो. आपल्याला काम करताना त्रास होत नाही. त्याचे कष्ट जाणवत नाहीत. उलट, ते काम करताना आपल्याला आनंद मिलतो. अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजे आनंदी जीवन होय.

आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल, तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे. तशी ती कळली, तर आपल्याला आत्मविश्वास येईल, म्हणजेच, आनंदी, सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो. कितीही कठीण कामे करू शकतो. खूप कामे करणे दीर्घोदयोग. दीर्घोदयोगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात. विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते. म्हणजेच आपण पराक्रमी बनतो.

आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत, भरभर कशी करावीत, हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो, हीच बुद्धिमत्ता होय.

थोडक्यात, आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो, हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरश: खरे आहे.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Additional Important Questions and Answers

फरक लिहा :

प्रश्न 1.

बालपणची बाबासाहेबांची स्थितीआजच्या गरीब मुलांची स्थिती

उत्तर :

बालपणची बाबासाहेबांची स्थितीआजच्या गरीब मुलांची स्थिती
बाबासाहेबांना चांगल्या सोयी मिळाल्या नव्हत्या. कोणतीही अनुकूलता नव्हती.आजच्या काळात साधनसामग्रीने सुसज्ज अशी अनुकूल स्थिती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 5
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 6

आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Summary in Marathi

आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदा., कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळित झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करीन ते होईल. अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो.

माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील; परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबांतील गरीब विदयाथ्यांपेक्षा माझी त्या वेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही.

मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई-बाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो, तर तुम्हांस आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दी|दयोगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.

मी विद्यार्थिदशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी त-हेने पुरा केला. हे करण्यासाठी २४ तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी २४ तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो. दीर्घोदयोग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Maharashtra State Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions

Rang Maza Vegla Class 12 Marathi Chapter 6 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 6 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6 रंग माझा वेगळा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

रंग माझा वेगळा 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 6 रंग माझा वेगळा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

प्रश्न 1.

अर्थओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.…………….
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो………………
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे?……………..
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली?…………….

उत्तर :

अर्थओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतोकोण जाणे कोठुनी ह्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा!
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे?हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा!
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली?अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा 2

इ. योग्य जोड्या लावा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. माणसांची मध्यरात्रअ. नैराश्यातील आशेचा किरण
2. मध्यरात्री हिंडणारा सूर्यआ. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्
3. माझा पेटण्याचा सोहळाइ. माणसांच्या आयुष्यातील नैराश्

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. माणसांची मध्यरात्रइ. माणसांच्या आयुष्यातील नैराश्
2. मध्यरात्री हिंडणारा सूर्यअ. नैराश्यातील आशेचा किरण
3. माझा पेटण्याचा सोहळाआ. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्

ई. एका शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. कवीची सदैव सोबत करणारी ……………….
  2. कवीचा विश्वासघात करणार ……………….
  3. खोट्या दिशा सांगतात त ……………….
  4. माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा ……………….

उत्तर :

  1. कवीची सदैव सोबत करणारी – आसवे
  2. कवीचा विश्वासघात करणारे – आयुष्य
  3. खोट्या दिशा सांगतात ते – तात्पर्य
  4. माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा – सूर्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

2. खालील शब्दांचे अर्थलिहा.

प्रश्न 1.

  1. तात्पर्य –
  2. लळा –
  3. गुंता –
  4. सोहळा –

उत्तर :

  1. तात्पर्य – सार, सारांश
  2. लळा – माया, ममता, प्रेम
  3. गुंता – गुंतागुंत
  4. सोहळा – उत्सव, समारंभ.

3. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न अ.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
उत्तर :
अर्थ : स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळाच आहे. सर्व गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. मी पायात बंधने घालून घेणारा नाही. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे.

प्रश्न आ.
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
अर्थ : कवी म्हणतात – कोणत्या क्षणी मला जीवनाचे भान आले, ते मला कळले नाही. मी आयुष्य जगायला लागलो. पण या आयुष्याने माझा विश्वासघात केला.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत.

कवी म्हणतात – मी कुठल्याही बंधनात स्वत:ला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळिमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही. समाजात नैराश्येचा अंधार असला नि माणुसकीची भयाण मध्यरात्र जरी झाली असली, तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही.

तडफदार व ओजस्वी शब्दांत कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत.

5. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल, तर स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, अत्यंत गरजेचे आहे.

स्वत:च्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची ‘माणूस’ असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन ‘आनंदवन’ उभारले. समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता नि मनाचा विवेक जागवण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ एकहाती पार पाडले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगेमहाराज आज आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपणास वंदनीय आहेत.

प्रश्न आ.
कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवींनी स्वत:च्या बेधडक व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या वाट्याला आलेल्या फसवणुकीचाही मागोवा घेतला आहे.

ते म्हणतात – मी कोणत्याही गुंत्यात अडकलो नाही, ना कुठल्या रंगात रंगलो, मी स्वत:चे व्यक्तित्व वेगळे राखले. पण मला कळले नाही सुखाची सावली कधी लाभली; पण या क्षणिक सुखाच्या झळा मी सोसल्या. माझ्या कवितेच्या सोबतीला माझे अश्रू होते. त्यामुळे समाजाच्या दुःखाचा लळा मला लागला. ‘तात्पर्य’ सांगणारे महाभाग भेटले.

वस्तुस्थिती विपरीत दर्शवणारे लोक भेटले. चालतोय त्याला पांगळा’ नि पाहणाऱ्याला ‘आंधळा’ संबोधणारे फसवे लोक मला मिळाले. कोणत्या बेसावध क्षणी माझा आयुष्याने विश्वासघात केला ते कळलेच नाही. पण मी या फसवणुकीला पुरून उरलो. मी स्वार्थासाठी जगलो नाही. सामाजिक दुःख दूर करणारा मी नैराश्येतील सूर्य झालो.

प्रश्न इ.
‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत:बाबत का म्हणतो ते लिहा.
उत्तर :
समाजात पसरलेल्या दुःखदैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे, असे स्वत:चे व्यक्तिमत्त्व कवीनी ‘रंग माझा वेगळा’ या कवितेत साकारले आहे.

ते म्हणतात – ‘तात्पर्य’ सांगणारी फसवी माणसे व दुसऱ्याची वंचना करणारी माणसे खोटेपणाचा आव आणून समाजात वावरत आहेत. हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे समाजात नैराश्येची मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्री जसा सूर्य झाकोळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्येचा अंधकार दूर करीन, हा विचार शेरातून मांडताना कवी ‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’ असे स्वत:बद्दल सार्थ उद्गार काढतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

उपक्रम :

अ. मराठी गझलकारांच्या गझला मिळवून वाचा.
आ. यू-ट्यूबरील विविध मराठी गझल ऐकून आनंद मिळवा.

तोंडी परीक्षा.

‘रंग माझा वेगळा’ ही गझल सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6 रंग माझा वेगळा Additional Important Questions and Answers

कवितेतील यमक साधणारे शब्द लिहा :

प्रश्न 1.

  1. ………….
  2. ………….
  3. ………….
  4. ………….
  5. ………….
  6. ………….
  7. ………….

उत्तर :

  1. वेगळा
  2. मोकळा
  3. झळा
  4. लळा
  5. गळा
  6. आंधळा
  7. सोहळा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

कृती : (रसग्रहण)

प्रश्न 1.
पुढील ओळींचे रसग्रहण करा : रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवें ही आसवें गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!
उत्तर:
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली, जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली, विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना। आवाहक वाटते.

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयानुसार पुढील वाक्यांचा प्रकार लिहा :

प्रश्न 1.

  1. किती अफाट पाऊस पडला काल!
  2. हे फूल खूप छान आहे.
  3. तुझी शाळा कोठे आहे?

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनांप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करा. (विधानार्थी करा.)
  2. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा.)
  3. रांगेत चालावे. (आज्ञार्थी करा.)

उत्तर :

  1. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करावे.
  2. जगात सर्व सुखी असा कोण आहे?
  3. रांगेत चाला.

समास :

तक्ता पूर्ण करा :

प्रश्न 1.

सामासिक शब्दविग्रह
1. नाट्यगृह………………
2. ………………..सहा कोनांचा समूह
3. खरे-खोटे……………….
4. ……………….केर, कचरा वगैरे

उत्तर :

सामासिक शब्दविग्रह
1. नाट्यगृहनाट्यगृह
2. षट्कोनसहा कोनांचा समूह
3. खरे-खोटेखरे-खोटे
4. केरकचराकेर, कचरा वगैरे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

प्रयोग :

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. सुरेश भटांनी गझल लिहिली.
  2. रूपाने गाय झाडाला बांधली.
  3. अमर अभ्यास पहाटे करतो.
  4. माहुताने हत्तीस बांधले.

उत्तर :

  1. कर्मणी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. कर्तरी प्रयोग
  4. भावे प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. त्याच्या एका गर्जनेने पर्वत डळमळतात. → [ ]
  2. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच त्याच्यापरी. → [ ]
  3. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. → [ ]
  4. एक फळ नासके असेल, तर सर्व फळांवर परिणाम होतो; तसा एक दुर्जन माणूस सारा समाज दूषित करतो. → [ ]

उत्तर :

  1. अतिशयोक्ती अलंकार
  2. अनन्वय अलंकार
  3. अतिशयोक्ती अलंकार
  4. अर्थान्तरन्यास अलंकार

रंग माझा वेगळा Summary in Marathi

कवितेचा (गझलचा) भावार्थ :

स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – सर्व रंगात रंगले, तरी माझा रंग वेगळा व अनोखा आहे. माझे व्यक्तिमत्त्व साऱ्यांहून वेगळे आहे, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो, तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो.

मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या; पण मी असा संवेदनशील आहे की, या सुखछायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात. सुखातही मला मानसिक वेदना होतात.

माझ्या डोळ्यांतले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात, अश्रूच माझे गाणे होते, हे असे कशाचे दु:ख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला. दुःखावरही मी माया करतो.

कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मला 5 कळले नाही. पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि, माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली.

चारीबाजूंनी या दिशा, ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात नि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो, त्याला जग पांगळा म्हणते नि जो नीट पाहतो, त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे.

जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्येच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना . दिव्य तेज आहे, इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वत:साठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करीत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

शब्दार्थ :

  1. गुंता – गुंतागुंत.
  2. झळा – (गरम हवेचा) झोत.
  3. आसवे – अश्रू.
  4. गीत – गाणे.
  5. तात्पर्य – सार, सारांश, निष्कर्ष.
  6. पांगळा – दिव्यांग.
  7. सोहळा – उत्सव, समारंभ.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

1. पाय मोकळा होणे – बंधनातून मुक्त असणे.
2. गळा कापणे – विश्वासघात करणे.

Maharashtra State Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions

Virana Salami Class 12 Marathi Chapter 5 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 5 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 5 वीरांना सलामी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

वीरांना सलामी 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 5 वीरांना सलामी Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 3
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 5

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 4

आ. चौकटीत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक [ ]
  2. भयाण पर्वतांवर चढणार [ ]
  3. मृत्यूलाच आव्हान देणारी [ ]
  4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी [ ]
  5. चोवीस जणांची लडाख भेट [ ]

उत्तर :

  1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक – ऑपरेशन विजय
  2. भयाण पर्वतांवर चढणार – आमचे धैर्यधर सैनिक
  3. मृत्यूलाच आव्हान देणारी – 22-23 वर्षांचे तेजस्वी तरुण
  4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी – ड्रायव्हर स्टानझिन
  5. चोवीस जणांची लडाख भेट – मिशन लडाख

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

इ. कारणे लिहा.

प्रश्न 1.
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण ………
उत्तर :
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय यांच्या स्मारकाला सलाम केला; कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या 22 – 23 वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे!

प्रश्न 2.
‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण ……………
उत्तर :
‘मिशन लडाख ‘साठी ‘राखी पौर्णिमे ‘चा मुहूर्त निवडला; कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, असे लेखिकांना वाटत होते.

प्रश्न 3.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण…
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 4.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण …………..
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

प्रश्न 5.
समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण ……
उत्तर :
समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते; कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते.

ई. पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
उत्तर :
आपली माणसे, आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो.

प्रश्न 2.
‘सेवा परमो धर्म:’
उत्तर :
लेखिका कारगिल-द्वास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा – रात्रीचे साडेदहा वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खल्सेचा पूल कोसळला होता. मागे-पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलना फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी. कार्यव्यग्र. पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व 34 जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
उत्तर :
लडाखच्या दऱ्याखोऱ्यात, मिट्ट काळोखी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. खल्सेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग! अशातच लेखिकांनी कर्नल राणा यांना फोन केला, तेव्हा त्यांचा आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानांवर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले.

प्रश्न 4.
लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
उत्तर :
लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकांत गैरसमज फार असतात. लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते. तेथे सुखकारक काहीच नसते. संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते. सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात. एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमांद्वारे करीत होत्या.

2. व्याकरण

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
जमीन अस्मानाचा फरक असणे.
उत्तर :
अर्थ – खूप तफावत असणे.
वाक्य – सुशिला समंजस व सुनिला हेकट आहे. दोघींच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे.

प्रश्न 2.
अंगावर काटा येणे.
उत्तर :
अर्थ – तीव्र मारा करणे.
वाक्य – भारतीय जवानांनी शत्रूवर तोफांतून आग ओकली.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
आग ओकणे.
उत्तर :
अर्थ – भीतीने अंगावर शहारा येणे.
वाक्य – जंगलातून जाताना अचानक समोर वाघ पाहून प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

प्रश्न 4.
मनातील मळभ दूर होणे.
उत्तर :
अर्थ – गैरसमज दूर होणे.
वाक्य – मनीषा पटेल असा त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यानंतर सुदेशच्या मनातील मळभ दूर झाले.

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 6
उत्तर :

वाक्यवाक्यप्रकारबदलासाठी सूचना
जमेल का हे सारं आपल्याला?प्रश्नार्थी वाक्यविधानार्थी – हे सारं आपल्याला जमेल.
तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.विधानार्थी वाक्यउद्गारार्थी – किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल!
यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता.नकारार्थी वाक्यप्रश्नार्थक – यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का?
पुढील सगळे मार्ग बंदच होते.होकारार्थी वाक्यनकारार्थी – पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

इ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 7
उत्तर :

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
बावीसतेवीसबावीस किंवा तेवीसवैकल्पिक द्वंद्व
ठायीठायीप्रत्येक ठिकाणीअव्ययीभाव
शब्दकोशशब्दांचा कोशविभक्ती तत्पुरुष
यथोचितउचित (योग्यते) प्रमाणेअव्ययीभाव

ई. योग्य पर्याय निवडा व लिहा.

प्रश्न 1.
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-
अ. भावे प्रयोग
आ. कर्तरी प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग – कर्तरी प्रयोग.

प्रश्न 2.
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-
अ. कर्तरी प्रयोग
आ. भावे प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग – भावे प्रयोग.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-
अ. त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले
आ. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच
इ. आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता
उत्तर :
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य – आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता

3. स्वमत.

प्रश्न अ.
‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरव्ही सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगुल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक, सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी, मूठ वळलेला हात हवेत उंचावून ‘भारतमाता की जय’ असे जोरात म्हणायचे! हीच देशभक्ती! आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.

वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा, असे विनवीत आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे.

देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे, देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते, त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना – काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाक-तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळाबाजार सुरू. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते.

दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्या तर 150 200 रुपयांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या. लोक लाच घेतात. कामात घोटाळे करतात. कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात. सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना? असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल?

सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावर प्रेम आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामे केली तर देशाची प्रगती होईल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न आ.
ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
उत्तर :
सर्व लोकांच्या मनात सेनादलांविषयी गैरसमज फार आहेत. परकीयांचे आक्रमण होते त्या वेळी सेनादलांबद्दल अफाट प्रेम आणि अभिमान उफाळून येतो. पण गैरसमज वितळून जात नाहीत.

सेनादलातील जीवन खूपच कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते. त्यात वैविध्य नसते. म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनादलांविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले, तर बरोबर आहे, असे वाटेल. पण हे गैरसमज आहेत. अगदी घट्ट रुतून बसले आहेत.

मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले MBBS, IIM, B.Tech, M.Tech, BE, ME या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे विद्यार्थी आपापल्या मगदुराप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. पण कोणीही अगदी कोणीही, ‘मी सेनादलात जवान म्हणून जाईन, अधिकारी म्हणून जाईन,’ असे म्हणत नाहीत. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेनादलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करीत नाही. यामागे खरे तर गैरसमज आहेत.

कष्ट काय फक्त सैन्यातच असतात. सध्या आयटीमधील मुले 12 – 12, 15 – 15 तास काम करतात. घरी आल्यावरही ऑफिसचे काम असतेच. हे काय कष्ट नाहीत? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली, तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. तसेच, लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते.

किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेच मिळू शकत नाही. शिवाय, लष्करात गेले की लढाई होणारच आणि आपण मरणारच असे थोडेच असते? नागरी जीवनात अपघाताने मृत्यू येत नाही? मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखे नाही. अलीकडे मुले अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे किती तरी दूर दूर जातात. त्याचे काय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लष्करात फक्त पाच वर्षे नोकरी केली की मुक्त होता येते. ही सोय इतरत्र असते का? लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले, तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते. पण हे कोणीतरी जिव्हाळ्याने समजावून सांगितले पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाई करू शकतात, असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न इ.
‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :
कर्नल राणा लेखिकांशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात रूक्षपणा, परकेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखक समजून घेऊ शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा, असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती.

सध्याच्या तरुणांवर टीव्ही व सामाजिक माध्यमे यांचा फार मोठा प्रभाव आहे. टीव्हीवरील कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात. किंबहुना प्रेक्षकांना वास्तवापासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्या कार्यक्रमांतील सामाजिक समस्या या वास्तव नसतात. त्या काल्पनिक असतात. एखाद्या कार्यक्रमातील कथानकात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो, नाही असे नाही.

पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात. ते सुलभीकृत असतात. त्यामुळे त्यातील चित्रणात, जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो. सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते, त्या धारणा तरुणांना परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांना सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे बनते. सेनादलातील वास्तव हे रोकडे, रांगडे असते. तर टीव्हीमुळे सैनिकांविषयी रोमँटिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे. सेनादलाला रोमँटिकपणा, हळवेपणा चालत नाही. तेथे रोखठोक, कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवीन तरुणांना जमत नाही.

नागरी जीवन व सैनिक जीवन यांच्यात अंतर पडलेले आहे. चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे. तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो. त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिकांना कर्नल राणांकडून हा दृष्टिकोन मिळाला. या जाणिवेमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल, असे लेखिकांना वाटले. ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला,’ असे विधान केले आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
उत्तर :
सैनिकाला स्वत:चे जीवन हजारो मैल दूर अंतरावर, कुटुंबीयांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसांत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाही. दऱ्याखोऱ्यांतून, वाळवंटातून, जंगलांतून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते.

तासन्तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का? ते तसे नको. हे मला जमणार नाही, ते मी नंतर करीन, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचारस्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये, असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर, कष्टमय जीवन सैनिक जगत असतो.

याउलट, नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबीयांसोबत राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबीयांसोबत अनुभवतो. त्याला कुटुंबीयांचा सहवास मिळतो. कुटुंबीयांना त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाहीकडे जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो; हवे ते करू शकतो.

कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते – देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. त्याच्या भरोवशावर आपण सण-उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न आ.
कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
उत्तर :
सिर्फ दिमाग में डालना है!’ हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. हा मंत्र मला खूप आवडला आहे. तो मी प्रत्यक्षात अमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेलेच आहे. फरक एवढाच की, त्या वेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. मी दोन उदाहरणे सांगतो. त्यावरून मी काय करणार आहे, हे लक्षात येईलच.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही, मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले.. निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोन तीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले.

सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला. सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल? किती वेळ लागेल? हात दुखतील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूँगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

उपक्रम :

अ. रजा घेऊन गावाकडे आलेल्या एखादया सैनिकाची किंवा माजी सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
आ. पाठात आलेले ‘आर्मी’शी संबंधित शब्द शोधा व त्यांचे अर्थ जाणून घेऊन ते गटासमोर सांगा.

तोंडी परीक्षा.

अ. ‘विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेली शपथ’ हा प्रसंग तुमच्या शब्दांत थोडक्यात सांगा.
आ. ‘मी सैनिक होणार’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 5 वीरांना सलामी Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 10
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 11

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 12
उत्तर :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 13

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 14
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 15
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 16 Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 17

चौकटींत उत्तरे लिहा :

प्रश्न 1.

  1. कारगील युद्धाचे वर्ष [ ]
  2. कारगील युद्धाच्या स्मारकाचे नाव [ ]
  3. 14 कोअरच्या कर्नलांचे नाव [ ]
  4. ‘मिशन लडाख ‘चा चमू आणि सैनिक यांना बांधणारा [ ]
  5. ‘मिशन लडाख ‘चा शेवटचा टप्पा [ ]

उत्तर :

  1. 1999
  2. ऑपरेशन विजय
  3. कर्नल झा
  4. राखीचा धागा
  5. द्रास-कारगील

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 2.

  1. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश [ ]
  2. लेहमधील लष्करी अधिकारी [ ]
  3. खल्सेचा पूल कोसळल्यामुळे प्रवाशांना आसरा मिळालेले ठिकाण [ ]
  4. कार्यतत्परतेमुळे लेखिकांनी सैनिकांना दिलेली उपमा [ ]
  5. वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी देणारा विभाग [ ]
  6. समाजातील बदलांमुळे व्यथित झालेले [ ]
  7. “या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे,” असे म्हणणारी [ ]
  8. रक्षाबंधनासाठी लडाखला नियमितपणे ग्रुप घेऊन येणाऱ्या [ ]
  9. ‘शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांची आम्हांला गरज आहे,’ असे म्हणणारे [ ]

उत्तर :

  1. लडाख
  2. कर्नल राणा
  3. ट्रॅफिक चेक पोस्ट
  4. कामकरी मुंग्या
  5. 14 कोअर
  6. कर्नल राणा
  7. भाग्यश्री
  8. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई
  9. ब्रिगेडियर ठाकूर

वर्णन करा :

प्रश्न 1.
1. शपथेनंतरची अवस्था : ……………………
2. मिशन लडाखचा हेतू : …………………….
उत्तर :
1. शपथेनंतरची अवस्था : शपथेनंतर भावनिक आवेग ओसरल्यावर मनात शंका आली की, आपल्याला हे जमेल का? मन अस्वस्थ झाले. पण काही क्षणातच लेखिकांनी निर्धार केला.
2. मिशन लडाखचा हेतू : सर्वस्वाचा त्याग करून आपले सैनिक देशाचे रक्षण करतात म्हणून बहीण या नात्याने त्यांना राखी बांधून त्यांच्या असीम त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, हा मिशन लडाखचा हेतू होता.

पुढील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा :

प्रश्न 1.
मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिग होती ती!
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. पण त्यांची देशनिष्ठा देदीप्यमान होती. शिखरावरून येणारे तोफगोळे कोणत्याही क्षणी आपला घास घेतील, हे उघड दिसत होते; पण त्याला ते घाबरले नाहीत. त्यांची निष्ठा ढळली नाही. ते मृत्यूला आव्हान देत पुढे सरकत होते. त्या वेळी त्यांची मने म्हणजे तेजस्वी ठिणग्याच वाटत होत्या.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 2.
ज्यांना आशीवाद दयायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली.
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. हे त्यांचे वय त्यांना आशीर्वाद प्यावे, असे होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य अजून घडायचे होते. त्या वयात त्यांना मृत्यू आला होता, ही जाणीवच वेदनादायक होती.

प्रश्न 3.
सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं; म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता.
उत्तर :
सैनिक म्हणजे भावभावना बाजूला सारून कर्तव्य कठोरतेने कृती करणारी माणसे. ही माणसे भेटल्यावर प्रतिसाद कसा देतील, आपल्याला समजून घेतील का, अशा अनेक शंका लेखिकांच्या मनात होत्या. त्यामुळे सिंहाची भीती वाटावी, तशी त्यांना सैनिकांची भीती वाटत होती.

प्रश्न 4.
सिर्फ दिमाग में डाल देना है।
उत्तर :
सैनिक दिलेली आज्ञा पाळतात. सांगितलेली कृती जमेल का, त्रास होईल का, काही नुकसान होईल का, यश मिळेल का, वगैरे कोणतेही प्रश्न विचारण्याची, मनात आणण्याचीही त्यांना सवय नसते. फक्त ‘हे हे करायचे आहे’ एवढेच ते मनाला बजावतात.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही. मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले… निबंध लिहायचाच, आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोनतीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय.

मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले, प्रत्येक मुद्दयाबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो, निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला, सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल ? किती वेळ लागेल? हात दुखत्तील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र – ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूंगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

लेखिकांना जाणवलेले कर्नल झा यांचे व्यक्तित्व गुण :

प्रश्न 1.

  1. ………………………….
  2. ………………………….
  3. ………………………….

उत्तर :

  1. प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
  2. लेखिकांच्या कार्याचे मोल जाणणे.
  3. लेखिका आणि त्यांचे कार्य यांची आठवण वर्षानुवर्षे जपणे.

एका तरुण सैनिकाला लेखिकांमध्ये त्याची मावशी दिसली, तेव्हाची लेखिकांची प्रतिक्रिया :

प्रश्न 1.

  1. ………………..
  2. ……………….
  3. ……………….

उत्तर :

  1. “खरं की काय? बरं ती मंगल मावशी, तर मी अनु मावशी!” असे उद्गार लेखिकांनी काढले.
  2. त्याला गळाभेटीची अनुमती दिली. .
  3. अन्य सोबत्यांचीही गळाभेट घडवून आणली.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

कारणे लिहा :

प्रश्न 1.
कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण –
उत्तर :
कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण सेनाधिकाऱ्याला भेटण्याचे खूप दडपण मनावर होते.

प्रश्न 2.
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण –
उत्तर :
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण त्याच्या मंगल मावशीच्या मुलीच्या म्हणजेच मावस बहिणीच्या लग्नाला त्याला हजर राहता आले नव्हते. लेखिका व त्यांच्या सोबत्यांमध्ये तो मंगल मावशी व नातेवाईक यांना शोधीत होता.

प्रश्न 3.
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण –
उत्तर :
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण तेथे कधीच पाऊस पडत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 4.
थंडीमुळे चेहरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण
उत्तर :
थंडीमुळे चेहेरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण पुढे खल्सेचा पूल कोसळला होता.

पाठाच्या आधारे पुढील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा :

प्रश्न 1.
या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे.
उत्तर :
कारगील परिसराच्या वातावरणात भारतीयत्वाची भावना भरून राहिलेली आहे. जात-पात, धर्म-पंथ, भाषा-प्रांत असल्या कोणत्याही भेदभावाचे दर्शन घडत नाही.

प्रश्न 2.
‘आपली माणसं’ भेटल्याचा गहिवर दाटून येतो.
उत्तर :
दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी, रौद्र आणि जरासुद्धा हिरवळ नसलेल्या प्रदेशात आपले सैनिक राहतात. तरीही ममत्व, बंधुभाव जपतात, नाती जोडतात. म्हणून सैनिक ‘आपलीच माणसे’ वाटतात.

वीरांना सलामी Summary in Marathi

पाठ परिचय :

लेखिका 2004 साली पर्यटक म्हणून लेह-लडाखला गेल्या होत्या. त्या पर्यटनात त्यांना सैनिकांचे खडतर जीवन व सर्वस्वाचे समर्पण करण्याची वृत्ती यांचे दर्शन घडले. लेखिका भारावून गेल्या, सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक व सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. आपला तो सर्व अनुभव या पाठात त्यांनी मांडला आहे.

एक वेगळी सहल म्हणून द्रास-कारगीलचा प्रवास सुरू झाला. लेह ते कारगील प्रवास, सोबतचा ड्रायव्हर कारगील युद्धाची थरारक हकिगत सांगत होता. ती हकिगत ऐकत ऐकत मुक्काम गाठला.

प्रत्यक्ष रणभूमी पाहिल्यावर 1999 सालच्या कारगील युद्धाची भीषणता लक्षात आली. उभ्या चढणीच्या पहाडावरून शत्रूच्या तोफा धडाडत होत्या. त्याच स्थितीत आपले जवान उभी चढण अथक चढत होते. स्वत:हून मृत्यूच्या तोंडात शिरण्यासारखा प्रकार होता तो! बावीस-तेवीस वर्षांचे कोवळे जीव स्फुल्लिंगाप्रमाणे चमकत होते. त्यांच्या स्मारकाला वंदन करताना या आठवणी मनाला वेदना देत होत्या.

दृक्श्राव्य केंद्रात कारगील युद्धाची फिल्म दाखवण्यात आली. सैनिकांच्या त्यागाची कल्पना लेखिकांना आली. संपूर्ण जीवनच देशासाठी अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचा परिचय देशवासीयांना घडवण्यासाठी त्यांना इथे आणण्याची प्रतिज्ञा लेखिकांनी केली.

जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम अनेक वर्षे सलग केला. या प्रसंगी अनेक सैनिकांच्या व्यक्तिगत जीवनातील हकिगती ऐकायला मिळाल्या.

लेह-लडाखच्या भेर्टीमुळे लेखिकांच्या स्वत:च्या मनातील अहंकार, बडेजाव, प्रतिष्ठितपणाच्या कल्पना गळून पडल्या. सैनिकांच्या उदात्त भावनांचे दर्शन घडले. ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी सेनादलाशी निर्माण झालेली जवळिकता कमी होऊ देऊ नका, अशी लेखिकांना विनंती केली. तसेच, निदान पाच वर्षे तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलात दाखल व्हावे, असा निरोप तरुणांपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी लेखिकांना केली, ती विनंती परिपूर्ण करण्याचा निश्चय करून लेखिका परतल्या.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

शब्दार्थ :

  1. उत्पात – ज्यात फार मोठा नाश आहे असे संकट.
  2. स्फुल्लिग – ठिणगी.
  3. विव्हळ – यातना, पिडा यांनी व्याकूळ.
  4. सपक – बेचव, निसत्त्व.
  5. भाट – स्तुती करण्यासाठी नेमलेला पगारी नोकर.
  6. भेंडोळी – लांबलचक कागदाच्या गुंडाळया.
  7. कॉम्बॅट वर्दी – वंद्व युद्धाचा गणवेश.
  8. पुनरागमनायच – पुन्हा येण्यासाठीच.
  9. नीरव – आवाजविरहित.
  10. समर्पण – संपूर्णपणे अर्पण.
  11. याच्यापरता – याच्यापेक्षा.

Maharashtra State Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions

Re Thamb Jara Ashadghana Class 12 Marathi Chapter 4 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 4 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

रे थांब जरा आषाढघना 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा.

प्रश्न 1.
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण …………….
उत्तर :
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात; कारण आषाढघनाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरून पाहायचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

प्रश्न 2.
कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ……………..
उत्तर :
कवींनी आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले; कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उन्हे धरतीवर यावीत.

आ. खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. शेतातील हिरवीगार पिके [ ]
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती [ ]
  3. वेळूच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द [ ]
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द [ ]

उत्तर :

  1. शेतातील हिरवीगार पिके – कोमल पाचूंची शेते
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती – प्रवाळ माती
  3. वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द – इंद्रनीळ
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द – रत्नकळा

इ. एका शब्दात उत्तर लिहा.

प्रश्न 1.

  1. रोमांचित होणारी
  2. नव्याने फुलणारी
  3. लाजणाऱ्या

उत्तर :

  1. रोमांचित होणारी – थरारक
  2. नव्याने फुलणारी – नवे फुलले
  3. लाजणाऱ्या – लाजिरवाणे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

ई. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना 2

2. जोड्या लावा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. काळोखाची पीत आंसवेंअ. पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहत
2. पालवींत उमलतां काजवेआ. ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
3. करूं दे मज हितगूज त्यांसवेंइ. वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
4. निरखीत जळांतिल विधुवदनाई. मला गुजगोष्टी करू दे

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. काळोखाची पीत आंसवेंआ. ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
2. पालवींत उमलतां काजवेइ. वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
3. करूं दे मज हितगूज त्यांसवेंई. मला गुजगोष्टी करू दे
4. निरखीत जळांतिल विधुवदनाअ. पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णा
उत्तर :
पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोवळे ऊन जेव्हा धरतीवर येईल, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते. फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो. पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल – स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो.

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
आश्लेषांच्या तुषारस्नानी
भिउन पिसोळी थव्याथव्यांनी
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी बा. भ. बोरकर यांनी ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धरतीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओघवत्या शब्दकळेत चित्रित केले आहेत. वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे.

आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने सृष्टी लख्ख झाली. आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे. त्या थेंबाना भिऊन फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत. माध्यान्ही म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी पंखाची रत्ने प्रभाव उधळीत त्याच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जणू भिजवीत उडत आहेत.

फुलपाखरांचे अतिशय प्रत्ययकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील, असे ओघवते वर्णन उपरोक्त ओळींत कवींनी शब्दलाघवाने केले आहे. पिसोळी’ या ग्रामीण शब्दांने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

5. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
रे थांब जरा आषाढघना
बघु दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंची ही शेतें
प्रवाळमातीमधली औतें
इंद्रनीळ वेळूची बेटे
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुली ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उत्तर :
आशयसौंदर्य : कवी बा. भ. बोरकर यांच्या ‘रे थांब जरा आषाढघना’ या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत. आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते. या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत.

काव्यसौंदर्य : आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत. त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात – हे आषाढमेघा, जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे. कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते, पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी, नुकतीच उमललेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली, तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत. अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा.

भाषा वैशिष्ट्ये : उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे. आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे. विशेष म्हणजे ‘आषाढघन, केतकी, सोनचाफ्याची कळी, जाईची फुले’ यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी

अंत : करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे. निसर्ग आणि मानव यांतील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे. ‘लाजणाऱ्या जाई नि रोमांचित होणारी केतकी’ यातला हृदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो. नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :
आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू ‘कालिदास जयंतीला’ मी माझ्या गावी होतो. त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकटाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. ‘शिवानी टेकडी’ ही खूप निसर्गरम्य आहे. माथ्यावर दाट झाडी आहे. मी झाडाखाली बसून आकाश न्याहाळत होतो. अचानक चोहोबाजूंनी काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली.

आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकोळून गेली, झोंबणारे गार वारे चोहोकडून अंगावर आले नि टपटप टपटप टपोर थेंब बरसू लागले. मी छत्री नेली नव्हती, त्यामुळे यथेच्छ सचैल भिजायचे मी ठरवले. आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो. झाडांच्या फांदया घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती. घरट्यांतले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडीचूप होते.

पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती नि आषाढमेघ मल्हार राग गात होते. मी डोळ्यांत ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होता. सडींचा तंबोरा लागला होता. मला वाटले मीपण त्या वृक्षराजीतले एक झाड आहे आणि मला आषाढमेघाचे फळ फुटले आहे. सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे.

प्रश्न आ.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर…’ या विषयावर निबंध लिहा.
उत्तर :
आषाढघनाचे आगमन झाले नाही तर?
मध्यंतरी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती. माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे. निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसेल ना? गेली दहा हजार वर्षे माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा ओरबाडतो आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. त्याचा बदला तर नाही ना हा? आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे! सध्याचाच ताप पाहा आधी. तापमानाचा पारा 40° ला स्पर्श करीत आहे. आता पाऊस येईल तेव्हाच गारवा. त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर? अरे देवा! पण तो आलाच नाही तर?आषाढघनाचे दर्शनच घडले नाही तर?

परवाच बा. भ. बोरकर यांची कविता वाचत होतो. वाचता वाचता हरखून गेलो होतो. या पावसाळ्यात जायचेच, असा आमच्या घरात बेत आखला जात होता. गावी जायला मिळाले, तर आषाढघनाने नटलेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहता येईल. कोमल, नाजूक पाचूच्या रांगांची हिरवीगार शेते, पोवळ्याच्या रंगाची लाल माती, रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे, सोनचाफा, केतकी, जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल, हे खरे आहे. पण पाऊसच नसेल तर?

आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना. गडगडाटासह धो धो कोसळणाऱ्या पावसाचा महिना. कधी कधी हे आषाढघन रौद्ररूप धारण करतात. गावेच्या गावे जलमय होतात. डोंगरकडे कोसळतात. घरे बुडतात. गटारे ओसंडून वाहतात. सांडपाण्याची, मलमूत्राची सर्व घाण रस्तोरस्ती पसरते. घराघरात घुसते. मुकी जनावरे बिचारी वाहून जातात. हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत, अशी भीषण संकटे समोर उभी ठाकतात. दैनंदिन जीवन कोलमडून पडते. रोगराईचे तांडव सुरू होते. पाऊस नसेल, तर हे सर्व टळेल, यात शंकाच नाही.

मात्र, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे. तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल. समुद्राचे पाणी वापरण्याजोगे करण्याचे कारखाने सुरू होतील. त्यामुळे प्यायला पाणी मिळेल. काही प्रमाणात शेती होईल. पण हे जेवढ्यास तेवढेच असेल. सर्वत्र पाऊस पडत आहे. रान हिरवेगार झाले आहे. फळाफुलांनी झाडे लगडली आहेत, अशी दृश्ये कधीच आणि कुठेही दिसणार नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे असेल फक्त.

समुद्रातून पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा असेल. त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल. उपासमार मोठ्या प्रमाणात होईल. दंगली घडतील. लुटालुटीचे प्रकार सुरू होतील. थोडकीच माणसे शिल्लक राहिली, तर ती जगूच शकणार नाहीत. इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत. माणूस फक्त स्वत:साठी पाणी मिळवील. पण उरलेल्या प्राणिसृष्टीचे काय? ही प्राणिसृष्टी माणसांवर चाल करून येईल. वरवर वाटते तितके जीवन सोपे नसेल. माणसांचे, प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील. त्यांतून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल. एकूण काय? ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल.

पाऊस नसेल, तर वीजही नसेल. एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील. पाणी नसल्यामुळे शेती नसेल. फळबागाईत नसेल. नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील, इथपर्यंत ठीक आहे. पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल. या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील. बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील. त्यातून प्रचंड अराजकता माजेल. याची भाषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही. अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल. उरेल फक्त रखरखीत, रणरणते वाळवंट. सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना?

नको, नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने! एकच चिरकालिक सत्य आहे. ते म्हणजे पाऊस हवा, आषाढघन बरसायला हवाच!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

उपक्रम :

अ. पाच निसर्गकवितांचे संकलन करा आणि त्याचे वर्गात प्रकट वाचन करा.
आ. पावसाशी संबंधित पाठ्यपुस्तकाबाहेरील पाच कवितांचे सादरीकरण करा.

तोंडी परीक्षा.

रे थांब जरा आषाढघना’ या कवितेचे प्रकट वाचन लयीत करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Additional Important Questions and Answers

व्याकरण

वाक्यप्रकार :

प्रश्न 1.
क्रियापदाच्या रूपानुसार पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :

  1. मुले शाळेत गेली. → [ ]
  2. ती खिडकी लावून घे. → [ ]
  3. विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. → [ ]
  4. मला जर सुट्टी मिळाली, तर मी गावी जाईन. → [ ]

उत्तर :

  1. स्वार्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. विध्यर्थी वाक्य
  4. संकेतार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

प्रश्न 1.
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
1. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री! (विधानार्थी करा.)
2. तू नियमित अभ्यास करावास. (आज्ञार्थी करा.)
उत्तर :
1. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला.
2. तू नियमित अभ्यास कर.

समास :

प्रश्न 1.
‘विग्रहावरून सामासिक शब्द लिहा :

  1. ज्ञानरूपी अमृत/ज्ञान हेच अमृत. → [ ]
  2. जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. → [ ]
  3. तीन कोनांचा समूह. → [ ]
  4. क्रमाप्रमाणे. → [ ]

उत्तर :

  1. ज्ञानामृत
  2. जितेंद्रिय
  3. त्रिकोण
  4. यथाक्रम

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

प्रयोग :

पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. शेतकऱ्याने कणसाला मातीतून उपटले. → [ ]
  2. कवी पावसाचे वर्णन करतो. → [ ]
  3. केशवने गाणे गायिले. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

अलंकार :

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी → [ ]
2. हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. → [ ]
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

रे थांब जरा आषाढघना Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

आषाढ महिन्यातील पावसामुळे चोहीकडे बहरलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद खुद्द आषाढमेघाने घ्यावा, अशी विनवणी करताना कवी म्हणतात – हे आषाढ मेघा, जरासा थांब. तुझ्या करुणेमुळे निर्माण केलेले सृष्टिसौंदर्य तुझ्यासह मला डोळे भरून पाहू दे. कोवळ्या नाजूक पाचूसारखी दिसणारी ही हिरवीगार शेते, पोवळ्यासारख्या लाल मातीमध्ये चालणारी नांगरणी, इंद्रनील रत्नासारखी ही बांबूची बने, हे सर्व सौंदर्य म्हणजे धरतीवर उमटलेल्या तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने ही सुवासिक केतकी रोमांचित झाली आहे. नव्याने फुललेली सोनचाफ्याची कळी झुलते आहे. तुला पुन्हा पुन्हा चोरून बघताना या जाईच्या मुली लाजून चूर झाल्या आहेत.

थोडीशी (न बरसता) उघडीप करून हे सूर्याचे घर उघडून खुले कर, हे आकाश स्वच्छ दिसू दे. तुझ्या जादूने नवीन कोवळे हळदीच्या रंगाचे ऊन धरतीवर येऊ दे. ताटावर झुलणारे कणसाचे दाणे तुझ्या पौष्टिक दुधाने भरू देत आणि फुलांच्या देठात अलवार कोवळा मध साठू दे. आनंदाच्या गोड गाण्याचे बोल पक्ष्यांच्या गळ्यात येऊ देत. पक्ष्यांच्या किलबिल स्वरांनी गवत पात्यांवर आनंदाचा शहारा फुलू दे.

आश्लेषा नक्षत्रातील पावसाच्या अमाप थेबांची अंघोळ करणारी फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत राहू देत. भर दुपारी रत्नांची किरणे उधळीत ही एकत्र भिरभिरणारी फुलपाखरे या वनराईला निळ्या रंगात बुडवू दे.

काळोखाचे अश्रू पिऊन, ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत झाडांच्या कोवळ्या पानांतून उमललेल्या काजव्यांशी मला गुजगोष्टी करू दे. पाण्यात तरंगणाऱ्या चंद्रबिंबाचे सौंदर्य न्याहाळीत मला काजव्यांशी हितगूज करू दे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

शब्दार्थ :

  1. घन – ढग, मेघ.
  2. दिठी – दृष्टी, नजर.
  3. करुणा – दया.
  4. प्रवाळ – पोवळे; (एक लाल रत्न).
  5. औत – नांगर.
  6. वेळूची बेटे – बांबूचे वन, पदविन्यास
  7. खुणा – पाऊलखुणा.
  8. रोमांचित – शहारलेली, सुखद शहारा आलेली.
  9. गंध – सुवास.
  10. सोनचंपक – सोनचाफा.
  11. लेकी – मुली.
  12. तुज – तुला.
  13. गगन – आकाश.
  14. घडिभर – थोडा वेळ.
  15. आसर – उघडीप, पाऊस थोडा वेळ थांबणे.
  16. वासरमणी – सूर्य.
  17. तव – तुझ्या.
  18. किमया – जादू.
  19. हळव्या – हळदीच्या पिवळ्या रंगांचे.
  20. कणस – कणीस.
  21. जिवस – पौष्टिक.
  22. अरळ – अलवार, कोमल.
  23. कंठ – गळा.
  24. खग – पक्षी.
  25. मधुगान – गोड, सुरेल गीत.
  26. तृणपर्ण – गवताचे पाते.
  27. तुषार – शिंतोडे.
  28. स्नान – अंघोळ.
  29. पिसोळी – फुलपाखरू.
  30. रत्नकळा – रत्नाचे तेज.
  31. माध्यान्ह – भर दुपार.
  32. न्हाणोत – भिजवत.
  33. इंद्रवर्ण – निळा रंग.
  34. वन – बन, रान.
  35. पीत – पिऊन.
  36. आसवे – अश्रू.
  37. हितगुज – मनातील गोष्ट, मनोगत.
  38. त्यांसवे – त्यांच्याबरोबर.
  39. निरखीत – न्याहाळत, पाहत.
  40. जळ – पाणी.
  41. विधुवदन – चंद्रबिंब.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

टिपा :

  1. आषाढ-चौथा मराठी महिना.
  2. पाचू-हिरवे रत्न.
  3. प्रवाळ-(लाल रंगाचे) पोवळे (रत्न).
  4. इंद्रनीळ – निळ्या रंगाचे रत्न.
  5. केतकी-केवड्याचे झाड (फुले).
  6. चंपक, जाई-फुलांची नावे.
  7. आश्लेषा-एक पावसाळी नक्षत्र.
  8. पालवी-कोवळी पाने.

Maharashtra State Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions

Ayushya Anandacha Utsav Class 12 Marathi Chapter 3 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 3 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

आयुष्य… आनंदाचा उत्सव 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न अ.
कृती करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 3
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 4

आ. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

प्रश्न 1.

  1. यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
  2. पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
  3. शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
  4. यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
  5. ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.

उत्तर :

  1. योग्य
  2. अयोग्य
  3. अयोग्य
  4. योग्य
  5. योग्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

इ. हे केव्हा घडेल ते लिहा.

प्रश्न 1.

  1. माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा …….
  2. माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा …….
  3. आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा ……..
  4. एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा ……

उत्तर :

  1. माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो.
  2. माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा तो दुःखाला स्वत:च्या मनाबाहेर जाऊ देत नाही.
  3. आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हांला पडते.
  4. एका वेगळ्या विश्वात वावरता येते, जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो.

2. अ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

प्रश्न 1.
मनाची कवाडं-
उत्तर :
मनाची कवाडं : मनाची कवाडं म्हणजे मनाची दारे. घराचे दार उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो. घरातले विश्व चार भिंतीच्या आतले असते. ते संकुचित असते. बाहेरचे जग अफाट असते. दार आपल्याला अफाट जगात नेते. मनाची दारे उघडली, तर म्हणजे मन मोकळे ठेवले, तर आपण व्यापक जगात प्रवेश करतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.
आनंदाचा पाऊस-
उत्तर :
आनंदाचा पाऊस : मनात दुःख, चिंता असेल, तर आनंद मनात शिरत नाही. आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते. मन मोकळे ठेवले तर आनंद भरभरून मनात शिरतो. यालाच आनंदाचा पाऊस म्हटले आहे.

आ. खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. आनंदाला आकर्षित करणारा – [ ]
  2. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू – [ ]
  3. बाहेर दाराशी घुटमळणारा – [ ]
  4. आनंदाला प्रसवणारा – [ ]
  5. आनंद अनुभवण्याची निमित्तं – [ ] [ ]

उत्तर :

  1. आनंदाला आकर्षित करणारा – आनंद
  2. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू – श्वास
  3. बाहेर दाराशी घुटमळणारा – आनंद
  4. आनंदाला प्रसवणारा – आनंद
  5. आनंद अनुभवण्याची निमित्तं – यश वैभव

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

प्रश्न 1.

  1. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? …………………….
  2. ‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! …………………….
  3. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. …………………….

उत्तर :

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य.

आ. योग्य पर्याय निवडा व लिहा.

प्रश्न 1.
माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य
(अ) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.
(आ) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
(इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.
(ई) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
उत्तर :
(इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.
हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य
(अ) हा आनंद कुठे नसतो?
(आ) हा आनंद कुठे असतो?
(इ) हा आनंद सर्वत्र नसतो का?
(ई) हा आनंद सर्वत्र असतो का?
उत्तर :
(अ) हा आनंद कुठे नसतो?

प्रश्न 3.
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य
(अ) ती आतून हसतात.
(आ) ती फार हसतात आतून.
(इ) ती आतून हसत राहतात.
(ई) ती खूप आतून हसतात.
उत्तर :
(ई) ती खूप आतून हसतात.

इ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 5
उत्तर :

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
झुणका भाकरझुणका, भाकर वगैरेसमाहार द्वंद्व
सूर्यास्तसूर्याचा अस्तविभक्ती तत्पुरुष
अक्षरानंदअक्षर असा आनंदकर्मधारय
प्रतिक्षणप्रत्येक क्षणालाअव्ययीभाव

ई. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.

  1. स्वत:च्या आवडीचे काम निवडा ………..
  2. लोकांना पेढे वाटणं वेगळं ………..
  3. कष्टाची भाकर गोड लागते ………..

उत्तर :

  1. स्वत:च्या आवडीचे काम निवडा. कर्तरी प्रयोग
  2. लोकांना पेढे वाटणं वेगळं. भावे प्रयोग
  3. कष्टाची भाकर गोड लागते. कर्तरी प्रयोग

उ. ‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
…………. ………… ………….. ………… …………
उत्तर :

  1. खरा (आनंद)
  2. आत्मिक (आनंद)
  3. अनोखा (आनंद)
  4. वेगळा (आनंद)
  5. टिकाऊ (आनंद).

4. स्वमत.

प्रश्न अ
‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर :
शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो, हे खरे आहे. काही वेळा आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात, ती शाखा आपण निवडतो. कालांतराने आपली आपल्याला चूक उमगते. पण उशीर झालेला असतो. त्यानंतर काहीही करता येत नाही. निराश मनाने आपण शिक्षण घेतो अणि आयुष्यभर तशाच मन:स्थितीत जीवन जगत राहतो. त्यात सुख अजिबात नसते.

शिक्षणानंतर नोकरी-व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो. इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. या वेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो.

मात्र इथेही एक अडचण असतेच. पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले, तरी नोकरी-व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात. पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी काय करायचे?

अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे? कसे करायचे? तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे, त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्ये पणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. तसेच, एवढे प्रयत्न अपुरे पडले तर आपले काम उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली, तर नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे, असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न आ.
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ति – व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल, हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता.

एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेक गाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. यातून त्याला कोणता आनंद मिळत असेल? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.

व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला, तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.

व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. या विविधतेची बूज राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.

प्रश्न इ.
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
एखादया दिवशी आपल्याला नको असलेला माणूस भेटतो. “कशाला भेटली ही ब्याद सकाळी सकाळी!” असे आपण मनातल्या मनात म्हणतो. तरीही आपण तोंड भरून हसत स्वागत करतो. आपल्या बोलण्यात, हसण्यात खोटेपणा भरलेला असतो. हे असे बऱ्याच वेळा होते. आपण खोटेपणाने जगतो. भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आनंद होतच नाही.

आनंदाचा, सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही; कारण आपले मन आधीच राग, द्वेष, मत्सराच्या भावनांनी भरलेले. अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊच शकत नाही. मन ढगाळलेले असले की तेथे स्वच्छ सूर्यप्रकाश येऊच शकत नाही.

आनंदाचा, सुखाचा अनुभव मिळण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे. कुत्सितपणा, द्वेष, मत्सर, हेवा असल्या कुभावनांपासून मन मुक्त हवे. जेथे कुभावनांची वस्ती असते, तेथे निर्मळपणा अशक्य असतो. निर्मळपणा असला की मन मोकळे होते. स्वच्छ होते. अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो. आपल्याला खरे सुख, खरा आनंद हवा असेल, तर मन स्वच्छ, मोकळे असले पाहिजे; कुभावनांना तिथून हाकलले पाहिजे.

आमच्या शेजारी सिद्धा नावाची बाई राहते. सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी दाट किल्मिषे भरलेली आहेत. अमिताविषयी बोलताना ती सर्व किल्मिषे जळमटांसारखी सिद्धाच्या तोंडून बाहेर पडतात. सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहूच शकत नाही. साहजिकच अमिताच्या सहवासाचा सिद्धाचा अनुभव कधीही सुखकारक, आनंददायक नसतो.

ज्या ज्या वेळी अमिताविषयी बोलणे निघते, त्या त्या वेळी सिद्धाचे मन कडवट होते. मनात कुभावनांचे ढग घेऊन वावरण्यामुळे सिद्धाला आनंद, खराखुरा आनंद मिळूच शकत नाही. लेखकांनी ‘आनंदाच खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं,’ असे म्हटले आहे, ते खरेच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न ई.
‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
उत्तर :
प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे; हे अगदी खरे आहे. आपण हे भान बाळगत नाही. त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले, तरी हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लीलया चुकवत चुकवत जातो. खो-खोमध्ये किती चपळाई दाखवतो आपण! आपण सवयीने या हालचाली करतो.

त्यामुळे त्यांतली किमया आपल्या लक्षातच येत नाही. ‘चक दे इंडिया हा चित्रपट पाहताना है खूपदा लक्षात आले आहे. सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. ‘हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो,’ ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो. शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते. पण पावले नीट पडत नाहीत. आपण मनातल्या मनात खटू होतो. पण शरीराची जाणीव असेल, तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात. तिथेच आपली चूक होते.

खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे. कोणाही समोर जातो, तेव्हा हेच लक्षात ठेवले पाहिजे. आपण इतरांसमोर स्वत:ला सादर करीत असतो. ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे. आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे. तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो.

अभिनेते, खेळाडू अनेक कसलेले सादरकर्ते डौलदार का दिसतात? एखादी अभिनेत्री फोटोसाठी उभी राहते, तेव्हा तीच लक्षणीय का दिसते? ही सगळी माणसे आपल्या देहाचे, आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात. आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात. ती स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतातही. हेच सुख असते. त्यातच आनंद असतो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम टाकायचे पाऊल म्हणजे स्वत:च्या शरीरावर प्रेम करणे. आपण स्वत: असे प्रेम करायचेच; पण इतरांनाही तो मार्ग शिकवायचा.

स्वत:च्या शरीरावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? शरीर नीटनेटके, स्वच्छ व प्रसन्न राखायचे. आपल्याला पाहताच कोणालाही आनंद झाला पाहिजे. त्याला प्रसन्न वाटले पाहिजे. त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत. आहार विचारपूर्वक घ्यायचा, व्यसने करायची नाहीत, दरोज नियमितपणे योगासने किंवा अन्य व्यायाम किंवा रोज तीन-चार किमी चालणे. कामासाठी चालणे यात मोजायचे नाही. काहीही करण्यासाठी नव्हे, तर चालण्यासाठी चालायचे. चालणे हेच काम समजायचे.

मनात ईर्षा, असूया, हेवा, मत्सर, सूड अशा कुभावना बाळगायच्या नाहीत. आपले मन या भावनांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणजे चांगले होण्यासाठी स्वत: कोणत्या तरी एका क्षेत्रात, एखाद्या कौशल्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे अन्य कोणाहीबद्दल मनात कुभावना बाळगण्याची इच्छाच होणार नाही.

यश, वैभव मिळवण्याचा प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही. मात्र यश, वैभव या गोष्टी बाह्य असतात. आत्मिक समाधानाशी संबंध नसतो. म्हणून यश, वैभव मिळाल्यावरही मन अशांत, अस्वस्थ होऊ शकते. अशा वेळी आणखी यश, आणखी वैभव यांच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे. याचा शोध घेतला पाहिजे.

मात्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. पैशाने खरा, टिकाऊ आनंद कधीही मिळवता येत नाही. आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला घ्यावे. आवडेल त्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय पत्करावा. अर्थात, प्रत्येकाला स्वत:च्या आवडीप्रमाणे नोकरी, व्यवसाय मिळेलच असे नसते. अशा वेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे.

एवढी पथ्ये प्रामाणिकपणे पाळली तर आपण खऱ्या आनंदाच्या जवळ असू.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न आ.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
उत्तर :
जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करीन. त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत. तर काही मानसिक पातळीवरील आहेत.

शारीरिक पातळीवरील कृतींपैकी सर्वांत महत्त्वाची कृती म्हणजे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे. स्वत:च्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वत:च्या शरीरावर मनापासून प्रेम केले पाहिजे. स्वतःचे शरीर नीटनेटके, देखणे राखायचे, इतके की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदित, प्रसन्न झाली पाहिजे. शरीर फक्त बाह्यतः सजवून ते देखणे होणार नाही. ते सतेज, सुदृढ व निरोगी राखले पाहिजे. त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन. नियमित व जीवनसत्त्वयुक्त आहाराचा अवलंब करीन. व्यसनांपासून चार हात दूरच राहीन.

शरीराबरोबरच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन. मी अत्यंत चिकाटीने गायन, वादन, नर्तन, साहित्य, चित्रपट, नाट्य यांपैकी एका तरी कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन. शक्यतो एखादी कला आत्मसात करीन. माझी स्वत:ची बौद्धिक, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझे यशाचे लक्ष्य निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन. अर्थात मला हेही ठाऊक आहे की केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही. साफल्याचा आनंद भौतिक यशाने पूर्णांशाने मिळत नाही. म्हणून कला क्रीडा-ज्ञान या क्षेत्रांत उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करीन.

नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत आवडीचेच क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही. मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन. आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवायचा प्रयत्न करीन. तसे नाही मिळाले, तर मिळालेले काम अत्यंत आवडीने करीन. मी घेतलेल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान माझ्या नोकरी-व्यवसायात वापरीन.

मला तर खात्रीने वाटते की माझा हा बेत यशस्वी झाला, तर मला सुखीसमाधानी आयुष्य मिळेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

उपक्रम :

प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.

तोंडी परीक्षा.

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

1. आभाळाकडे डोळे लावणे.
2. विसर्ग देणे.

आ. ‘माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 6
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 7

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 9

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 10
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 11

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 12
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 13

पुढील चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. एक अद्भुत सत्य [ ]
  2. आनंदाच्या झऱ्याच्या उगमाचे ठिकाण : [ ]
  3. आनंदाच्या चक्रवाढीवर फिरणारे [ ]
  4. एखादया ध्येयाने, स्वप्नाने झपाटणे [ ]

उत्तर :

  1. एक अद्भुत सत्य – आपले अस्तित्व
  2. आनंदाच्या झऱ्याच्या उगमाचे ठिकाण – आपले मन
  3. आनंदाच्या चक्रवाढीवर फिरणारे – आयुष्याचे चक्र
  4. एखादया ध्येयाने, स्वप्नाने झपाटणे – माणसाचे जगणे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.

  1. मनाची कवाडं कायमची बंद करणारा [ ]
  2. निरागस, आनंदी वृत्तीची [ ]
  3. आनंदाची इस्टेट [ ]
  4. आयुष्यभर न संपणारा [ ]
  5. शहाणंसुरतं करणारा [ ]
  6. कलेच्या मस्तीत जगणारे [ ]

उत्तर :

  1. मनाची कवाडं कायमची बंद करणारा : – दुःखी माणूस
  2. निरागस, आनंदी वृत्तीची : – लहान मुले
  3. आनंदाची इस्टेट – शास्त्रीय संगीत
  4. आयुष्यभर न संपणारा – शिकण्यातला आनंद
  5. शहाणंसुरतं करणारा – वाचनाचा छंद
  6. कलेच्या मस्तीत जगणारे – कलावंत

योग्य की अयोग्य ते लिहा :

प्रश्न 1.

  1. मनावरचे ताण नाहीसे होणे हे आनंदाचे लक्षण [ ]
  2. आपल्याला दृष्टी लाभली आहे, हे आपण विसरतो [ ]
  3. आत्म्याच्या भाषेत गाता आले नाही तरी ऐकता येऊ शकते. [ ]
  4. वाचन माणसाला शहाणे करते. [ ]

उत्तर :

  1. योग्य
  2. अयोग्य
  3. योग्य
  4. योग्य

पुढील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :

प्रश्न 1.
आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं.
उत्तर :
आपला श्वास, आपला दिवस-रात्र, सूर्योदय-सूर्यास्त वगैरेंकडे आपण लक्षपूर्वक कधी बघतच नाही. म्हणजे आपले अनुभव आपण लक्षपूर्वक घेत नाही. आपण ते सर्व गृहीतच धरतो. आपल्याला दृष्टी आहे, याचेही आपल्याला भान नसते. त्यामुळे आपल्याभोवती पसरलेल्या सुंदर सृष्टीचे आपल्याला कौतुक वाटत नाही. ही सृष्टी जिच्यामुळे आपल्याला दिसते, त्या आपल्या दृष्टीचेही आपल्याला कौतुक वाटत नाही. साहजिक आपले अस्तित्व आणि त्या अस्तित्वामुळे लाभलेला आनंद हे दोन्ही दुर्लक्षित राहतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

चूक की बरोबर लिहा :

प्रश्न 1.
1. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर पोसला जात नाही. [ ]
2. खऱ्या आनंदात असलेल्या व्यक्तीला जग सुंदर दिसतं. [ ]
उत्तर :
1. बरोबर
2. बरोबर

हे केव्हा घडेल ते लिहा

प्रश्न 1.
दु:खासाठी आपण भरपूर कारणे शोधतो, जेव्हा …………..
उत्तर :
दुःखासाठी आपण भरपूर कारणे शोधतो, जेव्हा आपल्याला आनंद दयायला वेळच नसतो.

प्रश्न 2.

  1. माणसे स्वत:चा छंद कधीही विसरत नाहीत, जेव्हा …………
  2. तुम्ही स्वत:च्या अंत:करणात हलकेच डोकावू शकता, जेव्हा ……….
  3. तुम्ही वर्तमानात जगू शकता, जेव्हा ………….

उत्तर :

  1. माणसे स्वत:चा छंद कधीही विसरत नाहीत, जेव्हा त्याचा उद्देश केवळ आनंद मिळवणे हाच असतो.
  2. तुम्ही स्वत:च्या अंत:करणात हलकेच डोकावू शकता, जेव्हा तुम्ही एकटे असता.
  3. तुम्ही वर्तमानात जगू शकता, जेव्हा भूतकाळाची स्मृती व भविष्यकाळाची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होते.

वाक्ये पूर्ण करा :

प्रश्न 1.
1. चिंता, टेन्शन यांच्या दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही; कारण ……………..
2. लहान मुले आनंद घेण्यात तरबेज असतात; कारण ………….
उत्तर :
1. चिंता, टेन्शन यांच्या दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही; कारण त्याला मोकळी जागा हवी असते.
2. लहान मुले आनंद घेण्यात तरबेज असतात; कारण ती निरागस व आनंदी वृत्तीची असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

विधाने पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. आपल्याला काय हवे, हे शोधणे हेच ……..
  2. कष्टाचे गोड हे अधिक गोड लागते, जर त्यात …………
  3. मुळात आनंदच शून्य असेल, तर शून्याला ………..
  4. आनंद जर ‘मानता’ येत असेल, तर तो …………….

उत्तर :

  1. आपल्याला काय हवे, हे शोधणे हेच आपण आनंदी का नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधणे होय.
  2. कष्टाचे गोड हे अधिक गोड लागते, जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल.
  3. मुळात आनंदच शून्य असेल, तर शून्याला कितीही मोठ्या यशाने किंवा पैशाने गुणले तरी गुणाकार शून्यच.
  4. आनंद जर ‘मानता’ येत असेल, तर तो ‘मिळवण्याचा’ प्रयत्न कशाला करायचा?

अलंकार :

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. हे हृदय नसे, परि स्थंडिल धगधगलेले → [ ]
2. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर → [ ]
उत्तर :
1. अपन्हुती अलंकार
2. अतिशयोक्ती अलंकार

आयुष्य… आनंदाचा उत्सव Summary in Marathi

पाठ परिचय :

प्रस्तुत पाठ म्हणजे ‘मजेत जगावं कसं?’ या गाजलेल्या पुस्तकातील एक लेख आहे. जीवन आनंदात कसे जगावे, हे सांगण्याचा या लेखात लेखकांनी प्रयत्न केला आहे.

आनंद हा यांत्रिकपणे, खूप प्रयत्न करून किंवा पैसे देऊन मिळत नाही. स्वतःचे मन, अंत:करण आनंदी ठेवले पाहिजे. तरच आनंद मिळतो. स्वत:च्या मनातील सर्व किल्मिषे, सर्व नकारात्मक भाव काढून टाकले, तर मन शुद्ध होते. शुद्ध मन हाच आनंदाचा स्रोत असतो.

कला, साहित्य व निसर्गसहवास यांच्या माध्यमातून आपण स्वत:चे मन शुद्ध करू शकतो. ही क्षेत्रे आनंदाला पूरक अशी मनोवृत्ती निर्माण करतात.

शब्दार्थ :

  1. शाश्वत – चिरकालिक, चिरंतन, अविनाशी.
  2. कळसा – नळ लावलेली मातीची घागर.
  3. निखळ – पवित्र, शुद्ध, निर्भेळ.
  4. ईर्षा – चुरस, चढाओढ, हेवा.
  5. असूया – द्वेष, मत्सर.
  6. वैषम्य – खेद, दुःख, विषमता.
  7. कवाडे – घराची किंवा खिडक्यांची दारे.
  8. जडणे – सांधणे, कोंदणात बसवणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. आटापिटा करणे – खटाटोप करणे, खूप कष्टाने प्रयत्न करणे.
  2. मनाची कवाडे बंद करणे – मन मोकळे न ठेवणे, पूर्वग्रहदूषित वृत्ती बाळगणे.
  3. (एखाद्या गोष्टीत) रंगून जाणे – विलीन होण, पूर्णपणे मिसळून जाणे.

Maharashtra State Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions

Roj Matit Class 12 Marathi Chapter 2 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 2 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 2 रोज मातीत Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

रोज मातीत 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 2 रोज मातीत Textbook Questions and Answers

कृती 

1. अ. कृती करा

प्रश्न अ.
कृती करा
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत 1.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत 2

आ. संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.

प्रश्न आ.

‘अ’ गट‘ब’ गट
1. नाही कांदा गं जीव लावते(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
2. काळ्या आईला, हिरवे गोंदते(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहत.
3. हिरवी होऊन, मागं उरते(इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. नाही कांदा गं जीव लावते(इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.
2. काळ्या आईला, हिरवे गोंदते(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
3. हिरवी होऊन, मागं उरते(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.

2. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
उत्तर :
कष्टकरी शेतकरी स्त्री शेतमळ्यामध्ये खणलेल्या चरात कांद्याची रोपे लावते. ते कांदे नव्हतेच; जणू ती स्वत:चा जीव कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत आर्त शब्दांत व्यक्त केले आहे.

काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे. शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते. म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री ‘आई’ असे संबोधते. लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते. ती तिची ‘काळी आई’ आहे. या काळ्या मातीवर स्वत:च्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते. तेव्हा या काळ्या-आईचे आपण पांग फेडले, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.

पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदण अशी हृदय कल्पना कवयित्रींनी केली आहे. स्त्रीसुलभ नितळ, प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे. शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळींतून समर्पकरीत्या प्रकट झाला आहे.

प्रश्न आ.
‘नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री कल्पना दुधाळ यांनी ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दांत चित्रित केले आहे.

शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वत:चे मन त्यात दाबते. स्वत:ला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे.

शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते, त्याचे वर्णन करताना ‘मन दाबणे’ हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयित्रीने या ओळीत व्यक्त केले आहे. काडी-काडी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

4. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यशोचित शब्दांत केले आहे. उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्र हृदय शब्दांत केले आहे.

काव्यसौंदर्य : शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेतजमिनीत अहोरात्र खपत असते. ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते. मन दाबून उसांची कांडे जमिनीत पुरते. हे कष्ट भर उन्हात, उन्हाची पर्वा न करता अविरत करीत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते, तेव्हा जणू या हिरवेपणात तिचे कष्टच उगवून आलेले असतात. खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाजते. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीत नांदत असते.

भाषासौंदर्य : अतिशय साध्या, सोज्ज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरला आहे. नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे. त्यातल्या ‘हिरवे होऊन मागे उरणे’, ‘रोज मातीत नांदणे’ या प्रतिमा काळीज हेलावून टाकणाऱ्या आहेत. या कवितेत प्रत्ययकारी शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर :
‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दांत केले आहे. कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यातील सरीत कांदे लावते. जीव ओतून काम करते. काळ्या मातीला हिरव्या गोंदणाने सजवते. सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून, त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते.

उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते. जणू ती स्वत:चे मनच त्यात दाबते. काड्या-काड्या जमवून आपला संसार सांधते. उन्हातान्हात दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न पाहते. विहिरीचे पाणी शेंदन काढते. अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते. काळ्या आईच्या कुशीत हिरवेगार पिकाचे स्वप्न पाहत मातीतच नांदत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

प्रश्न आ.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर :
आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे. या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात. पहाटे पहाटे आपापल्या खोपटात चुलीवर जेवण करतात. जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो. त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी-भाकरी करीत असतात. लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून नि छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात.

कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात. ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात अन् मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते. न थकता ओझे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमानेइतबारे दिवसभर उन्हातान्हात पायऱ्यांवरून चढ-उतार करून आपले काम नेटाने करतात.

दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ-भाकर खाऊन तिथल्याच एखादया नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून त्यांचे ओझी उचलणे सुरू होते. दिवस सरून गेल्यावर जड पावलांनी घरी परततात. मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात. पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल, रडणारे मूल व ‘आ’वासलेली भुकेली तोंडे हेच येते. काहीही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते.

उपक्रम :

प्रश्न अ.
शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

प्रश्न आ.
यू-ट्यूबवरील कवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफण’ ही कविता ऐका.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

तोंडी परीक्षा.

प्रश्न अ.
प्रस्तुत कवितेचे तालासुरात सादरीकरण करा.

प्रश्न आ.
प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत सांगा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 2 रोज मातीत Additional Important Questions and Answers

कृती 1:

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. हिरवं गोंदलेली जमीन → [ ]
  2. फुले कोणती → [ ]
  3. घरादाराला बांधलेले → [ ]
  4. काड्या-काड्यांनी सांधलेला → [ ]
  5. यातून पाणी शेंदते → [ ]

उत्तर :

  1. हिरवं गोंदलेली जमीन → काळी आई
  2. फुले कोणती → झेंडूची फुले
  3. घरादाराला बांधलेले → तोरण
  4. काड्या-काड्यांनी सांधलेला → संसार
  5. यातून पाणी शेंदते → विहिरीतून

व्याकरण

वाक्यप्रकार :

प्रश्न 1.
वाक्याच्या आशयानुसार पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :
1. काल फार पाऊस पडला. → [ ]
2. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? → [ ]
उत्तर :
1. विधानार्थी वाक्य
2. प्रश्नार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

प्रश्न 1.
कंसांतील सूचनांप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
1. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? (विधानार्थी करा.)
2. ही इमारत फारच उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
उत्तर :
1. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो.
2. बापरे! केवढी उंच ही इमारत!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
1. घरोघर → ……………..
2. अहोरात्र → ……………
उत्तर :
1. घरोघर → प्रत्येक घरी
2. अहोरात्र → (अह) दिवस आणि रात्र.

प्रयोग :

प्रश्न 1.
पुढील वाक्यांचे प्रयोग ओळखा :

  1. समीर चित्र रंगवतो. → [ ]
  2. कमलने बक्षीस मिळवले. → [ ]
  3. सैनिकाने शत्रूला पराभूत केले. → [ ]
  4. स्वाती गाणे म्हणते. → [ ]

उत्तर :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग।
  3. भावे प्रयोग
  4. कर्तरी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

अलंकार :

प्रश्न 1.
पुढील उदाहरणातील उपमेय व उपमाने ओळखा :

  1. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच.
    उपमेय → [ ] उपमान → [ ]
  2. नयन नव्हे हे पाकळ्या कमळाच्या.
    उपमेय → [ ] उपमान → [ ]

उत्तर :

  1. उपमेय → [आंबा] उपमान → [आंबा[
  2. उपमेय → [नयन] उपमान → [कमळ-पाकळ्या]

रोज मातीत Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

शेतामध्ये कष्ट उपसणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत व्यक्त करताना कवयित्री म्हणतात – शेतमळ्यामध्ये रोपे पेरण्यासाठी खोदलेल्या लांबलचक चरांमध्ये मी कांदयाची रोपे लावते आहे. हे कांदे नाहीत, तर मातीमध्ये पेरलेला हा माझा जीव आहे, प्राण आहे.

या माझ्या शेतातील काळ्या मातीला मी हिरव्या रोपांच्या रंगाने गोंदते आहे. गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. काळ्या मातीत हिरवे स्वप्न उसवते आहे. या शेतजमिनीतच माझा संसार आहे. या मातीतच मी नांदते आहे. सोन्यासारखी पिवळीधमक झेंडूची फुले तोडून मी परडीत गोळा करते. ही फुले नाहीतच; जणू माझे शरीर मी त्या देठापासून फुलांच्या रूपाने तोडते आहे.

खुडलेल्या टपोऱ्या झेंडूच्या फुलाची मी पताका करून, ती फुले माळेत गुंफून मी त्याचे तोरण घराच्या दाराला शुभचिन्ह म्हणून बांधत आहे. घरादाराचा असा उत्सव मी प्राणपणाने साजरा करते. मी या काळ्याभोर मातीत रोजची नांदत आहे, वावरत आहे.

उसाचे पीक येण्यासाठी वाफ्यातील चरात मी उसाची बारीक कांडे बियाणे म्हणून दाबून बसवते. खरे म्हटले तर ही उसांची कांडे नाहीतच, माझे मन मी त्यात दाबून बसवते आहे. मनापासून माझे मी शेतीचे काम आवडीने करते आहे.

काडी-काडी जोडून मी माझा प्रपंच सांधते आहे. म्हणजे कष्ट करून संसाराचा गाडा इमानाने स्वत:च्या हिमतीने ओढते आहे. संसारातील खस्ता खाते आहे. मी रोज या माझ्या प्रिय काळ्याशार मातीत नांदत आहे.

उन्हातान्हाची पर्वा न करता, मरणाची वेदना सहन करून मी रोज राबते आहे. जेव्हा पीक हिरवेगार होऊन काळ्या जमिनीत लहरेल, समृद्धीच्या रूपात मागे उरेन, तेव्हा या कष्टाचे फळ मला मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे. पिके हिरवीगार राहावीत व दाण्यांनी लगडावीत म्हणून मी खोल विहिरीत पोहरा टाकून पाणी उपसते व ते शेतात सोडते. अशा प्रकारे माझे हिरवे स्वप्न साकार होण्यासाठी मी दररोज या मातीत काया झिजवत आहे; कष्ट करीत आहे.

शब्दार्थ :

  1. वाफा – शेतमळा.
  2. नांदते – वावरते, आनंदाने स्थाईक होते.
  3. देह – शरीर.
  4. बेणं – बी, बियाणे, बीज.
  5. सांधते – जोडते.
  6. उन्हातान्हात – भर उन्हात.
  7. शेंदते – (आडातील पाणी) पोहऱ्याने उपसून काढते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

टिपा :

  1. सरी – रोप लावण्यासाठी खणलेले लांब चर.
  2. हिरवं गोंदण – हिरव्या पिकांनी ठसवलेली (जमीन).
  3. काळी आई – शेतकऱ्याची काळीभोर शेतजमीन.
  4. तोरण – शुभपताकांची माळ.
  5. झेंडू – एक प्रकारचे फूल.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. देह तोडणे – देह (शरीर) कष्टवणे.
  2. मन दाबणे – (मातीत) मन गाढणे, मनापासून कष्ट करणे.
  3. संसार सांधणे – प्रपंच सावरणे.
  4. पाणी शेंदणे – रहाटाद्वारे विहिरीचे पाणी उपसणे.

Maharashtra State Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions

Vegvashata Class 12 Marathi Chapter 1 Question Answer Maharashtra Board

12th Marathi Chapter 1 Exercise Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 1 वेगवशता Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

वेगवशता 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 1 वेगवशता Textbook Questions and Answers

कृती 

1. अ. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1. अ
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 2
उत्तर :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 3

आ. कृती करा.

प्रश्न 1. आ.
कृती करा
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 4.1

उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 5.1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 6.1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 7.1

इ. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ………………. .
उत्तर :
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते; कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 2.
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ………………… .
उत्तर :
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत.

2. अ. योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

प्रश्न 1.
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ………………….
अ. वाहन कामापुरतेच वापरले तर.
आ. वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर
इ. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
ई. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
उत्तर :
ई. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.

प्रश्न 2.
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे……………..
अ. स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
आ. वाहनाचा अतिवेग अंगीकारणे.
इ. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
ई. गरज नसताना वाहन वापरणे.
उत्तर :
इ. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

आ. वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 1
उत्तर :

अमेरिकाभारत
घरोघर, दरडोई वाहन उपलब्ध असते.अंतरे कमी आहेत.
रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न व एकमार्गीमाणसे खूप आहेत.
कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर मैल अंतरावर असतात.कामे फारशी नसतात.
दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो.महानगरे रेल्वेने जोडलेली आहेत.

3. खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न अ.
यथाप्रमाण गती ही गरज आहे ; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
उत्तर :
योग्य त्या प्रमाणात, आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरणे ही माणसाची गरज आहे. योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, अव्यवहार्य रितीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे.

प्रश्न आ.
आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
उत्तर :
सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात. थोड्या काळासाठीच जपून चालवतात. मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते. मग ते गरज असतानाच नव्हे, तर केवळ मौजमजा करण्यासाठीसुद्धा गाडीचा वापर करतात. हळूहळू त्यांना गाडीशिवाय कुठे जाताही येत नाही. पूर्णपणे ते गाडीवरच अवलंबून राहतात. हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे.

सुरुवातीला फक्त एकदाच, मग फक्त एकच. असे करता करता दिवसाला एक पाकीट कधी होते हे कळतच नाही. नंतर नंतर सिगारेट मिळाली नाही तर त्या व्यक्तीचे मनःस्वास्थ्यच नाहीसे होते. सिगारेटशिवाय ती राहू शकत नाही. ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते. तद्वतच माणसेही गाड्यांचे गुलाम होतात. त्यांच्या वापराबाबत माणसांना कोणतेही तारतम्य राहत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न इ.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
उत्तर :
वाहन हे सोयीसाठी असते. ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात. आपली कामे भराभर होतात. वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे. यापलीकडे आपल्या भावना गुंतवू नयेत. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो. उत्साह, उल्हास शरीरात सळसळतो. म्हणजे आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो, तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघातांची शक्यता निर्माण होते.

आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो. त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत.

एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.

4. व्याकरण.

अ. समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न अ.
समानार्थी शब्द लिहा.

  1. निकड –
  2. उचित –
  3. उसंत –
  4. व्यग्न –

उत्तर :

  1. निकड – गरज
  2. उचित – योग्य
  3. उसंत – सवड
  4. व्यग्र – गर्क

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

आ. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

प्रश्न आ.
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

  1. ताणतणाव –
  2. दरडोई –
  3. यथाप्रमाण –
  4. जीवनशैली –

उत्तर :

  1. ताणतणाव – ताण, तणाव वगैरे → समाहार व्वंद्व
  2. दरडोई – प्रत्येक डोईला → अव्ययीभाव
  3. यथाप्रमाण – प्रमाणाप्रमाणे → अव्ययीभाव
  4. जीवनशैली – जीवनाची शैली → विभक्ती तत्पुरुष

इ. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

प्रश्न इ.
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

  1. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
  2. आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
  3. निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)

उत्तर :

  1. किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात!
  2. आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत.
  3. माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

5. स्वमत.

प्रश्न अ.
‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात. तीसुद्धा कमी अवधीत. कामांशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावे लागते. मोठमोठी अंतरे कापावी लागतात. चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो.

फक्त एका-दोघांना किंवा फक्त काहीजणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात. आपण चालत चालत जाऊन कामे करतो, तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. इकडे-तिकडे वळणे, खाली वाकणे, वर पाहणे, मागे पाहणे, हात वर-खाली करणे, पाय दुमडून बसणे.

पाय लांब करून बसणे, उकिडवे बसणे अशा कितीतरी लहान लहान कृतींतून शारीरिक हालचाली घडत असतात. या हालचालींमुळे शरीराच्या सगळ्याच स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. शरीर लवचीक बनते. आपण या हालचाली सहजगत्या, एका लयीत करू शकतो. एक सुंदर, नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र, सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे हालचालींना आपण मुकतो.

शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्याधींना सुरुवात होते. दुःखे, कटकटी भोगाव्या लागतात. पैसा, वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न आ.
‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर :
माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते. सर्वजण उल्हसित मन:स्थितीत असतात. सगळ्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो. वाहनचालकाला हळूहळू सुरसुरी येते. तो हळूहळू वेग वाढवू लागतो. सर्वजण उत्तेजित होतात. गाडीचा वेग वाढतच जातो. मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात.

चालक हळूहळू बेभान होतो. अन्य गाडीवाले सामान्य आहेत, कमकुवत आहेत, आपण सम्राट आहोत, अशी भावना मनातून उसळी घेऊ लागते. अशा मन:स्थितीत माणूस विवेक गमावतो. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मन:स्थिती अनुकूल नसते. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवटून वाहनावर केंद्रित करावे लागते. हात आणि पाय यांच्या हालचाली अचूक जुळवून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवावी लागते.

क्लच, ब्रेक, अक्सलरेटर, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्याच वेळी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागतो. अन्य एखादे वाहन मध्येच आडवे येईल का, आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो.

त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत. एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न इ.
‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे, हे माणसाचे स्वप्न होते. त्याच्या मनात खोलवर रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथांमधून, देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे. माणसाच्या मनातल्या या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे. वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे. अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. वेळ थोडा असतो. कामे भरपूर असतात. कामाची ठिकाणेसुद्धा दूर दूर असतात. अनेक ठिकाणी जावे लागते.

अनेक माणसांना भेटावे लागते. म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे. वाहनांमुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी, असे सगळ्यांना वाटू लागते. माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात. प्रतिष्ठा मिळवतात. पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो. वाहन हे साधन आहे.

ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही. परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन ही अखेरीस एक वस्तू आहे. वस्तूला तिच्या मर्यादा असतात. हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो. अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते. अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात. शारीरिक क्षमता उणावते. जगण्यातला आनंद कमी होतो. हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

पण हे कोणीही लक्षात घेत नाही. केवळ हौसेसाठी, गंमत-जंमत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात. हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न ई.
‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
उत्तर :
वाहनाची अतिगती ही विकृती आहे, हे विधान शंभर टक्के सत्य आहे. हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. विकृती म्हणजे जे सहज नाही, नैसर्गिक नाही ते. कल्पना करा. आपल्याला चॉकलेट खूप आवडते. सर्व जगात असे किती जण आहेत, जे सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात? समजा एखादयाला पांढरा रंग खूप आवडतो, म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो. घराला पांढरा रंग देतो. अंथरुणे-पांघरुणे पांढरी, खिडक्यांचे पडदे पांढरे, भांडीकुंडी, फर्निचर पांढऱ्या रंगाचे. हे असे करणारा जगामध्ये.

एक तरी माणूस असेल का? सर्वजण पायांनी चालतात. उलटे होऊन हातांवर तोल सावरत प्रयत्नपूर्वक चालता येऊ शकते. पण अशा त-हेने नियमितपणे जाणारा एक तरी माणूस सापडेल का? जे सहज आहे, नैसर्गिक आहे तेच साधारणपणे माणूस करतो. तीच खरे तर प्रकृती असते. याच्या विरुद्ध वागणे म्हणजे विकृती होय. रोजच्या जेवणात वरण-भात आणि भाजी-पोळी असणे, घरात विविध रंगसंगती योजणे, पायांनी चालणे हे सर्व सहज, नैसर्गिक आहे.

सर्व माणसे तसेच वागतात. हाच न्याय वाहनांनासुद्धा लागू पडतो. मर्यादित वेगाने वाहन चालवत, अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता, सुरक्षितपणे, वेळेत पोहोचणे हा वाहनाने प्रवास करण्याचा हेतू असतो. हा हेतू आपण अतिवेगाचा हव्यास बाळगला नाही तरच यशस्वी होतो. म्हणून अतिवेग ही विकृती होय, हेच खरे.

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
उत्तर :
सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीएवढेच आहेत. रस्त्यांची संख्या पूर्वीइतकीच आणि त्यांची लांबी-रुंदीसुद्धा पूर्वीइतकीच. गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. कमी वेळात पोहोचण्याच्या इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरे; पण वाहतूक कोंडीतच तासन्तास वाया जातात. या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो. वाहन आपल्या मालकीचे असते. पण रस्ता.

आपल्या मालकीचा नसतो. मग वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ माजतो. प्रत्येकजण स्वत:ची गाडी वाटेल तशी पुढे दामटत राहतो. सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात. कोणीही पुढे जाऊ शकत नाही की मागे परतू शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात.

अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही. मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही.

उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वतः पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न आ.
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होतो.

गाडी चालवायला बसण्यापूर्वीची पूर्वतयारी :

  • प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), अन्य आवश्यक कागदपत्रे (विमा, पीयुसी इत्यादी) घेतल्याची खात्री करून घ्यावी.
  • टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी.
  • गाडीतील प्रवाशांना वाहतुकीच्या सामान्य नियमांची कल्पना दयावी. आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे त्याची माहिती दयावी.

प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी :

  • गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे.
  • गाडीतील प्रवाशांच्या गप्पांत सामील होऊ नये.
  • गाडीचा वेग पन्नास-साठ किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये; कारण आपल्याकडील रस्ते अजूनही साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाण्यास योग्य बनवलेले नाहीत.
  • जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांनाच त्रास होतो. शारीरिक व्याधी जडतात. म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा.
  • गाडीतील प्रवाशांना गप्पा मारण्यास बंदी घालता येत नाही. तरीही गप्पांच्या ओघात अचानक मोठ्याने ओरडणे किंवा हास्यस्फोटक विनोद करणे या गोष्टी टाळण्याच्या सूचना दयाव्यात.
  • स्वत:ची लेन सोडून जाऊ नये.
  • लेन बदलताना, वळण घेताना, रस्ता बदलताना खूप आधीपासून तयारी करावी. योग्य ते सिग्नल दयावेत.
  • वाटेत जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
  • गाडीत धूम्रपान, मद्यपान करू नये. गाडी चालकाने तर मुळीच करू नये.

अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

उपक्रम :

‘वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी’ यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या/मैत्रिणीच्या मदतीने वर्गात सादर करा.

तोंडी परीक्षा :

‘वाहतूक सुरक्षेची गरज’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 1 वेगवशता Additional Important Questions and Answers

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

प्रश्न 1.
1. वाहनाचा वेग अनिवार झाला, तर …….
2. शरीर-मनावरील ताण नाहीसे होतात.
3. शरीरभर आनंदाची स्पंदने निर्माण होतात.
4. आरोग्याची हानी होते.
5. एकाच जागी तासन्तास जखडून बसण्याचे शारीरिक कौशल्य अवगत होते.
उत्तर :
4. आरोग्याची हानी होते.

पुढील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा :

प्रश्न 1.
जीवन हे दशदिशांना विभागले आहे.
उत्तर :
आधुनिक काळात खूप प्रगती झाल्यामुळे माणसे पूर्वीच्या काळापेक्षा कमी वेळात जास्त कामे करतात. त्यामुळे कामांची ठिकाणे अनेक असतात. ही ठिकाणे दूर दूर पसरलेली असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 2.
अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते.
उत्तर :
अमेरिकेसारख्या देशामध्ये राहण्याची ठिकाणे, नोकरीव्यवसायाची ठिकाणे, अन्य कामाची ठिकाणे ही सर्व दूर दूर अंतरावर असतात. ही अंतरे पार करण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. भारतातील अनेक व्यक्तींची मुले अमेरिकेसारख्या दूरदूरच्या देशांमध्ये राहतात. ही सर्व माणसे एकमेकांना नियमितपणे व सहजपणे भेटू शकत नाहीत. साहजिकच अंतरामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो.

शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात. अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही.

मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही. उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वतः पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 3.
रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का?
उत्तर :
रस्त्याने कोणीही चालण्याऐवजी पळू लागला, तर कोणीही कौतुक करणार नाही. रस्ते, वाटा या चालण्यासाठी असतात. माणसे सर्वसाधारणपणे जशा कृती करतात, जशी वागतात, तशी वागली तर लोकांना बरे वाटते. वेगळी वागली, तर काहीतरी विचित्र घडत आहे, असे वाटू लागते.

लिहा :

प्रश्न 1.

  1. घरोघर व दरडोई वाहन उपलब्ध असलेला देश : ………….
  2. वेगामुळे बेभान होणारी : ………….
  3. अमेरिकन जीवनशैली ज्यांनी पत्करू नये ते : ………….
  4. गाड्यांनी एकमेकांना जोडली जाणारी : ………….
  5. वाहनांमुळे वाचतात : ………….
  6. माणसांवर स्वार होणारी : ………….

उत्तर :

  1. अमेरिका
  2. माणसे
  3. भारतीय
  4. महानगरे
  5. वेळ, श्रम
  6. वाहने.

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 8.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 9.1

प्रश्न 2.
Maharashtra-Board-Class-12-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-1-वेगवशता-11
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 10.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 13.1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 11.1

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 14.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 15.1

रिकाम्या चौकटी भरा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 12.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता 13.1

रिकाम्या जागा भरा :

प्रश्न 1.
वाई, सातारा अशा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो, जर …
i. ………………….
ii. …………………
उत्तर :
वाई, सातारा अशा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो, जर …
i. तातडीने शेतमळ्यावर जाण्याची वेळ आली.
ii. आपण गावाबाहेर राहत असू.

प्रश्न 2.
इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे …..
उत्तर :
इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा : 

प्रश्न 1.
वाहनाचा वेग बेताचा हवा, असे लेखक सांगतात त्यामागील कारण लिहा.
उत्तर :
वाहनाचा वेग बेताचा हवा, असे लेखक सांगतात, त्यामागील कारण अतिघाई किंवा अतिवेग यांत कोणतेही औचित्य नसते.

प्रश्न 2.
अपघात होण्याची दोन कारणे लिहा.
उत्तर :

  • वेग वाढल्यामुळे वाहनावरचा ताबा सुटणे आणि
  • पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे जाण्याचा हव्यास या दोन कारणांनी अपघात होतात.

वाक्ये पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. जर वाहनाचा वेग वाढला, तर …………..
  2. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा जर हव्यास बाळगला, तर …………
  3. रात्री भरधाव वेगाने प्रवास करू नये; कारण ………….

उत्तर :

  1. जर वाहनाचा वेग वाढला, तर त्यावरचा ताबा कमी होतो.
  2. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा जर हव्यास बाळगला, तर अपघात होतो.
  3. रात्री भरधाव वेगाने प्रवास करू नये; कारण झटपट पार पडलीच पाहिजेत अशी महत्त्वाची कामे दरवेळी नसतात.

व्याकरण :

वाक्यप्रकार:

वाक्यांच्या आशयावरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. वेग हे गतीचे रूप आहे. → [ ]
  2. जीवनाची ही टोके सांधणार कशी? → [ ]
  3. बापरे! किती हा जीवघेणा वेग! → [ ]

उत्तर :

  1. विधानार्थी वाक्य
  2. प्रश्नार्थी वाक्य
  3. उद्गारार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

प्रश्न 2.
क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

  1. गतीला जेव्हा दिशा असते, तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. → [ ]
  2. सुसाट गतीला आवरा. → [ ]
  3. कामापुरते व कामासाठी वाहन काढावे. → [ ]
  4. वाहनांच्या वेगाची चिंता वाटते. → [ ]

उत्तर :

  1. संकेतार्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. विध्यर्थी वाक्य
  4. स्वार्थी वाक्य

प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. अचानक वेग वाढतो. → [ ]
  2. माणसाने वाहन चालविले. → [ ]
  3. माणसाने वेगाला आवरावे. → [ ]

उत्तर :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग

अलंकार :

पुढील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
आईसारखे दैवत आईच होय!
उत्तर :
अनन्वय अलंकार

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता

शब्दार्थ :

  1. प्रगती – जीवनाचा स्तर, दर्जा उंचावणे.
  2. अगतिक – असहाय, केविलवाणे.
  3. अवखळ – खट्याळ, उपद्रवी.
  4. उरकणे – आटोपणे.
  5. यथाप्रमाण – आवश्यक तेवढे.
  6. त्वरा – घाई, जलदगती.
  7. कृतकृत्य – धन्य, यशस्वी.
  8. अनिवार – अतिशय.
  9. भावविवश – हळवा, भावनाप्रधान.
  10. यथासांग – (यथा + स + अंग) आवश्यक त्या सर्व बाजूंनी.

वाक्प्रचार व त्याचा अर्थ :

यथासांग पार पाडणे – सर्व बाजू पूर्ण करून पार पाडणे.

Maharashtra State Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions

12th Commerce Maths 2 Chapter 8 Miscellaneous Exercise 8 Answers Maharashtra Board

Probability Distributions Class 12 Commerce Maths 2 Chapter 8 Miscellaneous Exercise 8 Answers Maharashtra Board

Balbharati Maharashtra State Board 12th Commerce Maths Solution Book Pdf Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 Questions and Answers.

Std 12 Maths 2 Miscellaneous Exercise 8 Solutions Commerce Maths

(I) Choose the correct alternative.

Question 1.
F(x) is c.d.f. of discreter r.v. X whose p.m.f. is given by P(x) = \(k\left(\begin{array}{l}
4 \\
x
\end{array}\right)\), for x = 0, 1, 2, 3, 4 & P(x) = 0 otherwise then F(5) = __________
(a) \(\frac{1}{16}\)
(b) \(\frac{1}{8}\)
(c) \(\frac{1}{4}\)
(d) 1
Answer:
(d) 1

Question 2.
F(x) is c.d.f. of discrete r.v. X whose distribution is
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 I Q2
then F(-3) = __________
(a) 0
(b) 1
(c) 0.2
(d) 0.15
Answer:
(a) 0

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 3.
X : number obtained on uppermost face when a fair die is thrown then E(X) = __________
(a) 3.0
(b) 3.5
(c) 4.0
(d) 4.5
Answer:
(b) 3.5

Question 4.
If p.m.f. of r.v. X is given below.
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 I Q4
then Var(X) = __________
(a) p2
(b) q2
(c) pq
(d) 2pq
Answer:
(d) 2pq

Question 5.
The expected value of the sum of two numbers obtained when two fair dice are rolled is __________
(a) 5
(b) 6
(c) 7
(d) 8
Answer:
(c) 7

Question 6.
Given p.d.f. of a continuous r.v. X as
f(x) = \(\frac{x^{2}}{3}\) for -1 < x < 2
= 0 otherwise then F(1) =
(a) \(\frac{1}{9}\)
(b) \(\frac{2}{9}\)
(c) \(\frac{3}{9}\)
(d) \(\frac{4}{9}\)
Answer:
(b) \(\frac{2}{9}\)

Question 7.
X is r.v. with p.d.f.
f(x) = \(\frac{k}{\sqrt{x}}\), 0 < x < 4
= 0 otherwise then E(X) = __________
(a) \(\frac{1}{3}\)
(b) \(\frac{4}{3}\)
(c) \(\frac{2}{3}\)
(d) 1
Answer:
(b) \(\frac{4}{3}\)

Question 8.
If X follows B(20, \(\frac{1}{10}\)) then E(X) = __________
(a) 2
(b) 5
(c) 4
(d) 3
Answer:
(a) 2

Question 9.
If E(X) = m and Var(X) = m then X follows __________
(a) Binomial distribution
(b) Possion distribution
(c) Normal distribution
(d) none of the above
Answer:
(b) Possion distribution

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 10.
If E(X) > Var(X) then X follows __________
(a) Binomial distribution
(b) Possion distribution
(c) Normal distribution
(d) none of the above
Answer:
(a) Binomial distribution

(II) Fill in the blanks.

Question 1.
The values of discrete r.v. are generally obtained by __________
Answer:
counting

Question 2.
The values of continuous r.v. are generally obtained by __________
Answer:
measurement

Question 3.
If X is dicrete random variable takes the values x1, x2, x3, …… xn then \(\sum_{i=1}^{n} p\left(x_{i}\right)\) = __________
Answer:
1

Question 4.
If f(x) is distribution function of discrete r.v. X with p.m.f. p(x) = \(\frac{x-1}{3}\) for x = 1, 2, 3, and p(x) = 0 otherwise then F(4) = __________
Answer:
1

Question 5.
If f(x) is distribution function of discrete r.v. X with p.m.f. p(x) = \(k\left(\begin{array}{l}
4 \\
x
\end{array}\right)\) for x = 0, 1, 2, 3, 4, and p(x) = 0 otherwise then F(-1) = __________
Answer:
0

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 6.
E(X) is considered to be __________ of the probability distribution of X.
Answer:
centre of gravity

Question 7.
If X is continuous r.v. and f(xi) = P(X ≤ xi) = \(\int_{-\infty}^{x_{i}} f(x) d x\) then f(x) is called __________
Answer:
Cumulative Distribution Function

Question 8.
In Binomial distribution probability of success ________ from trial to trial.
Answer:
remains constant/independent

Question 9.
In Binomial distribution, if n is very large and probability success of p is very small such that np = m (constant) then ________ distribution is applied.
Answer:
Possion

(III) State whether each of the following is True or False.

Question 1.
If P(X = x) = \(k\left(\begin{array}{l}
4 \\
x
\end{array}\right)\) for x = 0, 1, 2, 3, 4, then F(5) = \(\frac{1}{4}\) when f(x) is c.d.f.
Answer:
False

Question 2.
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 III Q2
If F(x) is c.d.f. of discrete r.v. X then F(-3) = 0.
Answer:
True

Question 3.
X is the number obtained on the uppermost face when a die is thrown the E(X) = 3.5.
Answer:
True

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 4.
If p.m.f. of discrete r.v.X is
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 III Q4
then E(X) = 2p.
Answer:
True

Question 5.
The p.m.f. of a r.v. X is p(x) = \(\frac{2 x}{n(n+1)}\), x = 1, 2,……n
= 0 otherwise,
Then E(X) = \(\frac{2 n+1}{3}\)
Answer:
True

Question 6.
If f(x) = kx (1 – x) for 0 < x < 1
= 0 otherwise then k = 12
Answer:
False

Question 7.
If X ~ B(n, p) and n = 6 and P(X = 4) = P(X = 2) then p = \(\frac{1}{2}\).
Answer:
True

Question 8.
If r.v. X assumes values 1, 2, 3,………, n with equal probabilities then E(X) = \(\frac{(n+1)}{2}\)
Answer:
True

Question 9.
If r.v. X assumes the values 1, 2, 3,………, 9 with equal probabilities, E(X) = 5.
Answer:
True

(IV) Solve the following problems.

Part – I

Question 1.
Identify the random variable as discrete or continuous in each of the following. Identify its range if it is discrete.
(i) An economist is interested in knowing the number of unemployed graduates in the town with a population of 1 lakh.
Solution:
X = No. of unemployed graduates in a town.
∵ The population of the town is 1 lakh
∴ X takes finite values
∴ X is a Discrete Random Variable
∴ Range of = {0, 1, 2, 4, …. 1,00,000}

(ii) Amount of syrup prescribed by a physician.
Solution:
X : Amount of syrup prescribed.
∴ X Takes infinite values
∴ X is a Continuous Random Variable.

(iii) A person on a high protein diet is interested in the weight gained in a week.
Solution:
X : Gain in weight in a week.
X takes infinite values
∴ X is a Continuous Random Variable.

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

(iv) Twelve of 20 white rats available for an experiment are male. A scientist randomly selects 5 rats and counts the number of female rats among them.
Solution:
X : No. of female rats selected
X takes finite values.
∴ X is a Discrete Random Variable.
Range of X = {0, 1, 2, 3, 4, 5}

(v) A highway safety group is interested in the speed (km/hrs) of a car at a checkpoint.
Solution:
X : Speed of car in km/hr
X takes infinite values
∴ X is a Continuous Random Variable.

Question 2.
The probability distribution of a discrete r.v. X is as follows.
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q2
(i) Determine the value of k.
(ii) Find P(X ≤ 4), P(2 < X < 4), P(X ≥ 3).
Solution:
(i) Assuming that the given distribution is a p.m.f. of X
∴ Each P(X = x) ≥ 0 for x = 1, 2, 3, 4, 5, 6
k ≥ 0
ΣP(X = x) = 1 and
k + 2k + 3k + 4k + 5k + 6k = 1
∴ 21k = 1 ∴ k = \(\frac{1}{21}\)

(ii) P(X ≤ 4) = 1 – P(X > 4)
= 1 – [P(X = 5) + P(X = 6)]
= 1 – [latex]\frac{5}{21}+\frac{6}{21}[/latex]
= 1 – \(\frac{11}{21}\)
= \(\frac{10}{21}\)
P(2 < X < 6) = p(3) + p(4) + p(5)
= 3k + 4k + 5k
= \(\frac{3}{21}+\frac{4}{21}+\frac{5}{21}\)
= \(\frac{12}{21}\)
= \(\frac{4}{7}\)

(iii) P(X ≥ 3) = p(3) + p(4) + p(5) + p(6)
= 3k + 4k + 5k + 6k
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q2.1

Question 3.
Following is the probability distribution of an r.v. X.
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q3
Find the probability that
(i) X is positive.
(ii) X is non-negative.
(iii) X is odd.
(iv) X is even.
Solution:
(i) P(X is positive)
P(X = 0) = p(1) + p(2) + p(3)
= 0.25 + 0.15 + 0.10
= 0.50

(ii) P(X is non-negative)
P(X ≥ 0) = p(0) + p(1) + p(2) + p(3)
= 0.20 + 0.25 + 0.15 + 0.10
= 0.70

(iii) P(X is odd)
P(X = -3, -1, 1, 3)
= p(- 3) +p(-1) + p(1) + p(3)
= 0.05 + 0.15 + 0.25 + 0.10
= 0.55

(iv) P(X is even)
= 1 – P(X is odd)
= 1 – 0.55
= 0.45

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 4.
The p.m.f of a r.v. X is given by
\(P(X=x)= \begin{cases}\left(\begin{array}{l}
5 \\
x
\end{array}\right) \frac{1}{2^{5}}, & x=0,1,2,3,4,5 . \\
0 & \text { otherwise }\end{cases}\)
Show that P(X ≤ 2) = P(X ≥ 3).
Solution:
For x = 0, 1, 2, 3, 4, 5
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q4

Question 5.
In the following probability distribution of an r.v. X
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q5
Find a and obtain the c.d.f. of X.
Solution:
Given distribution is p.m.f. of r.v. X
ΣP(X = x) = 1
∴ p(1) + p(2) + p(3) + p(4) + p(5) = 1
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q5.1
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q5.2

Question 6.
A fair coin is tossed 4 times. Let X denote the number of heads obtained. Identify the probability distribution of X and state the formula for p.m.f. of X.
Solution:
A fair coin is tossed 4 times
∴ Sample space contains 16 outcomes
Let X = Number of heads obtained
∴ X takes the values x = 0, 1, 2, 3, 4.
∴ The number of heads obtained in a toss is an even
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q6

Question 7.
Find the probability of the number of successes in two tosses of a die, where success is defined as (i) number greater than 4 (ii) six appearing in at least one toss.
Solution:
S : A die is tossed two times
S = {(1, 1), (1, 2), (1, 3), (1, 4), (1, 5), (1, 6), (2, 1), (2, 2), (2, 3), (2, 4), (2, 5), (2, 6), (3, 1), (3, 2), (3, 3), (3, 4), (3, 5), (3, 6), (4, 1), (4, 2), (4, 3), (4, 4), (4, 5), (4, 6), (5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (5, 5), (5, 6), (6, 1), (6, 2), (6, 3), (6, 4), (6, 5), (6, 6)}
n(S) = 36
(i) X : No. is greater than 4
Range of X = {0, 1, 2}
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q7

(ii) X : Six appears on aleast one die.
Range of X = {0, 1, 2}
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q7.1

Question 8.
A random variable X has the following probability distribution.
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q8
Determine (i) k, (ii) P(X < 3), (iii) P(X > 6), (iv) P(0 < X < 3).
Solution:
(i) It is a p.m.f. of r.v. X
Σp(x) = 1
p(1) + p(2) + p(3) + p(4) + p(5) + p(6) + p(7) = 1
k + 2k + 2k + 3k + k2 + 2k2 + 7k2 + k = 1
9k + 10k2 = 1
10k2 + 9k – 1 = 0
10k2 +10k – k – 1 = 0
∴ 10k(k + 1) – 1(k + 1) = 0
∴ (10k – 1) (k + 1) = 0
∴ 10k – 1 = 0r k + 1 = 0
∴ k = \(\frac{1}{10}\) or k = -1
k = -1 is not accepted, p(x) ≥ 0, ∀ x ∈ R
∴ k = \(\frac{1}{10}\)

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

(ii) P(X < 3) = p(1) + p(2)
= k + 2k
= 3k
= 3 × \(\frac{1}{10}\)
= \(\frac{3}{10}\)

(iii) P(X > 6) = p(7)
= 7k2 + k
= \(7\left(\frac{1}{10}\right)^{2}+\frac{1}{10}\)
= \(\frac{7}{100}+\frac{1}{10}\)
= \(\frac{17}{100}\)

(iv) P(0 < X < 3) = p(1) + p(2)
= k + 2k
= 3k
= 3 × \(\frac{1}{10}\)
= \(\frac{3}{10}\)

Question 9.
The following is the c.d.f. of a r.v. X.
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q9
Find the probability distribution of X and P(-1 ≤ X ≤ 2).
Solution:
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q9.1
P(-1 ≤ X ≤ 2) = p(-1) + p(0) + p(1) + p(2)
= 0.2 + 0.15 + 0.10 + 0.10
= 0.55

Question 10.
Find the expected value and variance of the r.v. X if its probability distribution is as follows.
(i)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(i)
Solution:
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(i).1

(ii)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(ii)
Solution:
E(X) = Σx . p(x)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(ii).1

(iii)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(iii)
Solution:
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(iii).1
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(iii).2

(iv)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(iv)
Solution:
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q10(iv).1
= 1.25
S.D. of X = σx = √Var(X)
= √1.25
= 1.118

Question 11.
A player tosses two coins. He wins ₹ 10 if 2 heads appear, ₹ 5 if 1 head appears, and ₹ 2 if no head appears. Find the expected value and variance of the winning amount.
Solution:
S : Two fair coin are tossed
S = {HH, HT, TT, TH}
n(S) = 4
∴ Range of X = {0, 1, 2}
∴ Let Y = amount received corresponds to values of X
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q11
Expected winning amount
E(Y) = Σpy = \(\frac{22}{4}\) = ₹ 5.5
V(Y) = Σpy2 – (Σpy)2
= \(\frac{154}{4}\) – (5.5)2
= 38.5 – 30.25
= ₹ 8.25

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 12.
Let the p.m.f. of the r.v. X be
\(p(x)= \begin{cases}\frac{3-x}{10} & \text { for } x=-1,0,1,2 \\ 0 & \text { otherwise }\end{cases}\)
Calculate E(X) and Var(X).
Solution:
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q12
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q12.1

Question 13.
Suppose error involved in making a certain measurement is a continuous r.v. X with p.d.f.
\(f(x)= \begin{cases}k\left(4-x^{2}\right) & \text { for }-2 \leq x \leq 2 \\ 0 & \text { otherwise }\end{cases}\)
Compute (i) P(X > 0), (ii) P(-1 < X < 1), (iii) P(X < -0.5 or X > 0.5)
Solution:
We know that
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q13
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q13.1
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q13.2

Question 14.
The p.d.f. of the r.v. X is given by
\(f(x)= \begin{cases}\frac{1}{2 a} & \text { for } 0<x<2 a \\ 0 & \text { otherwise }\end{cases}\)
Show that P(X < \(\frac{a}{2}\)) = P(X > \(\frac{3a}{2}\))
Solution:
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q14

Question 15.
Determine k if
\(f(x)= \begin{cases}k e^{-\theta x} & \text { for } 0 \leq x<\infty, \theta>0 \\ 0 & \text { otherwise }\end{cases}\)
is the p.d.f. of the r.v. X. Also find P(X > \(\frac{1}{\theta}\)). Find M if P(0 < X < M) = \(\frac{1}{2}\)
Solution:
We know that
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q15
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q15.1

Question 16.
The p.d.f. of the r.v. X is given by
\(f_{x}(x)=\left\{\begin{array}{l}
\frac{k}{\sqrt{x}}, 0<x<4 \\
0, \text { otherwise }
\end{array}\right.\)
Determine k, c.d.f. of X and hence find P(X ≤ 2) and P(X ≥ 1).
Solution:
We know that
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q16
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q16.1

Question 17.
Let X denote the reaction temperature (in °C) of a certain chemical process. Let X be a continuous r.v. with p.d.f.
\(f(x)= \begin{cases}\frac{1}{10}, & -5 \leq x \leq 5 \\ 0, & \text { otherwise }\end{cases}\)
Compute P(X < 0).
Solution:
Given p.d.f. is f(x) = \(\frac{1}{10}\), for -5 ≤ x ≤ 5
Let its c.d.f. F(x) be given by
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 1 Q17

Part – II

Question 1.
Let X ~ B(10, 0.2). Find (i) P(X = 1) (ii) P(X ≥ 1) (iii) P(X ≤ 8)
Solution:
X ~ B(10, 0.2)
n = 10, p = 0.2
∴ q = 1 – p = 1 – 0.2 = 0.8
(i) P(X = 1) = 10C1 (0.2)1 (0.8)9 = 0.2684

(ii) P(X ≥ 1) = 1 – P(X < 1)
= 1 – P(X = 0)
= 1 – 10C0 (0.2)0 (0.8)10
= 1 – 0.1074
= 0.8926

(iii) P(X ≤ 8) = 1 – P(x > 1)
= 1 – [p(9) + p(10)]
= 1 – [10C9 (0.2)9 (0.8)1 + 10C10 (0.2)10]
= 1 – 0.00000041984
= 0.9999

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 2.
Let X ~ B(n, p) (i) If n = 10 and E(X) = 5, find p and Var(X), (ii) If E(X) = 5 and Var(X) = 2.5, find n and p.
Solution:
X ~ B(n, p)
(i) n = 10, E(X) = 5
∴ np = 5
∴ 10p = 5
∴ p = \(\frac{1}{2}\)
∴ q = 1 – p = 1 – \(\frac{1}{2}\) = \(\frac{1}{2}\)
V(X) = npq
= 10 × \(\frac{1}{2}\) × \(\frac{1}{2}\)
= 2.5

(ii) E(X) = 5, V(X) = 2.5
∴ np = 5, ∴ npq = 2.5
∴ 5q = 2.5
∴ q = \(\frac{2.5}{5}\) = 0.5, p = 1 – 0.5 = 0.5
But np = 5
∴ n(0.5) = 5
∴ n = 10

Question 3.
If a fair coin is tossed 4 times, find the probability that it shows (i) 3 heads, (ii) head in the first 2 tosses, and tail in the last 2 tosses.
Solution:
n : No. of times a coin is tossed
∴ n = 4
X : No. of heads
P : Probability of getting heads
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 2 Q3

Question 4.
The probability that a bomb will hit the target is 0.8. Find the probability that, out of 5 bombs, exactly 2 will miss the target.
Solution:
X : No. of bombs miss the target
p : Probability that bomb miss the target
∴ q = 0.8
∴ p = 1 – q = 1 – 0.8 = 0.2
n = No. of bombs = 5
∴ X ~ B(5, 0.2)
∴ p(x) = nCx px qn-x
P(X = 2) = 5C2 (0.2)2 (0.8)5-2
= 10 × 0.04 × (0.8)3
= 10 × 0.04 × 0.512
= 0.4 × 0.512
= 0.2048

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 5.
The probability that a lamp in the classroom will burn is 0.3. 3 lamps are fitted in the classroom. The classroom is unusable if the number of lamps burning in it is less than 2. Find the probability that the classroom can not be used on a random occasion.
Solution:
X : No. of lamps not burning
p : Probability that the lamp is not burning
∴ q = 0.3
∴ p = 1 – q = 1 – 0.3 = 0.7
n = No. of lamps fitted = 3
∴ X ~ B(3, 0.7)
∴ p(x) = nCx px qn-x
P(classroom cannot be used)
P(X < 2) = p(0) + p(1)
= 3C0 (0.7)0 (0.3)3-0 + 3C1 (0.7)1 (0.3)3-1
= 1 × 1 × (0.3)3 + 3 × 0.7 × (0.3)2
= (0.3)2 [0.3 + 3 × 0.7]
= 0.09 [0.3 + 2.1]
= 0.09 [2.4]
= 0.216

Question 6.
A large chain retailer purchases an electric device from the manufacturer. The manufacturer indicates that the defective rate of the device is 10%. The inspector of the retailer randomly selects 4 items from a shipment. Find the probability that the inspector finds at most one defective item in the 4 selected items.
Solution:
X : No. of defective items
n : No. of items selected = 4
p : Probability of getting defective items
∴ p = 0.1
∴ q = 1 – p = 1 – 0.1 = 0.9
P(At most one defective item)
P(X ≤ 1) = p(0) + p(1)
= 4C0 (0.1)0 (0.9)4-0 + 4C1 (0.1)1 (0.9)4-1
= 1 × 1 × (0.9)4 + 4 × 0.1 × (0.9)3
= (0.9)3 [0.9 + 4 × 0.1]
= (0.9)3 × [0.9 + 0.4]
= 0.729 × 1.3
= 0.9477

Question 7.
The probability that a component will survive a check test is 0.6. Find the probability that exactly 2 of the next 4 components tested survive.
Solution:
p = 0.6, q = 1 – 0.6 = 0.4, n = 4
x = 2
∴ p(x) = nCx px qn-x
P(X = 2) = 4C2 (0.6)2 (0.4)2 = 0.3456

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 8.
An examination consists of 5 multiple choice questions, in each of which the candidate has to decide which one of 4 suggested answers is correct. A completely unprepared student guesses each answer randomly. Find the probability that this student gets 4 or more correct answers.
Solution:
n : No. of multiple-choice questions
∴ n = 5
X : No. of correct answers
p : Probability of getting correct answer
∵ There are 4 options out of which one is correct
∴ p = \(\frac{1}{4}\)
∴ q = 1 – p = 1 – \(\frac{1}{4}\) = \(\frac{3}{4}\)
∵ X ~ B(5, \(\frac{1}{4}\))
∴ p(x) = nCx px qn-x
P(Four or more correct answers)
P(X ≥ 4) = p(4) + p(5)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 2 Q8

Question 9.
The probability that a machine will produce all bolts in a production run with in the specification is 0.9. A sample of 3 machines is taken at random. Calculate the probability that all machines will produce all bolts in a production run within the specification.
Solution:
n : No. of samples selected
∴ n = 3
X : No. of bolts produce by machines
p : Probability of getting bolts
∴ p = 0.9
∴ q = 1 – p = 1 – 0.9 = 0.1
∴ X ~ B(3, 0.9)
∴ p(x) = nCx px qn-x
P(Machine will produce all bolts)
P(X = 3) = 3C3 (0.9)3 (0.1)3-3
= 1 × (0.9)3 × (0.1)0
= 1 × (0.9)3 × 1
= (0.9)3
= 0.729

Question 10.
A computer installation has 3 terminals. The probability that anyone terminal requires attention during a week is 0.1, independent of other terminals. Find the probabilities that (i) 0 (ii) 1 terminal requires attention during a week.
Solution:
n : No. of terminals
∴ n = 3
X : No. of terminals need attention
p : Probability of getting terminals need attention
∴ p = 0.1
∴ q = 1 – p = 1 – 0.1 = 0.9
∵ X ~ B(3, 0.1)
∴ p(x) = nCx px qn-x
(i) P(No attention)
∴ P(X = 0) = 3C0 × (0.1)0 (0.9)3-1
= 1 × 1 × (0.9)3
= 0.729

(ii) P(One terminal need attention)
∴ P(X = 1) = 3C1 (0.1)1 (0.9)3-1
= 3 × 0.1 × (0.9)2
= 0.3 × 0.81
= 0.243

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 11.
In a large school, 80% of the students like mathematics. A visitor asks each of 4 students, selected at random, whether they like mathematics, (i) Calculate the probabilities of obtaining an answer yes from all of the selected students, (ii) Find the probability that the visitor obtains the answer yes from at least 3 students.
Solution:
X : No. of students like mathematics
p: Probability that students like mathematics
∴ p = 0.8
∴ q = 1 – p = 1 – 0.8 = 0.2
n : No. of students selected
∴ n = 4
∵ X ~ B(4, 0.8)
∴ p(x) = nCx px qn-x
(i) P(All students like mathematics)
∴ P(X = 4) = 4C4 (0.8)4 (0.2)4-4
= 1 × (0.8)4 × (0.2)0
= 1 × (0.8)4 × 1
= 0.4096

(ii) P(Atleast 3 students like mathematics)
∴ P(X ≥ 3) = p(3) + p(4)
= 4C3 (0.8)3 (0.2)4-3 + 0.4096
= 4 × (0.8)3 (0.2)1 + 0.4096
= 0.8 × (0.8)3 + 0.4096
= (0.8)4 × 0.4096
= 0.4096 + 0.4096
= 0.8192

Question 12.
It is observed that it rains on 10 days out of 30 days. Find the probability that
(i) it rains on exactly 3 days of a week.
(ii) it rains at most 2 days a week.
Solution:
X : No. of days it rains in a week
p : Probability that it rains
∴ p = \(\frac{10}{30}=\frac{1}{3}\)
∴ q = 1 – p = 1 – \(\frac{1}{3}\) = \(\frac{2}{3}\)
n : No. of days in a week
∴ n = 7
∴ X ~ B(7, \(\frac{1}{3}\))
(i) P(Rains on Exactly 3 days of a week)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 2 Q12

(ii) P(Rains on at most 2 days of a week)
∴ P(X ≤ 2) = p(0) + p(1) + p(2)
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 2 Q12.1

Question 13.
If X follows Poisson distribution such that P(X = 1) = 0.4 and P(X = 2) = 0.2, find variance of X.
Solution:
X : Follows Possion Distribution
Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8 IV Part 2 Q13
∴ m = 1
∴ Mean = m = Variance of X = 1

Maharashtra Board 12th Commerce Maths Solutions Chapter 8 Probability Distributions Miscellaneous Exercise 8

Question 14.
If X has Poisson distribution with parameter m, such that
\(\frac{P(X=x+1)}{P(X=x)}=\frac{m}{x+1}\)
find probabilities P(X = 1) and P(X = 2), when X follows Poisson distribution with m = 2 and P(X = 0) = 0.1353.
Solution:
Given that the random variable X follows the Poisson distribution with parameter m = 2
i.e. X ~ P(2)
Its p.m.f. is satisfying the given equation.
\(\frac{P(X=x+1)}{P(X=x)}=\frac{m}{x+1}\)
When x = 0,
\(\frac{\mathrm{P}(\mathrm{X}=1)}{\mathrm{P}(\mathrm{X}=0)}=\frac{2}{0+1}\)
P(X = 1) = 2P(X = 0)
= 2(0.1353)
= 0.2706
When x = 1,
\(\frac{\mathrm{P}(\mathrm{X}=2)}{\mathrm{P}(\mathrm{X}=1)}=\frac{2}{1+1}\)
P(X = 2) = P(X = 1) = 0.2706

12th Commerce Maths Solution Book Pdf