Jagna Cactus Che Class 10 Marathi Chapter 12.1 Question Answer Maharashtra Board

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 Marathi Chapter 12.1 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात ‘वसंत शिरवाडकर’ यांनी वाळवंटी प्रदेशातील कॅक्टसवर विशेष माहिती दिली आहे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे पटवून दिले आहे. साधारणपणे पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही. वाळवंटात अगदीच थोडे पाणी मिळते. पण निसर्ग एक जादूगार आहे. त्या थोड्याशा पाण्यातही तो वनस्पती फुलवतो. तेथील प्राणी जगवतो.वाळवंटी प्रदेशातील खास अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती व प्राणी तेथेही जगू शकतात. कॅक्टसच्या झाडांवरची लाल-पिवळी फुले चित्रमय वाटतात. वाळवंटातील जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कारच आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग खरेच मोठा जादूगार आहे.

प्रश्न 2.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
उत्तरः
वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर दोन-दोन, तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो, एरवी तेथे वाळवंटातसूर्यआगओकतअसतो.हवातापलेलीअसते.सूर्याच्या आगीमध्ये पाने, फुले, गवत करपून जातात. वाळवंटात ओसाड, भकास जीवन असते. कॅक्टस अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. जे काही पाणी मिळेल तेवढे स्वत:मध्ये साठवून घ्यायचे आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत रहायचे. अशी कॅक्टसची जगण्याची किमया असते. सग्वारो कॅक्टस तर २०० वर्षे जगतो. कॅक्टसमध्ये पाणी साठवण्याची रचना असते.

मिळेल तेवढे पाणी तो साठवतो. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी बनलेली असते. पाऊस पडतो तेव्हा वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेते. त्यामुळे थोड्यावेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी कॅक्टसच्या मुळांची खास रचना असते. आपली मुळे लांब पसरवून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातील पाणी तो शोषून घेतो. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात म्हणून कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 3.
टिपा लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 7
उत्तरः
सग्वारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचाअगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी, की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात ही फुले फुलली की थोडा काळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सग्वारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. सम्वारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सग्वारो फॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे ही एक खादय असते.

प्रश्न 4.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हाला वाटते ते लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, म्हणून त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. त्यासाठी खबरदारी म्हणून कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण झाडे जनावरांनी ओरबाडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचाईत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. यासाठी या प्रदेशातील झाडांना स्वत:च्या रक्षणासाठी काटे असतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
पाण्याला समानार्थी शब्द ‘जीवन’ असा आहे. त्यावरून पाण्याचे अमूल्य महत्त्व लक्षात येते. जीवनात पाणी नसेल तर तहानेने व्याकूळ होऊन माणूस मरेल. स्वच्छता राहणार नाही. पशू-पक्षी, झाडे निसर्ग टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी राहणार नाही. जलचर प्राण्यांची सृष्टी नष्ट होईल. सूर्य आग ओकेल. जमिनीला मोठे तडे जातील. पाण्यावाचून हाहा:कार होईल. जीवनच संपुष्टात येईल. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

प्रश्न 6.
पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.

उत्तरः
कॅक्टसच्या सुमारे १००० जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. ‘सायाळ’ कॅक्टस – कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा (शत्रुने हल्ला करताच काटे सोडणारा प्राणी) दिसतो.
(ii) ‘अस्वल’ कॅक्टस – हा कॅक्टस अस्वलासारखा दिसतो.
(iii) “पिंप’ कॅक्टस – हा कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं
(iv) ‘सांबरशिंग’ कॅक्टस – ‘सांबरशिंग’ कॅक्टस सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला म्हणतात.
(v) सग्वारो कॅक्टस – सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखादया मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याला स्पर्श होतो. याला कॅक्टसचा राजा म्हणतात.

जगणं कॅक्टसचं Summary in Marathi

जगणं कॅक्टसचं पाठपरिचय

‘जगणं कॅक्टसचं’ हा पाठ लेखक ‘वसंत शिरवाडकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या ‘कॅक्टस’ या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं 2

जगणं कॅक्टसचं Summary in English

“Jagna Cactus Che’ is written by Vasant Shirwadkar. He has explained the types of cactuses, their utility and adaptation to less amounts of water. He has offered detailed information about the cactus.

जगणं कॅक्टसचं शब्दार्थ

  • वाळवंटी प्रदेश – वाळूकामय प्रांत – (a desert region)
  • कोरडेपणा – शुष्कपणा – (dryness)
  • दुर्भिक्ष – टंचाई, दुष्काळ – (scarcity)
  • ठणठणीत – कोरडा व रिकामा – (dry & empty)
  • जीवन – आयुष्य – (life)
  • जादूगार – जादू करणारा – (a magician)
  • जीवसृष्टी – सचेतन सृष्टी – (the living world)
  • बहादुरी – पराक्रम – (valour)
  • चमत्कार – आश्चर्य – (a wonder, a mircale)
  • अवर्षण – दुष्काळ, अनावृष्टी – (drought)
  • प्रदीर्घ – लांबलचक, खूप लांब – (very long)
  • वैराण – ओसाड, पडीक – (barren, desolate)
  • रक्ष – कोरडे, शुष्क – (dry)
  • निष्माण – प्राण / जीव नसलेला – (lifeless)
  • पालवी – झाडाला फुटलेले नवे अंकुर – (fresh foliage)
  • सुप्तावस्था – झोपलेली अवस्था – (sleeping stage)
  • रोप – वनस्पती, रोपटे – (a plant)
  • मरुभूमी – वाळवंट – (desert)
  • नंदनवन – (येथे अर्थ) स्वर्ग (इंद्राचे उपवन) – (the pleasure garden of indra’s paradise)
  • तवा – पोळ्या भाजण्याचे लोखंडी पसरट भांडे – (pan)
  • करपणे – भाजणे, होरपळणे – (to get scorched)
  • भकास – ओसाड, उजाड – (gloomy, desolate)
  • हंगाम – ऋतू, मौसम – (season)
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • मंद गती – धिम्यागतीने – (slow motion)
  • दिवाणखाना – बैठकीची खोली – (living room, hall)
  • प्रतिनिधी – (representative)
  • राक्षस – दानव – (monster)
  • पेर – दोन सांध्यांमधील भाग – (the portion between two joints)
  • पन्हाळी – पाणी वाहून नेण्याची नळी – (a pipe)
  • बाष्पीभवन – वाफ होणे – (evaporation)
  • वयं – दूर करणे – (to avoid)
  • गर – गीर, मगज – (pulp)
  • बिशाद – हिम्मत, धाडस – (daring)
  • बुंधा – बुडखा – (tree trunk)
  • निमुळता – क्रमाने अरूंद होत जाणारा, चिंचोळा – (tapering)
  • सरळसोट – सरळ, उभा – (upright)
  • कुंपण – संरक्षक भिंत – (a fence)
  • सायाळ – अंगावर काटे असणारा प्राणी, साळू, साळींदर – (hedgehog)
  • सांबर – फाटे फुटलेली शिंगे असणारा हरणासारखा – दिसणारा प्राणी – (horned deer)
  • शिंग – शंग – (horm)
  • शेंडा – टोक, शिखर – (the top)
  • गेंदेदार – गोंड्याच्या फुलांसारखी भरलेली
  • मोरावळा – साखरेच्या पाकात आवळ्याचे बारीक तुकडे शिजवून तयार केलेला गोडपदार्थ – (jam)
  • जिकिरीचे – त्रासदायक – (trouble some)
  • साल – झाडावरचे जाड आवरण – (bark, rind)
  • सोलणे – वरचा पापुद्रा (साल) काढून टाकणे – (to peel, to skin)
  • तुरट – तुरटीसारखी चव असलेला – (astringent)
  • निरुपाय – अगतिक – (helpless)
  • खटाटोप – दगदग, आटापिटा – (strenous efforts)
  • पंचाईत – अडचण – (problem)
  • परजून – परिधान करून – (to wear)
  • स्वसंरक्षण – स्वत:चे संरक्षण – (self–defence)
  • जबाबदारी – उत्तरदायित्व – (responsibility)

जगणं कॅक्टसचं वाक्प्रचार

  • भूगा होणे – चूरा होणे
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • धाडी पडणे – अकस्मात हल्ला करणे – (to attack)
  • शोषून घेणे – ओढून घेणे – (to absorb)
  • मात करणे – विजय मिळवणे – (to overcome)
  • अभाव असणे – कमतरता असणे, उणीव असणे – (lack of)
  • व्याकूळ होणे – बेचैन होणे – (to feel uneasy)

Marathi Akshar Bharati Class 10th Digest 

Rang Majeche Rang Udyache Class 10 Marathi Chapter 12 Question Answer Maharashtra Board

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 Marathi Chapter 12 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
(अ) कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 5
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 3

(आ) आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 6
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 4

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा.
(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [          ]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [          ]
उत्तरः
(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [फुलाफुलांचे ताटवे]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [सृषृ]

प्रश्न 3.
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
(i) आभाळाचे छत्र ……………………………………
(ii) गर्भरेशमी सळसळ ……………………………………
उत्तरः
(i) आभाळाचे छत्र – पाण्याने भरलेल्या ढगांचे आच्छादन
(ii) गर्भरेशमी सळसळ – हिरव्या पानांची, हिरव्याशार गवताची वाऱ्यामुळे सळसळ.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 4.
कृती पूर्ण करा.

(अ) ‘कष्ट करणाऱ्यांना मदत करू’ या आशयाची ओळ शोधा.
उत्तरः
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी.

(आ) ‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
यंत्रांच्या संगतीने काय मिळणार आहे?

(इ) कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
उत्तरः
सृष्टी-दृष्टी, वृष्टी-कष्टी, तुष्टी-गोष्टी.

प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’

(आ) पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
उत्तरः
पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

(इ) वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः
वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Additional Important Questions and Answers

प्रश्न १.पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 1

प्रश्न 2.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
(i) फुलाफुलांचे दाट …………………………………… जिथे पोचते दृष्टी. (थवे, गुच्छ, ताटवे, झुडपे)
(ii) …………………………………… देईना संगणक हा, काळी आई जगवू. (पैसे, दौलत, संपत्ती, धान्य)
(iii) उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील …………………………………… झाडे. (निलगिरी, आंब्याची, देशी, घनदाट)
(iv) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी …………………………………… (दृष्टी, तुष्टी, वृष्टी, पुष्टी)
उत्तर:
(i) ताटवे
(ii) धान्य
(iii) देशी
(iv) तुष्टी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कवी कोणाला पुष्टी क्यायला सांगतात?
उत्तर:
कवी मातीमध्ये काम करणाऱ्या हातांना पुष्टी दयायला सांगतात.

(ii) यंत्राबरोबर राहिल्यास काय मिळेल?
उत्तरः
यंत्राबरोबर राहिल्यास पैसा, दौलत मिळेल.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
(i) जिथे दृष्टी पोचते तेथे असतात – [फुलांचे ताटवे]
(ii) संगणक हे देत नाही – [धान्य]
(iii) जगास या गोष्टी सांगू – [गर्भरेशमी सळसळण्याच्या]

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 2
उत्तरे:
(i- क),
(ii – अ),
(iii – ड),
(iv – ब)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 3.
काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा.
(i) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .
(ii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iv) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
उत्तर:
(i) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
(ii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iv) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) फूल
(ii) दाट
(iii) ताटवे
(iv) दृष्टी
उत्तरे:
(i) कुसूम, सुमन
(ii) गच्च
(iii) बगिचे, उद्यान
(iv) नजर

प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
अंजली कुलकर्णी

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
पर्यावरणाचे रक्षण केले तर मानवाला काही कमी पडणार नाही अशा भावनांचे वर्णन केले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ:
डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?

आभाळातून होणाऱ्या पावसाच्या वृष्टीमुळे डोंगरातून खळाळत पाणी वाहत येईल. डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे व त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या तुषारांना पाहिल्यावर आपण आपली सारी दु:खे विसरून जाऊ व निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ, खळाळत्या पाण्याला पाहून आपल्याही मनात हास्याचे तुषार उधळले जातील व आपली सारी दुःखे राहणारच नाहीत, आपण कष्टी होणारी नाही? असे कवयित्री म्हणते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः

निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे नाते हे अगदी घट्ट असेच आहे. निसर्गाच्या सहवासात माणूस अगदी आनंदी जगणे जगत असतो, पण आजच्या जागतिकीकरणाच्या या युगात संगणकामुळे आणि इतर वैज्ञानिक गोष्टींमुळे माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. असे झाले तर माणसाला आपले अस्तित्व टिकवणे कठीण होऊन बसेल. पर्यावरणाची, निसर्गाची जोपसना केली तर मानवाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन आनंदमय करण्यासाठी निसर्गाच्या हातात हात घालून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो.

(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण :

‘रंग मजेचे रंग उदयाचे’ ही ‘अंजली कुलकर्णी’ यांची कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन. त्यांच्या शब्दांमधून माणसाचा मातीशी, निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध मनापासून जाणवतो. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे याची सोप्या व योग्य शब्दात कवयित्रीने करून दिलेली जाणीव खूप छान आहे. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन कसे आनंदी होऊन जाते, त्याचे वर्णन अप्रतिम आहे.

(६) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थः
(i) जपणे – सांभाळणे
(ii) सृष्टी – निसर्ग, जग
(i) माती – मृदा
(ii) पुष्टी – पाठबळ, पाठिंबा

स्वाध्याय कती

प्रश्न 1.
पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवयित्रीला वाटते?
उत्तरः
पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 2.
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः
वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

रंग मजेचे रंग उदयाचे Summary in Marathi

रंग मजेचे रंग उदयाचे काव्यपरिचय‌
‘रंग‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌उदयाचे’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌’अंजली‌ ‌कुलकर्णी’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌जागतिकीकरणाच्या‌ ‌या‌ ‌काळात‌ ‌तंत्रज्ञानाशी‌ ‌मैत्री‌ ‌करणारा‌ ‌मानव‌ ‌निसर्गाकडे‌ ‌पाठ‌ ‌फिरवत‌ ‌आहे,‌ ‌पण‌ ‌निसर्गाचे,‌ ‌पर्यावरणाचे‌ ‌रक्षण‌ ‌करणे‌ ‌ही‌ ‌अतिमहत्त्वाची‌ ‌बाब‌ ‌आहे.‌ ‌पर्यावरणाची‌ ‌जोपासना‌ ‌केली‌ ‌तर‌ ‌माणसाला‌ ‌कधीच‌ ‌काही‌ ‌कमी‌ ‌पडणार‌ ‌नाही,‌ ‌असा‌ ‌विचार‌ ‌कवयित्रीने‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌मांडला‌ ‌आहे.‌

रंग मजेचे रंग उदयाचे Summary in English

As‌ ‌a‌ ‌result‌ ‌of‌ ‌globalization,‌ ‌a‌ ‌human‌ ‌being‌ ‌appears‌ ‌to‌ ‌be‌ ‌more‌ ‌connected‌ ‌to‌ ‌technology‌ ‌rather‌ ‌than‌ ‌nature.‌ ‌The‌ ‌preservation‌ ‌of‌ ‌nature‌ ‌and‌ ‌environment‌ ‌should‌ ‌be‌ ‌the‌ ‌first‌ ‌priority‌ ‌of‌ ‌a‌ ‌human‌ ‌being.‌ ‌Only‌ ‌then‌ ‌can‌ ‌he‌ ‌live‌ ‌a‌ ‌satisfied‌ ‌life.‌ ‌The‌ ‌poetess‌ ‌has‌ ‌tried‌ ‌to‌ ‌elaborate‌ ‌on‌ ‌this‌ ‌understanding‌ ‌in‌ ‌her‌ ‌poem.‌

भावार्थ‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌दाट‌ ‌ताटवे,‌ ‌जिथे‌ ‌पोचते‌ ‌दृष्टी‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उद्याचे‌ ‌जपून,‌ ‌ठेवू‌ ‌सृष्टी….‌

निसर्ग‌ ‌हा‌ ‌खरा‌ ‌जादूगार‌ ‌आहे.‌ ‌त्याच्या‌ ‌जादूई‌ ‌दुनियेमध्ये‌ ‌रंगा–गंधाचे‌ ‌साम्राज्य‌ ‌पसरले‌ ‌आहे.‌ ‌आभाळाची‌ ‌निळाई‌ ‌पाहत,‌ ‌पाण्याची‌ ‌खळखळ‌ ‌आणि‌ ‌वाऱ्याची‌ ‌अंगाई‌ ‌ऐकत‌ ‌धरतीच्या‌ ‌कुशीत‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌म्हणजेच‌ ‌अनेक‌ ‌रंगाच्या‌ ‌फुलांचे‌ ‌बाग‌ ‌बगीचे‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌आणि‌ ‌हे‌ ‌बगीचे‌ ‌फक्त‌ ‌एका‌ ‌ठिकाणी‌ ‌फुलवायचे‌ ‌नाहीत‌ ‌तर‌ ‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌जिथे‌ ‌जिथे‌ ‌नजर‌ ‌पोचते‌ ‌तेथे‌ ‌तेथे‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग,‌ ‌उद्याच्या‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌म्हणजेच‌ ‌निसर्गाच्या‌ ‌रंगात‌ ‌आणि‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌राहून‌ ‌जो‌ ‌आनंद,‌ ‌जी‌ ‌मजा‌ ‌मिळणार‌ ‌आहे.‌ ‌अशी‌ ‌एक‌ ‌सुंदर‌ ‌सृष्टी‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्यासाठी‌ ‌जपून‌ ‌ठेवूया.‌

धान्य‌ ‌देईना‌ ‌संगणक‌ ‌हा,‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌जगवू‌
‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌राबती,‌ ‌तयांस‌ ‌देऊ‌ ‌पुष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌आजचे‌ ‌युग‌ ‌कितीही‌ ‌आधुनिक‌ ‌झाले,‌ ‌तंत्रज्ञान‌ ‌विकसित‌ ‌झाले‌ ‌तरी‌ ‌निसर्ग‌ ‌तुमचा‌ ‌खरा‌ ‌मित्र‌ ‌आहे.‌ ‌तुमचा‌ ‌पोषण–कर्ता‌ ‌आहे.‌ ‌कारण‌ ‌तंत्रज्ञानाच्या‌ ‌विकासामुळे‌ ‌संगणकाची‌ ‌निर्मिती‌ ‌झाली.‌ ‌पण‌ ‌हा‌ ‌संगणक‌ ‌तुम्हांला‌ ‌धान्य‌ ‌देऊन‌ ‌तुमचे‌ ‌पोषण‌ ‌करू‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌तर‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌म्हणजेच‌ ‌धरतीमाता‌ ‌आपण‌ ‌जगवली‌ ‌तरच‌ ‌आपण‌ ‌जगू‌ ‌शकतो.‌ ‌तीच‌ ‌खरी‌ ‌आपले‌ ‌पोषण‌ ‌करणारी‌ ‌जननी‌ ‌आहे.‌ ‌तिला‌ ‌आपण‌ ‌जगवूया‌ ‌असे‌ ‌कवयित्री‌ ‌सांगते.‌ ‌या‌ ‌काळ्या‌ ‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌राबतात,‌ ‌कष्ट‌ ‌करतात‌ ‌आणि‌ ‌तिचे‌ ‌संगोपन‌ ‌करतात‌ ‌अशा‌ ‌शेतकऱ्याचे,‌ ‌भूमिपुत्राचे‌ ‌सुद्धा‌ ‌आपण‌ ‌संरक्षण‌ ‌केले‌ ‌पाहिजे‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टांना‌ ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌ ‌दिला‌ ‌पाहिजे.‌ ‌तरच‌ ‌आपल्याला उदयाच्या‌ ‌उज्ज्वल‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग‌ ‌व‌ ‌जीवनातील‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌पाहायला‌ ‌मिळतील‌ ‌आणि‌ ‌ही‌ ‌धरती‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌सुजलाम्‌ ‌सुफलाम्‌ ‌होऊन‌ ‌इथला‌ ‌मनुष्यप्राणी‌ ‌सुखी‌ ‌होईल.‌

उधळू,‌ ‌फेकू‌ ‌बिया‌ ‌डोंगरी,‌ ‌रुजतील‌ ‌देशी‌ ‌झाडे‌
‌गच्च‌ ‌माजतील‌ ‌राने,‌ ‌होईल‌ ‌आभाळातून‌ ‌वृष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

‘झाडे‌ ‌लावा,‌ ‌झाडे‌ ‌जगवा’.‌ ‌हा‌ ‌मंत्र‌ ‌सत्यात‌ ‌उतरविण्यासाठी‌ ‌आपण‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌कोणती‌ ‌कृती‌ ‌केली‌ ‌पाहिजे‌ ‌हे‌ ‌सांगताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌की,‌ ‌आपण‌ ‌आपल्या‌ ‌देशामध्ये‌ ‌पिकणारी,‌ ‌उगवणारी‌ ‌जी‌ ‌फळे,‌ ‌फुले‌ ‌आहेत,‌ ‌त्यांच्या‌ ‌बिया‌ ‌डोंगरावर,‌ ‌पर्वतावर‌ ‌उधळूया‌ ‌म्हणजे‌ ‌डोंगरावर‌ ‌त्या‌ ‌रुजतील‌ ‌आणि‌ ‌देशी‌ ‌झाडांनी‌ ‌आपली‌ ‌जंगले‌ ‌परत‌ ‌गच्च‌ ‌भरून‌ ‌जातील,‌ ‌माजतील‌ ‌ज्यामुळे‌ ‌जमिनीची‌ ‌धूप‌ ‌थांबेल‌ ‌आणि‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌भरपूर‌ ‌पाऊस‌ ‌पडला‌ ‌तर‌ ‌ही‌ ‌सृष्टी‌ ‌हिरवी‌ ‌समृद्ध‌ ‌होईल‌ ‌आणि‌ ‌समृद्ध‌ ‌अशा‌ ‌भविष्याचे‌ ‌आपले‌ ‌स्वप्न‌ ‌पूर्ण‌ ‌होईल.‌

डोंगरातून‌ ‌वाहात‌ ‌येते,‌ ‌खळाळते‌ ‌हे‌ ‌पाणी‌
‌फेनधवलशा‌ ‌तुषारांमध्ये,‌ ‌राहाल‌ ‌कैसे‌ ‌कष्टी?‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

आभाळातून‌ ‌होणाऱ्या‌ ‌पावसाच्या‌ ‌वृष्टीमुळे‌ ‌डोंगरातून‌ ‌खळाळत‌ ‌पाणी‌ ‌वाहत‌ ‌येईल.‌ ‌डोंगर‌ ‌दऱ्यातून‌ ‌वाहणारे‌ ‌धबधबे,‌ ‌त्यातून‌ ‌फेसाप्रमाणे‌ ‌उधळणाऱ्या‌ ‌पांढऱ्या‌ ‌तुषारांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌आपण‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌दुःखे‌ ‌विसरून‌ ‌जाऊन‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌जावू.‌ ‌खळाळत्या‌ ‌पाण्याला‌ ‌पाहून‌ ‌आपल्याही‌ ‌मनात‌ ‌हास्याचे‌ ‌तुषार‌ ‌उधळले‌ ‌जातील‌ ‌व‌ ‌आपली‌ ‌दुःखे‌ ‌राहणारच‌ ‌नाहीत.‌ ‌किंबहुना‌ ‌त्यांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌कसे‌ ‌राहू‌ ‌आपण‌ ‌कष्टी?‌ ‌असाच‌ ‌प्रश्न‌ ‌कवयित्री‌ ‌आपल्याला‌ ‌विचारते‌ ‌आहे.‌

मिळेल‌ ‌पैसा,‌ ‌मिळेल‌ ‌दौलत,‌ ‌यंत्रांच्या‌ ‌संगती‌ ‌
आभाळाच्या‌ ‌छत्राखाली,‌ ‌एक‌ ‌अनोखी‌ ‌तुष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

तंत्रज्ञानामुळे‌ ‌आपल्याला‌ ‌पैसा,‌ ‌दौलत‌ ‌मिळेल‌ ‌पण‌ ‌त्या‌ ‌कागदी‌ ‌नोटांना‌ ‌समाधानाचा,‌ ‌तुष्टीचा‌ ‌गंध‌ ‌येणार‌ ‌नाही.‌ ‌त्यातून‌ ‌स्पर्धा,‌ ‌अवहेलना‌ ‌वाढेल,‌ ‌दुसऱ्याचे‌ ‌दुःख‌ ‌जाणून‌ ‌घेण्याची‌ ‌मनाची‌ ‌दौलत‌ ‌तिथे‌ ‌नसेल.‌ ‌परंतु‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌एकाच‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌सारे‌ ‌भेदभाव‌ ‌विसरून‌ ‌जाऊ,‌ ‌कुणी‌ ‌लहान–मोठा,‌ ‌श्रीमंत,‌ ‌गरीब‌ ‌राहणार‌ ‌नाही,‌ ‌आभाळाची‌ ‌आम्ही‌ ‌लेकरे,‌ ‌काळी‌ ‌माती‌ ‌आई‌ ‌असे‌ ‌म्हणण्यातच‌ ‌आपल्याला‌ ‌खरी‌ ‌तुष्टता,‌ ‌समाधान‌ ‌मिळेल‌ ‌आणि‌ ‌एकत्वाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌

हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌मने‌ ‌भोवती,‌ ‌किती‌ ‌छटा‌ ‌हिरव्याच्या‌ ‌
गर्भरेशमी‌ ‌सळसळण्याच्या‌ ‌जगास‌ ‌सांगू‌ ‌गोष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

या‌ ‌निळ्या‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌साऱ्यांची‌ ‌मने‌ ‌हिरवी‌ ‌होतील,‌ ‌आनंदी‌ ‌होतील.‌ ‌नवीन‌ ‌विचारांनी,‌ ‌सुखा–समाधानाने‌ ‌भरून‌ ‌जातील‌ ‌आणि‌ ‌या‌ ‌आनंदाच्या‌ ‌विविध‌ ‌छटा‌ ‌आपल्याला‌ ‌आपल्या‌ ‌अवतीभोवती‌ ‌पाहता‌ ‌येतील.‌ ‌पर्यावरणाच्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌डोंगरावर‌ ‌उधळलेल्या‌ ‌बियांमुळे‌ ‌झाडे‌ ‌निर्माण‌ ‌होतील.‌ ‌घनदाट‌ ‌जंगले‌ ‌तयार‌ ‌होतील‌ ‌व‌ ‌त्यामुळे‌ ‌भरपूर‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌त्यामुळे‌ ‌सर्वत्र‌ ‌उगवलेल्या‌ ‌गवताची‌ ‌रेशमासारखी‌ ‌नाजूक,‌ ‌मऊ‌ ‌पाती‌ ‌डोलतील.‌ ‌हिरव्यागार‌ ‌धरणीमुळे‌ ‌मनाला‌ ‌समाधान‌ ‌मिळेल.‌ ‌निसर्गसौंदर्यामुळे‌ ‌जगण्याचा‌ ‌खराखुरा‌ ‌आनंदही‌ ‌मिळेल.‌ ‌आपली‌ ‌मनेही‌ ‌हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌अर्थात‌ ‌प्रसन्न‌ ‌होतील,‌ ‌आपण‌ ‌सर्व‌ ‌जगाला‌ ‌या‌ ‌हिरवाईचा‌ ‌आनंद‌ ‌सांगूया.‌ ‌सगळ्या‌ ‌जगाला‌ ‌आनंदी‌ ‌करत‌ ‌आपण‌ ‌उदयाच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌ ‌

‌रंग मजेचे रंग उदयाचे शब्दार्थ‌

  • ‌दृष्टी‌ ‌– ‌नजर‌ ‌– ‌(sight)‌
  • सृष्टी‌ ‌– ‌निसर्ग,‌ ‌जग‌ ‌– (nature)‌
  • संगणक‌ ‌– ‌(computer)‌ ‌
  • काळी‌ ‌आई‌ ‌– ‌माती‌ ‌– (earth)
  • पुष्टी‌ ‌– ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌‌ ‌– ‌(support)
  • वृष्टी‌ ‌– ‌पाऊस‌ ‌– ‌(rain)‌ ‌
  • आभाळ‌ ‌– ‌आकाश,‌ ‌नभ‌ ‌– ‌(sky)‌ ‌
  • छटा‌ ‌– ‌विविध‌ ‌रंग,‌ ‌स्तर‌ ‌– ‌(shades)‌ ‌
  • गर्भरेशमी‌ ‌– ‌मऊ‌ ‌– ‌(soft‌ ‌silk)‌ ‌
  • सळसळणे‌ ‌– ‌पानांच्या‌ ‌हालचालीचा‌ ‌आवाज‌ ‌– (rustling)‌ ‌
  • फुल‌ ‌‌– ‌सुमन,‌ ‌पुष्प‌ ‌– ‌(flower)‌ ‌
  • घाट – ‌गच्च‌ ‌– ‌(dense)‌ ‌
  • ताटवे‌ ‌– ‌बगीचे‌ ‌– ‌(gardens)‌
  • ‌मजा‌ ‌– ‌गंमत‌ ‌– (‌fun)‌ ‌
  • जपणे‌ – ‌सांभाळून‌ ‌ठेवणे‌ ‌– (to‌ ‌preserve‌ ‌carefully)‌ ‌
  • माती‌ ‌– मृदा (Soil)
  • हात‌ ‌– ‌कर‌ ‌– ‌(hand)‌ ‌
  • राबती‌ ‌– ‌राबणे,‌ ‌कष्ट‌ ‌करणे‌ ‌– ‌(to‌ ‌work‌ ‌hard)‌ ‌
  • उधळू‌ ‌– ‌उडवू,‌ ‌उडवणे‌ ‌– ‌(throw)‌ ‌
  • बीया‌ ‌– ‌बीज‌ ‌– (seeds)‌ ‌
  • डोंगर‌ ‌– ‌पर्वत‌ – (mountain)‌
  • ‌रुजणे‌ ‌– ‌अंकुरणे‌ ‌– (to‌ ‌germinate)‌ ‌
  • झाड‌ ‌– ‌वृक्ष‌ ‌– (tree)‌ ‌
  • रान‌ ‌– ‌जंगल,‌ ‌वन‌ ‌– ‌(forest)‌
  • ‌पाणी – ‌जल‌ ‌– (water)‌ ‌
  • फेनधवलशा‌ ‌– ‌फेसाप्रमाणे‌ ‌पांढऱ्या‌ ‌– ‌(white‌ ‌like‌ ‌foam)‌ ‌
  • कष्टी‌ ‌– ‌थकलेले,‌ ‌दुःखी‌ ‌– ‌(Sad)‌ ‌
  • पैसा‌ ‌– ‌अर्थ‌ ‌– ‌(money)‌ ‌
  • दौलत‌ ‌– ‌संपत्ती‌ ‌– (wealth)‌ ‌
  • संगत‌ ‌सोबत‌ ‌– ‌(company)‌ ‌
  • छत्र‌ ‌– ‌सावली‌ ‌– (shade)‌ ‌
  • अनोखी‌ ‌– ‌वेगळी‌ ‌– (special)‌ ‌
  • तृष्टी‌ ‌– ‌तृप्ती,‌ ‌समाधान‌ ‌– ‌(satisfaction)‌ ‌
  • मन‌ – ‌चित्त‌ ‌– (mind)‌

Marathi Akshar Bharati Class 10th Digest 

Jata Astala Class 10 Marathi Chapter 8.1 Question Answer Maharashtra Board

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन) Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 Marathi Chapter 8.1 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8.1 जाता अस्ताला Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः
सूर्य उदयाला येतो त्याबरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते. चैतन्याने भरून जाते, संपूर्ण चराचराचे जीवनचक्र फिरू लागते. म्हणून अस्ताला जातांना सूर्याच्या मनात विचार येतो, मी अस्ताला गेल्यानंतर ही संपूर्ण धरा/पृथ्वी अंधारात बुडून जाईल. माझ्या प्रकाशाचा एक साधा कवडसाही उरणार नाही. मग या पृथ्वीवरील जीवांचं काय होईल? हा मिट्ट अंधार विश्वाच्या चैतन्याला संपवून तर टाकणार नाही ना? या विश्वाच्या चराचरात/अणुरेणूत सामावलेले जीवन, चैतन्य हा अंधार गिळून तर टाकणार नाही ना? एक अनामिक भीती त्याला छळू लागते. पृथ्वीला अंधारापासून कोणीतरी वाचवलं पाहिजे. विश्वाचे कोणीतरी भले करावे. मी अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते.

कवितेतली आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे, असे वाटते. एखादया पित्याला आपल्या कन्येच्या भल्याची, तिच्या चांगल्या जीवनाबद्दल चिंता असते तसाच सूर्य देखील धरेची काळजी घेणारा तिला जपणारा पिता आहे असे प्रतीत होते.

प्रश्न 2.
पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तरः
पणती म्हणजे अदम्य विश्वासाचे आणि साहसाचे प्रतिक आहे. वास्तविक पाहता सूर्य म्हणजे प्रकाशाचा लखलखता स्रोत, अनंत पसरलेल्या विश्वाला उजळून टाकण्याचे सामर्थ्य असलेला; म्हणून त्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस कोणी करत नाही; पण साधी मातीची पणती पुढे येते आणि नम्रपणाने म्हणते, “हे स्वामी, तेजोमय भास्करा, तुझ्याएवढा धगधगता प्रकाश माझ्याकडे नाही, पण जमेल तसा या पृथ्वीवरील अंधार दूर करण्याचा मी प्रयत्न करीन.” आपल्याकडे जे काही चांगलं आहे. ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

इतरांची मदत करू शकतो असा विचार करून प्रत्येकाने आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक कार्य करावे. पणतीच्या उदाहरणातून हाच विचार कवी रविंद्रनाथांनी व्यक्त केलेला आहे. पणतीच्या प्रकाशाने सगळा अंधार जरी दूर होणार नसला तरी दहा पावलांची वाट ती नक्कीच उजळू शकते, हा विश्वास पणतीच्या ठिकाणी दिसतो. म्हणजेच प्रत्येकाने आपली समता जाणून चांगले कार्य करावे. जे नाही त्याचा विचार न करता जे आपल्याजवळ आहे मग ते थोडं, थोडच का असेना त्याचाच उपयोग करून आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले कार्य करण्याची प्रेरणा कवीने पणतीच्या प्रतिकातून व्यक्त केली आहे.

प्रश्न 3.
सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा,
उत्तर:
वेगवेगळ्या ठिकाणचा सूर्यास्त वेगवेगळे सौंदर्य, वेगळे भाव, वेगळे रंग निर्माण करत असतो. माणसाची मनोदशा जशी असेल तसे भावतरंग सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या मनात निर्माण होत असतात.

वाळवंटाच्या ठिकाणचा सूर्यास्त. वाळूच्या विस्तीर्ण पसरलेल्या अथांग भूप्रदेशावर सोनेरी मऊसार किरणे पसरवत असतो. मन अगदी तृप्त करून तो अस्ताला जातो. तेथील वाळूचा सागर हळूहळू थंड होत जातो. शितल वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. मानव, पशू, पक्षी सुखावून जातात. वाळूचा थंड स्पर्श, वाऱ्याची थंड झुळूक यामुळे मानवी मन सुखावून जाते. त्या सुवर्णमयी वातावरणात नव्या संकल्पना, जुन्या संवेदना जाग्या होतात. कवी, लेखक, चित्रकार यांना नवीन कल्पना सुचतात.

समुद्राच्या ठिकाणी अस्ताला जाणाऱ्या सूर्यास्ताचे दर्शन मोठे विलोभनीय असते. हळू हळू सागराच्या कुशीत सामावणाऱ्या सूर्याला बघून वाटते की, हा सागरात मिसळून जातो. म्हणूनच चमकदार मोती निर्माण होतात. सुंदर रंगीत प्रवाळ आणि अनंत असे जीव निर्माण होतात. समुद्राच्या लाटांसोबत हेलकावे खात हा तेजोगोल जेव्हा सागरात सामावतो तेव्हा आपोआप त्या सृष्टीका पुढे आपण नतमस्तक होतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

प्रश्न 4.
कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर:
सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता तिच्यावरच जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता, प्रचंड शक्तीचे प्रतिक. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून, कळवळून साद घालणारा तो व्याकूळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. एखादयाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तीशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करूणा हृदयात निर्माण करावी लागते.

सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले, श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते हे सूर्याच्या प्रतिकातून दिसून येते. त्या उलट, पणती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटाशा कवडसा. पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिम्मत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे पणतीच्या प्रतिकातून जाणवते. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची. जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सुद्धा पणतीच्या प्रतिकातून जाणवते.

सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 23
उत्तरः
सूर्य : पणती, तू खरचं खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्याइतका झगझगीत प्रकाश नाही. तरी पण माझ्या अनुपस्थितीत पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम स्विकारलयं याबद्दल खरचं तुझं खूप कौतुक वाटतं मला! Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

पणती : हे भास्करा, या पृथ्वीवरील जीवांसाठी, सृष्टीसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसतास तर ही सृष्टी, तिचे अस्तित्व राहिलेच नसते. धरेसाठीची तुझी व्याकूळता मला समजू शकते म्हणूनच माझ्याजवळ जेवढा प्रकाश आहे त्याने मला जे काही करणे शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन.

सूर्य : तू इतकी छोटी असूनही इतका मोठा विचार करतेस खरेच तुझे खूप आभार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगत जीव म्हणजे मानव हा मात्र पृथ्वीच्या अस्तित्वाचा, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली त्याने माझ्या सुंदर धरेचा नाश करायला सुरुवात केली आहे. तिला विदृप केले आहे. म्हणून मला खूप कळजी वाटते.

पणती : तुझी काळजी अगदीच योग्य आहे सूर्यदेवा. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशाप्रकारे मानव वागतो आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला तो अक्षरश: ओरबाडतो आहे.

सूर्य : हो ना! याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. रोज सकाळी जेव्हा पृथ्वीला उजळून टाकण्यासाठी मी येतो आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळून वाहणारे झरे, दया; डोंगर, शेते, वाळवंट, दलदली, वृक्ष, वन हे सारं जेव्हा मी बघतो, त्यावेळी मन हेलावतं हे सगळं खरंच एक दिवस नष्ट पावणार का?

पणती : हे रविराजा, इतकं चिंतीत होण्याची गरज नाही कारण आता मानवालाही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तू निर्माण केलेलं हे पृथ्वीरत्न तो सांभाळण्यासाठी आता धडपडतो आहे. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

सूर्य : खरचं किती आशावादी आहेस तू. मानव वेळीच जागरूक झाला आहे, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. अशा आशावादी विचारांची, सहृदय माणसे जर एकत्र आली तर तो दिवस नक्कीच दूर नाही. ज्या दिवशी ही वसुंधरा पूर्वीसारखी सुजलाम् सुफलाम् व रमणीय होईल.

पणती : नक्कीच होईल, कारण आता बरीच माणसे आपापल्या परीने पर्यावरणाबद्दल काम करीत आहेत. पर्यावरणाची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. सकारात्मक विचारांची माणसे एकत्र येऊन काम करत आहेत.

सूर्य : अरे व्वा! असं होत असेल तर फारच उत्तम. जे सुंदर आहे ते सुंदरच कसे राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शिवाय प्रत्येकाने ‘जगा आणि जगू क्या’, हा निसर्गाचा नियम पाळला, तर ज्याच्या त्याच्या क्रमाने जीवनक्रम सुरू राहील आणि मग ही सृष्टी निर्मळतेने भरून जाईल.

जाता अस्ताला Summary in Marathi

जाता अस्ताला पाठपरिचय‌‌

‘जाता‌ ‌अस्ताला’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌’गुरूदेव‌ ‌रविंद्रनाथ‌ ‌टागोर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌मुळात‌ ‌बंगाली‌ ‌कवितेचे‌ ‌मराठीत‌ ‌स्वैर‌ ‌रूपांतर‌ ‌श्यामला‌ ‌कुलकर्णी‌ ‌यांनी‌ ‌केले‌ ‌आहे‌ ‌.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌टागोर‌ ‌यांनी‌ ‌सूर्य‌ ‌आणि‌ ‌पणतीच्या‌ ‌प्रतीकांद्वारे‌ ‌अगदी‌ ‌छोट्या‌ ‌जीवातही‌ ‌जगाला‌ ‌काहीतरी‌ ‌देण्याची,‌ ‌जग‌ ‌सुंदर‌ ‌करण्याची‌ ‌क्षमता‌ ‌असते‌ ‌हे‌ ‌सांगितले‌ ‌आहे.‌‌

जाता अस्ताला Summary in English

This‌ ‌is‌ ‌a‌ ‌translation‌ ‌of‌ ‌a‌ ‌poem‌ ‌(originally‌ ‌written‌ ‌by‌ ‌Rabindranath‌ ‌Tagore‌ ‌in‌ ‌Bengali)‌ ‌by‌ ‌Shyamala‌ ‌Kulkarni.‌ ‌The‌ ‌poem‌ ‌is‌ ‌a‌ ‌comparison‌ ‌between‌ ‌the‌ ‌sun‌ ‌and‌ ‌a‌ ‌small‌ ‌lamp‌ ‌both‌ ‌of‌ ‌which‌ ‌give‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌In‌ ‌this‌ ‌own‌ ‌way,‌ ‌the‌ ‌lamp‌ ‌is‌ ‌small‌ ‌yet‌ ‌spreads‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌Its‌ ‌is‌ ‌beautifully‌ ‌shown‌ ‌how‌ ‌small‌ ‌creatures‌ ‌or‌ ‌things‌ ‌have‌ ‌the‌ ‌capacity‌ ‌to‌ ‌make‌ ‌a‌ ‌world‌ ‌beautiful.‌‌

जाता अस्ताला भावार्थ‌ ‌

जाता‌ ‌अस्ताला‌ ‌सूर्याचे‌ ‌
डोळे‌ ‌पाणावले‌ ‌
जाईन‌ ‌मी‌ ‌जर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌
होईल‌ ‌कैसे‌ ‌भले‌ ‌

‌सूर्य‌ ‌आपल्या‌ ‌प्रखर‌ ‌उष्णतेने‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशित‌ ‌करून‌ ‌टाकतो.‌ ‌सूर्योदयापासून‌ ‌ते‌ ‌सूर्यास्तापर्यंत‌ ‌न‌ ‌थकता‌ ‌न‌ ‌दमता‌ ‌तो‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌म्हणजेच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वीला‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌सूर्याने‌ ‌उचललेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌प्रत्येक‌ ‌गोष्टीची‌ ‌काळजी‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌कुटुंबाचा‌ ‌प्रमुख‌ ‌या‌ ‌नात्याने‌ ‌चिंतातुर‌ ‌आहे.‌ ‌

‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌जाणार‌ ‌तेव्हा‌ ‌ही‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारमय‌ ‌होईल,‌ ‌ही‌ ‌भीती‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌याच‌ ‌भीतीने‌ ‌व‌ ‌पृथ्वीच्या‌ ‌काळजीपोटी‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌पाणावले‌ ‌आहेत.‌ ‌सूर्याला‌ ‌वाईट‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌माझ्यानंतर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌काय‌ ‌होईल?‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌लागलेली‌ ‌आहे.‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌लगेच‌ ‌सारी‌ ‌धरा‌ ‌कुणी‌ ‌वाचवा‌ ‌या‌ ‌पृथ्वीला‌ ‌करा‌ ‌करा‌ ‌हो‌ ‌त्वरा‌‌ मावळतीला‌ ‌चाललेल्या‌ ‌सूर्याला‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीचे‌ ‌काय‌ ‌होईल‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌लागली‌ ‌आहे.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌लगेचच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌करणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌असायला‌ ‌हवे,‌ ‌तिला‌ ‌कोणीतरी‌ ‌वाचवायला‌ ‌हवे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌त्यासाठी‌ ‌कोणीतरी‌ ‌पुढाकार‌ ‌घ्यावा,‌ ‌त्वरेने‌ ‌यावे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌आपला‌ ‌कोणीतरी‌ ‌उत्तराधिकारी‌ ‌असावा,‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌कोणीतरी‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌उचलावे‌ ‌अशी‌ ‌सूर्याची‌ ‌आंतरिक‌ ‌इच्छा‌ ‌आहे.‌‌

कुणी‌ ‌न‌ ‌उठती‌
‌ये‌ ‌ना‌ ‌पुढती‌
‌कुणास‌ ‌ना‌ ‌शाश्वती‌ ‌
इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌हळूचि‌
‌पणती‌ ‌ये‌ ‌पुढती‌‌

सूर्याच्या‌ ‌प्रचंड‌ ‌तेजाला‌ ‌दुसरा‌ ‌पर्यायच‌ ‌नाही.‌ ‌त्याच्यासारखा‌ ‌तोच!‌ ‌त्याची‌ ‌जागा‌ ‌कोण‌ ‌चालवील?‌ ‌त्याच्यासारखे‌ ‌प्रचंड‌ ‌कार्य‌ ‌कोणालाही‌ ‌जमणार‌ ‌नाही.‌ ‌या‌ ‌पृथ्वीतलावरील‌ ‌कोणीही‌ ‌सूर्याची‌ ‌जागा‌ ‌घेऊ‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌त्यामुळे‌ ‌कोणीही‌ ‌पुढे‌ ‌यायला‌ ‌तयार‌ ‌नाही‌ ‌कारण‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌अंधार‌ ‌दूर‌ ‌करण्याची‌ ‌कोणाकडेच‌ ‌ताकद‌ ‌नाही.‌‌

तेवढ्यात‌ ‌हळू‌ ‌हळू‌ ‌मनाचे‌ ‌धाडस‌ ‌करत,‌ ‌इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌एक‌ ‌पणती‌ ‌पुढे‌ ‌येते.‌ ‌खरे‌ ‌तर‌ ‌पणतीचा‌ ‌केवढा‌ ‌तो‌ ‌प्रकाश,‌ ‌पण‌ ‌ती‌ ‌पुढाकर‌ ‌घेते.‌ ‌अंधारल्या‌ ‌रात्री‌ ‌पृथ्वीवर‌ ‌थोडाफार‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌ती‌ ‌स्विकारते.‌ ‌ती‌ ‌तेवढे‌ ‌धाडस‌ ‌दाखवते.‌

‌विनम्र‌ ‌भावे‌ ‌लवून‌ ‌म्हणे‌ ‌ती‌ ‌
तेजोमय‌ ‌भास्करा‌ ‌
मम‌ ‌तेजाने‌ ‌जमेल‌ ‌तैसी‌
‌उजळून‌ ‌टाकीन‌ ‌धरा‌

‌सूर्यापुढे‌ ‌आकाराने‌ ‌अगदीच‌ ‌लहान‌ ‌असणारी‌ ‌पणती‌ ‌सूर्याचे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌जाणते‌ ‌आहे.‌ ‌त्याचा‌ ‌तेजोमय‌ ‌प्रकाश‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌त्याच्यापुढे‌ ‌आपण‌ ‌क्षुल्लक‌ ‌आहोत‌ ‌हेही‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌तरीही‌ ‌ती‌ ‌धाडस‌ ‌करते‌ ‌आणि‌ ‌अतिशय‌ ‌विनम्रपणे‌ ‌सूर्यदेवाला‌ ‌नमस्कार‌ ‌करून‌ ‌म्हणते,‌ ‌”हे‌ ‌तेजोमय‌ ‌भास्करा,‌ ‌तुझ्याकडे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌आहे.‌ ‌मी‌ ‌बापडी‌ ‌लहानशी.‌ ‌माझ्याकडेही‌ ‌प्रकाश‌ ‌आहे‌ ‌पण‌ ‌त्याची‌ ‌तुझ्याशी‌ ‌तुलना‌ ‌होऊच‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌मी‌ ‌माझ्याकडे‌ ‌असणाऱ्या‌ ‌थोड्याशा‌ ‌प्रकाशाने‌ ‌जेवढी‌ ‌जमेल‌ ‌तेवढी‌ ‌पृथ्वी‌ ‌उजळून‌ ‌टाकू‌ ‌शकते.‌ ‌माझा‌ ‌तेवढाच‌ ‌’खारीचा‌ ‌वाटा’.‌ ‌माझ्यामुळे‌ ‌खूप‌ ‌मोठी‌ ‌प्रखरता‌ ‌निर्माण‌ ‌होणार‌ ‌नाही,‌ ‌परंतु‌ ‌अंधाराला‌‌ छिद्र‌ ‌पाडण्याची‌ ‌ताकत‌ ‌माझ्यात‌ ‌आहे.‌ ‌तुझ्या‌ ‌जाण्याने‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌अंधार‌ ‌मी‌ ‌थोडाफार‌ ‌तरी‌ ‌भेदू‌ ‌शकते.‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌मी‌ ‌करू‌ ‌शकते”,‌ ‌तसे‌ ‌आश्वासन‌ ‌ती‌ ‌सूर्याला‌ ‌देते.‌ ‌

वच‌ ‌हे‌ ‌ऐकुनि‌ ‌त्या‌ ‌तेजाचे‌ ‌
डोळे‌ ‌ओलावले‌
‌तृप्त‌ ‌मनाने‌ ‌आणि‌ ‌रवि‌ ‌तो‌
‌झुकला‌ ‌अस्ताकडे‌‌

दैदिप्यमान‌ ‌असणाऱ्या‌ ‌सूर्यापुढे‌ ‌एवढीशी‌ ‌पणती‌ ‌बोलत‌ ‌होती. तिच्या‌ ‌बोलण्यात‌ ‌तेज‌ ‌होते.‌ ‌धाडस‌ ‌होते.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌चालू‌ ‌राहील‌ ‌याची‌ ‌शाश्वती‌ ‌सूर्याला‌ ‌मिळाली.‌ ‌छोट्याशा‌ ‌पणतीचे‌ ‌हे‌ ‌धाडस‌ ‌पाहून‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌ओलावले,‌ ‌त्याच्या‌ ‌डोळ्यांत‌ ‌आनंदाश्रू‌ ‌आले.‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌घेणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌विचाराने‌ ‌तो‌ ‌तृप्त‌ ‌झाला.‌ ‌पृथ्वीमातेची‌ ‌काळजी‌ ‌घेण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌पणतीने‌ ‌उचलली‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌मनाला‌ ‌आनंद‌ ‌देणाऱ्या‌ ‌विचारातच‌ ‌सूर्य‌ ‌अस्ताकडे‌ ‌झुकला.‌ ‌सूर्य‌ ‌मावळला‌ ‌पण‌ ‌त्याचे‌ ‌कार्य‌ ‌सुरू‌ ‌राहिले.‌ ‌त्याचे‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌पण‌ ‌पणती‌ ‌करत‌ ‌राहिली.‌‌

जाता अस्ताला शब्दार्थ‌ ‌

  • जाईन‌ –‌ ‌जाणे‌
  • ‌कैसे‌ – ‌कसे‌‌
  • भले‌ –‌ ‌चांगले‌ ‌
  • धरा‌ –‌ ‌पृथ्वी‌‌ –‌ ‌(earth)‌ ‌
  • त्वरा‌ –‌ ‌घाई,‌ ‌लवकर‌ –‌ ‌(to‌ ‌be‌ ‌hurry)‌ ‌
  • शाश्वती‌ ‌–‌ ‌विश्वास,‌ ‌खात्री,‌ ‌भरवसा‌ –‌ ‌(surety)‌ ‌
  • पुढती‌ –‌ ‌समोर‌‌ –‌ ‌(in‌ ‌front‌ ‌of)‌ ‌
  • विनम्र‌ –‌ ‌नम,‌ ‌विनयशील‌ –‌ ‌(humble)‌ ‌
  • लवून‌ –‌ ‌वाकून,‌ ‌नम्र‌ ‌होऊन‌ –‌ ‌(to‌ ‌bend)‌‌
  • भाव‌ –‌ ‌भावना‌‌ –‌ ‌(emotions)‌ ‌
  • ‌भास्कर‌‌ –‌ ‌सूर्य‌ –‌ ‌(sun)‌ ‌
  • मम‌‌ –‌ ‌माझ्या,‌ ‌माझे –‌ ‌(mine)‌ ‌
  • तेजाने‌ –‌ ‌प्रकाशाने –‌ ‌(lustre)‌ ‌
  • ‌वच‌‌‌‌ –‌ ‌बोलणे‌‌ –‌ ‌(saying)‌ ‌
  • तृप्त‌‌ –‌ ‌समाधानी,‌ ‌संतोष‌ –‌ ‌(satisfied)‌ ‌
  • ‌झुकणे –‌ ‌कलणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌incline)‌‌

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions 

Urja Shakti Cha Jagar Class 10 Marathi Chapter 8 Question Answer Maharashtra Board

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 Marathi Chapter 8 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 20

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 22
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 21

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
कारणे लिहा.
(अ) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका घरूनच न्यावी लागे कारण लेखकाची शाळा गरीब होती. फक्त तीन पैसे किंमत असलेली उत्तरपत्रिका शाळा विदयार्थ्यांना देऊ शकत नव्हती.

(आ) लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही कारण तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाई.

(इ) लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाला गिरगांवातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारण प्रवेश फी ची व्यवस्था होईपर्यंत त्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते.

प्रश्न 4.
कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.
(अ) आपण सगळ्यांनी …………………………. मदत केली पाहिजे. (आई)
उत्तर:
आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.

(आ) आमच्या बाईंनी प्रमुख …………………………. आभार मानले. (पाहुणे)
उत्तर:
आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

(इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …………………………. रुजू झाला. (नोकरी)
उत्तर:
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार
(१)
(१) उपमेय
(२) उपमान

प्रश्न 6.
स्वमत.
(अ) ‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तरः
भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हा प्रयोग दाखवून भावे सर लेखकाला म्हणाले ‘माशेलकर तुमची उर्जा एकत्र करा. काहीही जाळता येतं.’ – याचाच अर्थ असा की ज्या विषयाचा ध्यास घेतला आहे, त्यात पूर्णपणे स्वत:ला झोकून दया, कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. साध्य करू शकता. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून मिळालं. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. भावे सरांच्या शब्दांतून त्यांना पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त ऊर्जा मिळाली.

(आ) शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा
उत्तरः
वयाच्या सहाव्या वर्षीच लेखकांचे वडील वारल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये रहावे लागले. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असताना. दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आईबरोबर शिक्षणाची आस असलेल्या लेखकांना रहावे लागले. यावरून परिस्थितीशी मिळते जुळते घेत आलेल्या संकटांशी सामना करणे हा गुण त्यांच्यातून दिसून येतो. महापालिकेच्या खेतवाडीतील शाळेत वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना पायात चप्पलही घालायला मिळाली नाही. अशा परिस्थितीत ते शाळा शिकले. यावरून शिक्षणाविषयीची त्यांची चिकाटी, आस्था या गुणांचे दर्शन घडते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती तेवढेही रुपये त्यावेळी त्यांच्याकडे नव्हते. प्रवेश फी नसल्याने आईच्या ओळखीच्या बाई (माऊली) मदतीला धावून आली पण तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. शेवटी कसाबसा युनियन हायस्कूल मध्ये प्रवेश मिळताच लेखकांचा पुढील प्रवास सुरु झाला. छोटाशा खोलीत पूरक वातावरण नसताना लेखकांनी आपले शिक्षण थांबवले नाही, तर अशाही वातावरणात त्यांच्या जिद्दीची दाद दयावीशी वाटते. ते पुढे मिळते जुळते घेत शिकतच राहिले.

त्याचवेळी लेखकांच्या हळव्या मनावर त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्याच्या अभ्यासाचा पाया पक्का झाला. शिक्षणाबददल त्यांना अजून ओढ वाटू लागली.

शिक्षणाशिवाय या जगात तरणोपाय नाही हे कळल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना वाटेल त्या परिस्थितीत शिकवण्याचे ठरवले. कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्यांच्या वह्या करायची. अखंड पेन्सिल न मिळाल्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहित गेले. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे प्रयोगाने सिदध करून दाखवले व माशेलकरांना त्यांच्यातील उर्जाशक्तीचे रुप ओळखण्यास प्रवृत्त केले. त्यावरून त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

या सर्व प्रसंगांतून लेखकाचा आत्मविश्वास वाढवून दिला. जगण्याचे भान मिळाले. आणि पुढे लेखक फार मोठे वैज्ञानिक संशोधक झाले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(इ) डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.

उत्तरः
स्वतःचे वडील वारल्यावर आई त्यांना घेऊन मुंबईस खेतवाडीतील देशमुख गल्लीत एका छोट्यासा पहिल्या माळ्यांवर राहिली तरीही लेखकांनी आईस कधी नाही म्हटले नाही. त्याही स्थितीत ते आईबरोबर राहिले.

हायस्कूलला शिकण्यास गेल्यावर एकवीस रूपये फी पुढील कॉलेजसाठी प्रवेश मिळवण्यासाठी नव्हती तरीही धीर न सोडता आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून तिने प्रवेश फीची व्यवस्था केली व प्रवेश घेतला. मात्र अशा वातावरणात लेखकांनी जिद्दीने अभ्यास केला.

उत्तरपत्रिकेची फी भरण्यासाठीचे फक्त तीन पैसे एवढेही पैसे त्यांच्याकडे नसल्याने मग आईने गिरगावातील अनेक कामे केली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. हे पाहून लेखकांच्या मनातील जिद्द अजून वाढली व ते अति जोमाने शिक्षण घेऊ लागले. इत्यादी उदाहरणांतून माशेलकरांची मातृभक्ती ठळकपणे दिसून येते.

(ई) ‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर:
प्रत्येकाच्या जीवनात आपल्या शिक्षकांचे स्थान फार महत्त्वपूर्ण असते. माझ्याही जीवनात शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शक्ती मिळाली. मी आज ज्या मोठ्या पदावर पोहोचलो आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच, म्हणून माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
ओघ तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 4

प्रश्न 3.
योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………….. हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. (ताई, माई, आई, बाई)
उत्तर:
(i) आई

(ii) आमचे मूळ गाव ……………………….. गोव्यातील माशेल. (उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण)
उत्तर:
(ii) दक्षिण

(iii) मी आणि माझी आई ……………………….. येऊन पोहोचलो. (गोव्यात, अमरावतीत, मुंबईत, पुण्यात)
उत्तर:
(iii) मुंबईत

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) दारिद्र्याशी संषर्घ करणारी – लेखकाची आई
(ii) शाळेत कसा जाऊ? असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे – लेखक माशेलकर

प्रश्न 3.
घटना आणि परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव काय होते?
उत्तरः
लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव ‘युनियन हायस्कूल’ असे होते.

(ii) लेखक आपल्या आईचे व मामाचे ऋण का मानतात?
उत्तरः
युनियन हायस्कुल व त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांशी संपर्क यांच्यामुळे आला म्हणून लेखक आईचे व मामाचे ऋण मानतात.

(iii) लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व कोण होते?
उत्तर:
लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व आई होती.

(iv) उदहनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला कुठे जावे लागले?
उत्तरः
उदरनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला मुंबईला जावे लागले.

प्रश्न 5.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 6
उत्तर:
(i – आ),
(ii – ई),
(iii – अ),
(iv – इ)

प्रश्न 6.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.
(ii) माझे बालपण तिथेच गेले.
(iii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iv) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
उत्तर:
(i) माझे बालपण तिथेच गेले.
(ii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iii) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
(iv) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 7.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 7

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या बालपणीच्या काळाचं वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखकाचे बालपण गोव्यातील माशेल या गावी गेले. आई, वडील आणि त्यांचे मामाही याच गावात राहात होते. माशेलच्या मैदानावर खेळल्याच्या, तिथल्या पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी त्यांना आठवतात. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांना व त्यांच्या आईला माशेल सोडून मुंबईला यावे लागले.

प्रश्न 2.
आपल्या शालेय शिक्षणातील अडचणींचे वर्णन लेखकाने कसे केले आहे?
उत्तरः
वयाच्या ६व्या वर्षी लेखकाचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना माशेल सोडून मुंबईला यावे लागले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली होती. शिक्षण घेण्यासाठी लेखक खूप उत्सुक होते. पण फी भरणे शक्य नसल्यामुळे आपण शाळेत जाऊ शकू की, नाही असे त्यांना वाटत असे.

प्रश्न 3.
माशेलहून मुंबईला आल्यावर लेखकाची व त्याच्या आईची स्थिती कशी होती ते थोडक्यात लिहा.
उत्तरः
वडिलांच्या निधनामुळे लेखक व त्यांची आई उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीत ते राहत होते. लेखकाच्या आईकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्यामुळे तिला व लेखकाला खूप गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेची फी भरणेही त्यांच्या आईला शक्य नव्हते.

प्रश्न 4.
लेखकाची शाळा व शिक्षक यांच्याबद्दल माहिती तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
लेखक सहा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना मुंबईला यावे लागले. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांनी व आईच्या कष्टाळूवृत्तीमुळे त्यांचे शिक्षण सुरू झाले. गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. या शाळेतील सर्वच शिक्षक अत्यंत प्रेमळ व आपुलकीनं संस्कार करणारे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य ती दिशा मिळाली.

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण . . .
उत्तर:
माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण त्यांना लेखकाच्या शिक्षणाची सोय करायची होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण . . .
उत्तरः
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती त्यामुळे ती लेखकासाठी चप्पल खरेदी करू शकत नव्हती.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 8

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) कोणामुळे लेखकाला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला?
उत्तर:
लेखकाच्या मामांमुळे त्यांना खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला.

(ii) लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी किती रुपये होती?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती.

(iii) लेखकाच्या आईने कशाप्रकारे पैसे जमवण्यास सुरुवात केली?
उत्तरः
लेखकाच्या आईने आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून पैसे जमवण्यास सुरुवात केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती …………………………… होती. (चांगली, गुणवत्तापूर्वक, बेताचीच, हालाखीची)
(ii) पण तोपर्यंत …………………………… त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. (गोरेगावातील, मुंबईतील, गिरगावातील, गोव्यातील)
(iii) अखेर …………………………… हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. (युनिटी, युनियन, न्यू इंग्लिश)
उत्तर:
(i) बेताचीच
(ii) गिरगावातील
(iii) युनियन

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 9

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) माशेलहून मुंबईला आलेले. – [लेखकाचे मामा]
(ii) यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला – [लेखकाला]
(iii) मनानं श्रीमंत असलेले – [लेखकाचे शिक्षक]

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(ii) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.
(iii) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(iv) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
उत्तर:
(i) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
(iii) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(iv) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 10
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) प्राथमिक : शाळा :: माध्यमिक : ……………………..
(ii) अपूरी : जागा :: पूरक : ……………………..
उत्तर:
(i) शिक्षण
(ii) वातावरण

प्रश्न 6.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 11

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘पण त्याही परिस्थितीत मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हायस्कूल शिक्षणाच्या वेळी लेखकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अनवाणी शाळेत गेले. छोट्याशा खोलीतली जागा अपुरी पडत होती. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. अनेक अडीअडचणी आणि अभाव सहन करून लेखक जिद्दीने अभ्यास करत राहिले आणि परीक्षेत चांगले यश मिळवले.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईचे वर्णन उताऱ्याच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
पतीच्या निधनामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेल्या स्थितीत ती आपल्या मुलाला घेऊन मुंबईला आली. विपरीत परिस्थितीतही तिने धीर सोडला नाही. मिळेल ते, पडेल ते काम तिने केले. पण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ती खंबीरपणे त्याच्या पाठी उभी राहिली. परिस्थितीला शरण न जाता धीराने वागणारी अत्यंत कष्टाळू अशी लेखकाची आई होती.

प्रश्न 3.
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळाला?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूल प्रवेशाच्या वेळी लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण लेखकाच्या आईने पडेल ते काम केले आणि एका सहृदय मातेने मदत केली. अशा प्रकारे २१ रुपये फी जमवली. तो पर्यंत सर्व चांगल्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. म्हणून मग त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. याच युनियन हायस्कूलमधील शिक्षक, त्यांचे संस्कार, तेथील शिक्षण यामुळे जीवनातल्या अनेक प्रगतीच्या वाटा लेखकासमोर निर्माण झाल्या.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पुर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 12
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 13

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
(i) ……………………….. एक आंतरिक ओढ वाटू लागली. (शिक्षणाबद्दल, खेळाबद्दल, कलेबद्दल, शाळेबद्दल)
(ii) त्यावेळी उत्तरपत्रिकेची किंमत फक्त ……………………….. पैसे असायची. (एक, दोन, तीन, चार)
(iii) अखंड ……………………….. मला मिळणं अवघड होतं. (पेन्सिल, पेन, वही, फळा)
उत्तर:
(i) शिक्षणाबद्दल
(ii) तीन
(iii) पेन्सिल

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 14
उत्तर:
(i – ई),
(ii – इ),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 15

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीन लेखकाला लिहावं लागे कारण . . . . .
उत्तर:
जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनं लेखकाला लिहावं लागे कारण अखंड पेन्सिल विकत घेण्याएवढे पैसे लेखकाच्या आईकडे नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ का गेली?
उत्तर:
तिथे काही काम मिळणार आहे, अशी बातमी कळाल्याने लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ गेली.

(ii) लेखकाच्या आईने लेखकासाठी कशाप्रकारे वह्या बनवल्या?
उत्तर:
कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद एकत्र जमा करून लेखकाच्या आईने लेखकासाठी वह्या बनवल्या.

(iii) लेखकाच्या हायस्कूलमध्ये नेहमी कोणत्या दिवशी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.

(iv) काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने लेखकाच्या आईने काय ठरविले?
उत्तर:
काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने आपल्या मुलाला म्हणजेच लेखकाला खूप शिकवेन, असे त्यांच्या आईने ठरवले.

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) तिनं ठरवलं, की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
उत्तर:
(i) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) तिनं ठरवलं, की ‘मी माझ्या मुलाला खूप शिकवीन,

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) सेवाभावी : वृत्ती :: प्रचंड : …………………………….
(ii) अंगावर : काटा :: डोळ्यांत : …………………………….
उत्तर:
(i) कष्ट
(ii) पाणी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
युनियन हायस्कूलमधील शिक्षकांबद्दल लेखकाने सांगितलेल्या आठवणी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
युनियन हायस्कूलमधले सगळे शिक्षक खूप प्रेमळ होते. त्यांची वृत्ती सेवाभावी होती. विदयार्थ्यांना शिकवताना ते स्वत:ला झोकून देत असत. लेखकाच्या शालेय जीवनात त्यांनी अगदी निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन केले. यामुळे लेखकाच्या शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला असे नाही तर आयुष्याचा पाया देखील पक्का झाला. त्यामुळेच लेखकाच्या मनात शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसजवळ काम मिळाले नाही याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखकाच्या शाळेत दर शनिवारी चाचणी परीक्षा असायची उत्तरपत्रिका घरून आणावी लागे. तिची किंमत तीन पैसे असायची पैशाची व्यवस्था करण्यासाठी ती काँग्रेस हाऊसजवळ काम मिळेल या आशेने खूप वेळ रांगेत ताटकळत उभी राहिली. त्यानंतर तिला कळले की, तिसरी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्यांनाच या ठिकाणी काम मिळतं. त्यामुळे तिची खूप निराशा झाली. तेव्हाच आपल्या मुलाला खूप शिकवायचं असा निश्चय तिने केला.

प्रश्न 3.
लेखकाच्या शिक्षणासाठी लेखकाच्या आईने कोणते कष्ट सोसले ते लिहा.
उत्तरः
लेखकासोबत ती अत्यंत छोट्याशा घरात राहिली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. व लेखकाच्या शिक्षणासाठी पैसे जमवले. कोरे,पाठकोरे कागद जमवून ती लेखकासाठी वह्या तयार करायची. छोट्या-छोट्या का होईना त्या पेन्सिली ती लेखकाला लिहायला यायची. कोणत्याही परिस्थितीत लेखकाच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची.

प्रश्न 4.
आपल्या आईबद्दलच्या लेखकाच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखक म्हणतात माझ्या आईच्या श्रमाला, कष्टाला तोड नाही. तिच्या श्रमाचं वर्णन करताना ते भावूक होऊन म्हणतात की, माझ्या आईचे श्रम आठवले की, माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. अशा या प्रचंड कष्ट करणाऱ्या आईचे लेखक सदैव ऋण मानतात. तिला ते आपली पहिली शिक्षक व सर्वस्व मानतात. प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
पुढील कृती करा.

(i) ‘भौतिक शास्त्र’ असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा?
उत्तरः
भावे सर कोणता विषय शिकवत असतं?

(ii) विषयाची गोडी लावली, असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
विज्ञान शिकवताना भावे सरांनी आणखी कोणती गोष्ट साधली?

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 16
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 17

प्रश्न 3.
रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………………. हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली. (भूगोलातील, मराठीतील, इंग्रजीतील, विज्ञानातील)
(ii) भिंगाच्या साहाय्यानं ……………………………. शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. (चंद्रकिरणांची, ऊर्जेची, सूर्यकिरणांची, विजेची)
(iii) माझी शाळा हे ‘माझे ……………………………. केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. (संस्कार, स्मरणीय, आवडते, संस्कारक्षम)
उत्तर:
(i) विज्ञानातील
(ii) सूर्यकिरणांची
(iii) संस्कार

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 18
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलनकृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(i) लेखकाला जीवनाचे तत्त्वज्ञान देणारे – [भावे सर]
(ii) पुन्हा मनोमनी शाळेत जाणारे – [लेखक]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 19

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाला भावे सर कोणत्या हायस्कूलमध्ये भेटले?
उत्तर:
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये भावे सर भेटले.

(ii) लेखकाला कोणते क्षण आठवतात?
उत्तरः
प्रचंड दारिद्र्याशी सामना करतानाचे क्षण लेखकाला आठवतात.

(iii) भावे सरांनी कोणता प्रयोग करून दाखवला?
उत्तर:
भावे सरांनी भिंगाच्या साहाय्याने कागद जाळण्याचा प्रयोग करून दाखवला.

(iv) लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून काय गवसलं?
उत्तरः
लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान गवसलं.

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(i) विषयाची : गोडी :: जगण्याचे : ……………………………..
(ii) एकाग्रतेचा : मंत्र :: संघर्षासाठी : ……………………………..
उत्तर:
(i) भान
(ii) आत्मविश्वास

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाने आपल्या शाळेतील शिक्षकांबद्दलच्या भावना कशाप्रकारे व्यक्त केल्या आहेत ते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तरः
लेखक म्हणतात की, माझ्या जीवनाच्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे. भावे सरांकडून एकाग्रतेचा मंत्र आणि जीवनाचे तत्वज्ञान मिळाले. जोशी सर शिर्के सर, मालेगाववाला सर यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळाले. आयुष्याच्या उभारणीसाठी संस्कार आणि संघर्षासाठी सामना करण्याचं बळ मिळालं. जीवनात खंबीरपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास त्यांच्या सगळ्या शिक्षकांकडून त्यांना मिळाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
लेखकाने संस्कार केंद्र कोणाला म्हटले आहे ? का?
उत्तरः
लेखकाने ‘संस्कार केंद्र’ त्यांची आई, शाळा आणि शिक्षक यांना म्हटले आहे. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट करणारी आई. परिस्थितीपुढे शरण न जाता जिद्दीने पुढे जाण्याचा मार्ग तिने लेखकाला दाखवला आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारातून, शिकवणुकीतून लेखकाला जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. या सगळ्यामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली.

प्रश्न 3.
विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत शाळा किती महत्त्वाची भूमिका बजावते यावर तुमचे विचार लिहा.
उत्तरः
विदयार्थी हा बालपणापासून शाळेत असतो त्याचा अधिकाधिक वेळ शाळेत जातो आणि त्या वयात तो जे शिकतो अनुभवतो ते त्याच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम करते. शाळेतले शिक्षक, उपक्रम, शाळेतले वातावरण, या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. बालपणापासून ते किशोरवयापर्यंत अनेक गोष्टीतून तो शिकतो. म्हणून विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शाळेची फार महत्त्वाची भूमिका असते असे मला वाटते. स्वाध्याय कृती

प्रश्न 4.
कारणे लिहा.

(i) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण . . .
उत्तरः
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण युनियन हायस्कूलमधील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व दिलेले शिक्षण

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in Marathi

ऊर्जाशक्तीचा जागर पाठपरिचय‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 24

‘उर्जाशक्तीचा‌ ‌जागर’‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌’डॉ.‌ ‌रघुनाथ‌ ‌माशेलकर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌त्यांनी‌ ‌आपल्या‌ ‌लहानपणीच्या‌ ‌आठवणी‌ ‌दिलेल्या‌ ‌आहेत.‌ ‌लहानपणीच‌ ‌पित्याचे‌ ‌छत्र‌ ‌हरपलेल्या‌ ‌माशेलकरांना‌ ‌त्यांच्या‌ ‌आईने‌ ‌अत्यंत‌ ‌प्रतिकूल‌ ‌परिस्थितीतून‌ ‌जिद्दीने‌ ‌शिक्षण‌ ‌घेण्यास‌ ‌प्रवृत्त‌ ‌कसे‌ ‌केले,‌ ‌त्याचे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌केले‌ ‌आहे.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in English

‘Urjashakticha‌ ‌Jagar’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌Dr.‌ ‌Raghunath‌ ‌Mashelkar.‌ ‌He‌ ‌has‌ ‌written‌ ‌about‌ ‌his‌ ‌childhood‌ ‌memories.‌ ‌He‌ ‌lost‌ ‌his‌ ‌father‌ ‌at‌ ‌an‌ ‌early‌ ‌age.‌ ‌Thereafter,‌ ‌the‌ ‌manner‌ ‌in‌ ‌which‌ ‌his‌ ‌mother‌ ‌helped‌ ‌and‌ ‌inspired‌ ‌him‌ ‌to‌ ‌get‌ ‌an‌ ‌education,‌ ‌irrespective‌ ‌of‌ ‌all‌ ‌odds,‌ ‌has‌ ‌been‌ ‌beautifully‌ ‌explained.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर शब्दार्थ‌‌

  • मुलभूत‌ ‌– ‌पायाभूत‌ ‌– ‌(basic)‌ ‌
  • ‌बौद्धिक‌ ‌– ‌बुद्धिशी‌ ‌संबंधित‌ ‌– ‌(intellectual)‌‌
  • क्षमता‌ ‌– ‌सामर्थ्य‌ ‌– ‌(ability)‌ ‌
  • नियोजन‌ ‌– ‌योजना‌ ‌– ‌(planning)‌ ‌
  • शास्त्रज्ञ‌ ‌– ‌वैज्ञानिक‌ ‌– ‌(a‌ ‌scientist)‌ ‌
  • तंत्रज्ञान‌ ‌– ‌(technology)‌ ‌
  • धोरण‌ ‌उद्दिष्ट‌ ‌– ‌(aim)‌ ‌
  • महत्कार्य‌ ‌– ‌महान‌ ‌कार्य‌ ‌– ‌(great‌ ‌work)‌ ‌
  • कष्ट‌ ‌– ‌मेहनत‌ ‌– ‌(hard‌ ‌work)‌ ‌
  • शिस्त‌ ‌– ‌वळण‌ ‌– ‌(discipline)‌ ‌
  • नेतृत्वगुण‌ ‌–‌ (leadership‌ ‌quality)‌
  • संरक्षण‌ ‌– ‌(protection)‌
  • ‌हरपणे‌ ‌– ‌गमावणे‌ ‌– ‌(to‌ ‌lose)‌
  • ‌प्रतिकूल‌ ‌– ‌उलट,‌ ‌विरोधी‌ ‌– ‌(adverse)‌
  • ‌जिद्द‌ ‌– ‌आग्रह‌ ‌– ‌(ambition)‌ ‌
  • आपुलकी‌ ‌– ‌आपलेपणा‌ ‌– ‌(affection)‌‌
  • संस्कार‌ ‌– ‌चांगले‌ ‌गुण‌ ‌– ‌(values)‌
  • ‌ऋण‌ ‌– ‌उपकार‌ ‌– ‌(obligation)‌‌
  • संपर्क‌ ‌– ‌संबंध‌ ‌– ‌(contact)‌
  • ‌सर्वस्व‌ ‌– ‌सर्व‌ ‌काही‌ ‌– ‌(one’s‌ ‌all)‌ ‌
  • पिंपळकट्टा‌ ‌– ‌(raised‌ ‌platform‌ ‌of‌‌ stones‌ ‌around‌ ‌fig‌ ‌tree)‌ ‌
  • निवांतपणा‌ ‌– ‌शांतपणा‌ ‌– ‌(silence)‌
  • ‌पुसट‌ ‌– ‌अस्पष्ट‌ ‌– ‌(faint)‌
  • ‌लहर‌ ‌– ‌वाऱ्याची‌ ‌झुळूक‌ ‌– ‌(a‌ ‌breeze)‌‌
  • वारले‌‌‌ ‌– ‌मृत्यु‌ ‌पावले‌ ‌– ‌(die)‌ ‌
  • उदरनिर्वाह‌ ‌– ‌उपजीविका‌ ‌– ‌(livelihood)‌‌
  • ‌माडी‌ ‌– ‌(a‌ ‌lott)‌ ‌
  • आर्थिक‌ ‌परिस्थिती‌ ‌– ‌(financial‌ ‌condition)‌ ‌
  • खालावणे‌ ‌– ‌बिघडणे‌ ‌दारिद्रय‌ ‌– ‌गरिबी‌ ‌– ‌(poverty)‌
  • ‌संघर्ष‌ ‌– ‌झुंज‌ ‌– ‌(struggle)‌
  • ‌आसुसणे‌ ‌– ‌तीव्र‌ ‌इच्छा‌ ‌होणे‌ ‌– ‌(to‌ ‌lust)‌ ‌
  • अनवाणी‌ ‌– ‌पायात‌ ‌वहाणा‌ ‌व‌ ‌काहीही‌ ‌न‌ ‌घालता‌‌ – (‌footed)‌ ‌
  • नामांकित‌ ‌– ‌प्रख्यात‌ ‌– ‌(famous)‌ ‌
  • टप्पा‌ ‌– ‌मजल‌ ‌– ‌(a‌ ‌stage)‌ ‌
  • अपुरी‌ ‌– ‌पुरेशी‌ ‌नसलेली‌ ‌– ‌(insufficient)‌ ‌
  • पुरक‌ ‌– ‌योग्य‌ ‌– ‌(suitable)‌ ‌
  • सेवाभाव‌ ‌– ‌मदतीची‌ ‌वृत्ती‌ ‌– ‌(servitude)‌‌

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions 

Class 10 Hindi Chapter 6 Giridhar Nagar Question Answer Maharashtra Board

Std 10 Hindi Chapter 6 Giridhar Nagar Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Hindi Solutions Lokbharti Chapter 6 गिरिधर नागर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Hindi Lokbharti 10th Digest Chapter 6 गिरिधर नागर Questions And Answers

Hindi Lokbharti 10th Std Digest Chapter 6 गिरिधर नागर Textbook Questions and Answers

कृति

(कृतिपत्रिका के प्रश्न 2 (अ) तथा प्रश्न 2 (आ) के लिए)
सूचनानुसार कृतियाँ कीजिए:

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 1
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 16

प्रश्न 2.
प्रवाह तालिका पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 2
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 8

Maharashtra Board Solutions

प्रश्न 3.
इस अर्थ में आए शब्द लिखिए:

 अर्थशब्द
i. दासी………….
ii. साजन………….
iii. बार-बार………….
iv. आकाश………….

उत्तर:

 अर्थशब्द
i. दासीचेरी
ii. साजनपति
iii. बार-बारबेर-बेर
iv. आकाशअंबर

प्रश्न 4.
कन्हैया के नाम
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 3
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 5

प्रश्न 5.
दूसरे पद का सरल अर्थ लिखिए।
उत्तर:
(i) निकट – ढिग
(ii) साजन – पति।

उपयोजित लेखन

निम्नलिखित शब्दों के आधार पर कहानी लेखन कीजिए तथा उचित शीर्षक दीजिए:
अलमारी, गिलहरी, चावल के पापड़, छोटा बच्चा
उत्तर:
जीव दया
एक गाँव में एक छोटा बच्चा रहता था। उसका नाम चिंटू था। एक दिन चिंटू अपने घर के बाहर खेल रहा था। उसने देखा कि सामने एक पेड़ के नीचे दो-तीन कौए किसी चीज पर चोंच मार रहे हैं और वहाँ से हल्की-हल्की चर्ची-चीं की आवाज आ रही है। चिंटू दौड़कर वहाँ पहुँचा और उसने उन कौओं को वहाँ से उड़ाया। उसने देखा कि एक छोटी-सी गिलहरी वहाँ ची-चीं कर रही थी। उसका शरीर कौओं की चोंच से घायल हो गया था। चिंटू ने अपनी जेब से रूमाल निकाला और डरे बिना धीरे से गिलहरी को उठा लिया। उसने घर के अंदर लाकर उसे पानी पिलाया, उसके घावों को साफ करके उन पर सोफामाइसिन लगाई और उसे मेज पर बैठा दिया।

गिलहरी कुछ देर बाद धीरे-धीरे मेज पर घूमने लगी। मेज पर एक प्लेट में चावल के पापड़ रखे थे। गिलहरी ने एक पापड़ उठाया और अपने अगले दोनों पंजों में पकड़कर धीरे-धीरे उसे खाने लगी। चिंटू को बहुत अच्छा लगा। उसने माँ से पूछा कि जब तक गिलहरी बिलकुल ठीक नहीं हो जाती क्या मैं उसे अपने पास रख सकता हूँ। अभी अगर वह बाहर जाएगी तो कौए उसे अपना आहार बना लेंगे। माँ को चिंटू की ऐसी सोच पर गर्व हुआ और उन्होंने खुशी-खुशी उसकी बात मान ली। चिंटू ने अपनी किताबों की खुली आलमारी के एक खाने में एक तौलिया बिछाकर गिलहरी को बैठा दिया। उसके पास चावल के कुछ पापड़ तथा अमरूद के कुछ टुकड़े रख दिए। तीन-चार दिन बाद जब गिलहरी अच्छी तरह दौड़ने लगी तो चिंटू ने उसे बाहर पेड़ पर छोड़ दिया।

सीख: हमें पशु-पक्षियों के प्रति दया भाव रखना चाहिए।

Maharashtra Board Solutions

अपठित पद्यांश

सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए:-

काम जरा लेकर देखो, सख्त बात से नहीं स्नेह से
अपने अंतर का नेह अरे, तुम उसे जरा देकर देखो।
कितने भी गहरे रहें गर्त, हर जगह प्यार जा सकता है,
कितना भी भ्रष्ट जमाना हो, हर समय प्यार भा सकता है।
जो गिरे हुए को उठा सके, इससे प्यारा कुछ जतन नहीं,
दे प्यार उठा पाए न जिसे, इतना गहरा कुछ पतन नहीं ।।

– (भवानी प्रसाद मिश्र)

प्रश्न 1.
उत्तर लिखिए:
a. किसी से काम करवाने के लिए उपयुक्त – ………….
b. हर समय अच्छी लगने वाली बात – ………….
उत्तर:

प्रश्न 2.
उत्तर लिखिए:
a. अच्छा प्रयत्न यही है – ………….
b. यही अधोगति है – ………….
उत्तर:

प्रश्न 3.
पद्यांश की तीसरी और चौथी पंक्ति का संदेश लिखिए।
उत्तर:

भाषा बिंदु

कोष्ठक में दिए गए प्रत्येक/कारक चिह्न से अलग-अलग वाक्य बनाइए और उनके कारक लिखिए:
[ने, को, से, का, की, के, में, पर, हे, अरे, के लिए]
………………………………………………………..
………………………………………………………..
………………………………………………………..
………………………………………………………..
………………………………………………………..
उत्तर:
(1) ने – ऋतु ने खाना बनाया।
(2) को – विपिन ने प्रगति को खाना खिलाया।
(3) से – हिमानी साइकिल से ऑफिस जाती है।
(4) का – शुभम हर्षित का भाई है।
(5) की – पूर्वी आयुष की बहन है।
(6) के – नीरज के तीन चाचा हैं।
(7) में – नीनू घर में है।
(8) पर – पेड़ पर बंदर कूद रहे हैं।
(9) हे – हे भगवान, कितना शोर है यहाँ।
(10) अरे – अरे! सलिल तुम कहाँ हो?
(11) के लिए – अंशु वारिजा के लिए फ्रॉक लाई।

Hindi Lokbharti 10th Textbook Solutions Chapter 6 गिरिधर नागर Additional Important Questions and Answers

Maharashtra Board Solutions

पद्यांश क्र. 1

प्रश्न.
निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए:
(i)
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 2
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 6

(ii) a. श्रीकृष्ण के सिर पर है
b. मीरा इन्हें अपना पति मानती हैं –
उत्तर:
a. श्रीकृष्ण के सिर पर है – मोर मुकट
b. मीरा इन्हें अपना पति मानती हैं – गिरधर गोपाल

प्रश्न 2.
संजाल पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 3
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 7

Maharashtra Board Solutions

प्रश्न 3.
उचित जोड़ियाँ मिलाइए:

 आ
आँसुओं के जल से
कुल की मर्यादा
प्रेम बेल
संत संगति के कारण
छोड़ दी
आनंद फल
लोक लाज खोई
प्रेम की बेल सींची
प्रेम से बिलोई।

उत्तर:

आँसुओं के जल से
कुल की मर्यादा
प्रेम बेल
संत संगति के कारण
प्रेम की बेल सींचा।
छोड़ दी।
आनंद फल।
लोक लाज खोई।

कृति 2: (शब्द संपदा)

प्रश्न 1.
निम्नलिखित शब्दों को शुद्ध रूप में लिखिए:
(i) भगत – …………………….
(ii) माखन – …………………….
(iii) आणंद – …………………….
(iv) जाके – …………………….
उत्तर:
(i) भगत – भक्त
(ii) माखन – मक्खन
(iii) आणंद – आनंद
(iv) जाके – जिसके।

प्रश्न 2.
निम्नालाखत शब्दा क समानाथा शब्दालाखए:
(i) मोर = …………………….
(ii) जगत = …………………….
(iii) दूध = …………………….
(iv) प्रेम = …………………….
उत्तर:
(i) मोर = मयूर
(ii) जगत = संसार
(iii) दूध = दुग्ध
(iv) प्रेम = प्यार।

प्रश्न 3.
निम्नलिखित अर्थवाले शब्द पद्यांश से चुनकर लिखिए:
(i) उद्घार करो – …………………….
(ii) मुझे – …………………….
उत्तर:
(i) उद्घार करो – तारो
(ii) मुझे – मोही।

Maharashtra Board Solutions

कृति 3: (सरल अर्थ)

प्रश्न.
उपर्युक्त पद्यांश की अंतिम चार पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर:
मैंने दूध जमाने के पात्र में जमे दही को मथानी से बड़े प्रेम से बिलोया और उसमें से कृष्ण-प्रेम रूपी मक्खन को निकाल लिया। शेष छाछ रूपी निस्सार जगत को छोड़ दिया। कृष्ण-भक्तों को देखकर मैं प्रसन्न होती हूँ, परंतु संसार का व्यवहार देख मुझे दुख होता है और मैं रो पड़ती हूँ। हे गिरधरलाल, मीरा तो आपकी दासी है, उसे इस संसार रूप भव-सागर से पार लगाओ।

पद्यांश क्र. 2

प्रश्न.
निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए:

(i) ये मीरा के प्रतिपालक हैं
(ii) कृष्ण के बिना इनको कहीं आश्रय नहीं है –
(iii) मीरा को प्रभु से मिलने की तीव्र यह है –
(iv) मीरा की यह संसार सागर में डूबने वाली है
उत्तर:
(i) ये मीरा के प्रतिपालक हैं – कृष्ण
(ii) कृष्ण के बिना इनको कहीं आश्रय नहीं है – मीरा
(iii) मीरा को प्रभु से मिलने की तीव्र यह है – लालसा
(iv) मीरा की यह संसार सागर में डूबने वाली है – नौका

प्रश्न 2.
पद्यांश में आए इस अर्थ के शब्द लिखिए:

(i) दासी
(ii) आश्रय
(iii) बार-बार
(iv) नौका।
उत्तर:
(i) दासी – चेरी
(ii) आश्रय – गती
(iii) बार-बार – बेर-बेर
(iv) नौका – बेरी।

प्रश्न 3.
विधानों के सामने सत्य / असत्य लिखिए:

(i) हरि बिना मीरा को कहीं आश्रय नहीं है।
(ii) कृष्ण मीरा के पति हैं और वे उनकी पत्नी।
(iii) मीरा बार-बार प्रभु की आरती करती हैं।
(iv) मीरा की जीवन नौका संसार सागर में डूबने वाली है।
उत्तर:
(i) सत्य
(i) असत्य
(iii) असत्य
(iv) सत्य।

प्रश्न 4.
आकृति पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 9
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 10

Maharashtra Board Solutions

कृति 2: (शब्द संपदा)

प्रश्न 1.
निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए:

(i) कूण – …………………..
(ii) रावरी – …………………..
(iii) बेरी – …………………..
(iv) नेरी – …………………..
उत्तर:
(i) कूण – कहाँ
(ii) रावरी – आपकी
(iii) बेरी – बेड़ा
(iv) नेरी – पास, निकट।

प्रश्न 2.
निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखिए:
(i) पखावज …………………..
(ii) पिचकारी …………………..
(iii) गुलाल …………………..
(iv) चरण …………………..
उत्तर:
(i) पखावज – स्त्रीलिंग
(ii) पिचकारी – स्त्रीलिंग
(iii) गुलाल – पुल्लिंग
(iv) चरण – पुल्लिंग।

कृति 3: (सरल अर्थ)

प्रश्न.
उपयुक्त पद्यांश की ‘हरि बिन कूण आरति है तेरी।।’ पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर:
हे हरि, आपके बिना मेरा कौन है? अर्थात आपके सिवा मेरा कोई ठिकाना नहीं है। आप ही मेरा पालन करने वाले हैं और मैं आपकी दासी हूँ। मैं रात-दिन, हर समय आपका ही नाम जपती रहती हूँ। में बार-बार आपको पुकारती हूँ, क्योंकि मुझे आपके दर्शनों की तीव्र लालसा है।

पद्यांश क्र. 3

कृति 1: (आकलन)

प्रश्न 1.
पद्यांश में आए इस अर्थ के शब्द लिखिए:
बोर्ड की नमूना कृतिपत्रिका

(i) कमल
(ii) आकाश
(iii) श्रेष्ठ
(iv) संतोष।
उत्तर:
(i) कमल – कँवल
(ii) आकाश – अंबर
(iii) श्रेष्ठ – छतीयूँ
(iv) संतोष – संतोख।

Maharashtra Board Solutions

प्रश्न 2.
जोड़ियाँ बनाइए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 11
उत्तर:
(i) सुर – राग
(ii) करताल – झनकार
(iii) घट – पट
(iv) प्रेम – पिचकार।

प्रश्न 3.
आकृति पूर्ण कीजिए:
(i) आकाश लाल हो गया है इससे –
(ii) गिरिधर नागर हैं मीरा के ये –
उत्तर:
(i) आकाश लाल हो गया है इससे – गुलाल से।
(ii) गिरिधर नागर हैं मीरा के ये – प्रभु।

प्रश्न 4.
उत्तर लिखिए: (बोर्ड की नमूना कृतिपत्रिका)
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 12
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 14
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 6 गिरिधर नागर 15

कृति 2: (शब्द संपदा) (बोर्ड की नमूना कृतिपत्रिका)

पद्यांश से ढूँढ़कर लिखिए:
ऐसे दो शब्द जिनका वचन परिवर्तन से रूप नहीं बदलता –
(i) ……………………..
(ii) ……………………..
उत्तर:
(i) दिन
(ii) चरण।

Maharashtra Board Solutions

कृति 3: (सरल अर्थ)

प्रश्न.
उपर्युक्त पद्यांश की प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए। (बोर्ड की नमूना कृतिपत्रिका)
उत्तर:
हे मेरे मन, फागुन मास में होली खेलने का समय अति अल्प होता है। अतः तू जी भरकर होली खेल। अर्थात मानव जीनव अस्थायी है, इसलिए भगवान कृष्ण से पूर्ण रूप से प्रेम कर ले। जिस प्रकार होली के उत्सव में नाच आदि का आयोजन होता है, उसी प्रकार कृष्ण-प्रेम में मुझे ऐसा प्रतीत होता है मानो करताल, पखावज आदि बाजे बज रहे हैं और अनहद नाद का स्वर सुनाई दे रहा है, जिससे मेरा हृदय बिना स्वर और राग के अनेक रागों का आलाप करता रहता है। मेरा रोम-रोम भगवान कृष्ण के प्रेम के रंग में डूबा रहता है। मैंने अपने प्रिय से होली खेलने के लिए शील और संतोष रूपी केसर का रंग घोला है। मेरा प्रिय-प्रेम ही होली खेलने की पिचकारी है।

भाषा अध्ययन (व्याकरण)

प्रश्न.
सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

1. शब्द भेद:
अधोरेखांकित शब्दों का शब्दभेद पहचानकर लिखिए:
(i) बाहर कोई नहीं है।
(ii) माँ को हंसी आ गई।
(iii) चतुर वैद्य विष से भी दवा का काम ले सकता है।
उत्तर:
(i) कोई – अनिश्चयवाचक सर्वनाम।
(ii) हँसी – भाववाचक संज्ञा।
(iii) चतुर – गुणवाचक विशेषण।

2. अव्यय:
निम्नलिखित अव्ययों का अपने वाक्यों में प्रयोग कीजिए:
(i) भी
(ii) इसलिए।
उत्तर:
(i) भी – हमारी बेटी गाय से भी अधिक सीधी है।
(ii) इसलिए – नीरज बीमार था, इसलिए दफ्तर नहीं गया।

3. संधि:
कृति पूर्ण कीजिए:
संधि शब्द – संधि विच्छेद – संधि भेद
…………. – उत् + लेख। – ……………
अथवा
तपोबल – …………… – ……………
उत्तर:
संधि शब्द – संधि विच्छेद – संधि भेद
उल्लेख – उत् + लेख – व्यंजन संधि
अथवा
तपोबल – तपः + बल – विसर्ग संधि

4. सहायक क्रिया:
निम्नलिखित वाक्यों में से सहायक क्रियाएँ पहचानकर उनका मूल रूप लिखिए:
(i) यह कुरसी दीवार की तरफ खिसका दो।
(ii) हम समय पर स्टेशन पहुंच गए।
उत्तर:
सहायक क्रिया – मूल रूप
(i) दो – देना
(ii) गए – जाना

Maharashtra Board Solutions

5. प्रेरणार्थक क्रिया:
निम्नलिखित क्रियाओं के प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए:
(i) पढ़ना
(ii) जीतना
(ii) करना।
उत्तर:
क्रिया – प्रथम प्रेरणार्थक रूप – द्वितीय प्रेरणार्थक रूप
(i) पढ़ना – पढ़ाना – पढ़वाना
(ii) जीतना – जिताना – जितवाना
(iii) करना – कराना – करवाना

6. मुहावरे:
(1) निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए:
(i) चैन न मिल पाना
(ii) झेंप जाना।
उत्तर:
(i) चैन न मिल पाना।

अर्थ: बेचैनी अनुभव करना। वाक्य: मालिक की कड़ी बातें सुनकर मुनीम को चैन न मिल पाया।

(ii) झेंप जाना।
अर्थ: लज्जित होना, शरमाना। वाक्य: नकल करने पर मित्र की फटकार सुनकर अभिनव झेंप गया।

(2) अधोरेखांकित वाक्यांशों के लिए कोष्ठक में दिए गए उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए:
(नाक-भौं सिकोड़ना, गुदगुदा देना, सिर झुका देना)
(i) अप्रिय बात सुनकर सभी तिरस्कार प्रकट करेंगे।
(ii) जीवन में आनंददायी क्षण बहुत कम होते हैं।
उत्तर:
(i) अप्रिय बात सुनकर सभी नाक-भौं सिकोड़ेंगे।
(ii) जीवन में गुदगुदाने वाले क्षण बहुत कम होते हैं।

7. विरामचिह्न:
निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विरामचिह्नों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए:
(i) मैं कहाँ से पैसे , पहले तो दूध की बिक्री के पैसे मेरे पास जमा रहते थे
(ii) सहसा कानों में आवाज आई काकी उठो मैं पूड़ियाँ लाई हूँ
उत्तर:
(i) “मैं कहाँ से पैसे दूँ? पहले तो दूध की बिक्री के पैसे मेरे पास जमा रहते थे।”
(ii) सहसा कानों में आवाज आई – “काकी, उठो मैं पूड़ियाँ लाई हूँ।”

8. काल परिवर्तन:
निम्नलिखित वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए:
(i) विदा का क्षण आ गया। (सामान्य भविष्यकाल)
(ii) आप छत पर क्या करते हैं? (अपूर्ण भूतकाल)
(iii) मेरी गाड़ी तो बिक जाती है। (पूर्ण वर्तमानकाल)
उत्तर:
(i) विदा का क्षण आ जाएगा।
(ii) आप छत पर क्या कर रहे थे?
(iii) मेरी गाड़ी तो बिक गई है।

9. वाक्य भेद:
(1) निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए:
(i) संसार का व्यवहार देखकर मुझे दुःख होता है और मैं रो पड़ती हूँ।
(ii) मीराबाई कहती हैं कि अब उन्हें लोकलाज का कोई डर नहीं हैं।
उत्तर:
(i) संयुक्त वाक्य
(ii) मिश्र वाक्य।

Maharashtra Board Solutions

(2) निम्नलिखित वाक्यों का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए:
(i) संतो के साथ बैठकर मैंने लोकलाज त्याग दी है। (विस्मयादिबोधक वाक्य)
(ii) हे हरि, आप ही मेरा पालन करने वाले हैं। (आज्ञावाचक वाक्य)
उत्तर:
(i) हाय! संतों के साथ बैठकर मैंने लोकलाज त्याग दी है।
(ii) हे हरि, आप ही मेरा पालन करें।।

11. वाक्य शुद्धिकरण:
निम्नलिखित वाक्य शुद्ध करके लिखिए:
(i) लेखक ने अभिनेता की घमंड तोड़ी।
(ii) हमने क्रिकेट की मैच देखी।
उत्तर:
(i) लेखक ने अभिनेता का घमंड तोड़ा।
(ii) हमने क्रिकेट का मैच देखा।

गिरिधर नागर Summary in Hindi

गिरिधर नागर कविता का सरल अर्थ

1. मेरे तो गिरधर गोपाल …………………………….. तारो अब मोही।।

गिरि को धारण करने वाले, गायों के पालक कृष्ण के सिवा मेरा और कोई नहीं है। जिनके मस्तक पर मोर का मुकुट शोभित है, वे ही मेरे पति हैं। उनके लिए मैंने कुल की मर्यादा छोड़ दी है। चाहे कोई मुझे कुछ भी कहे। संतों के साथ बैठ-बैठकर मैंने लोकलाज त्याग दी है। मैंने अपने प्रेम रूपी बेल को अपने अश्रु रूपी जल से सींच-सींचकर बड़ा किया है। अब तो यह प्रेम-बेल फैल गई है और इसमें आनंद रूपी फल लगने लगा है। मैंने दूध जमाने के पात्र में जमे दही को मथानी से बड़े प्रेम से बिलोया और उसमें से कृष्ण-प्रेम रूपी मक्खन को निकाल लिया। शेष छाछ रूपी निस्सार जगत को छोड़ दिया। कृष्ण-भक्तों को देखकर मैं प्रसन्न होती हूँ, परंतु संसार का व्यवहार देख मुझे दुख होता है और मैं रो पड़ती हूँ। हे गिरधरलाल, मीरा तो आपकी दासी है, उसे इस संसार रूपी भव-सागर से पार लगाओ।

2. हरि बिन कूण गती मेरी …………………………….. मैं सरण हूँ तेरी।।

हे हरि, आपके बिना मेरा कौन है? अर्थात आपके सिवा मेरा कोई ठिकाना नहीं है। आप ही मेरा पालन करने वाले हैं और मैं आपकी दासी हूँ। मैं रात-दिन, हर समय आपका ही नाम जपती रहती हूँ। मैं बार-बार आपको पुकारती हूँ, क्योंकि मुझे आपके दर्शनों की तीव्र लालसा है। यह संसार विभिन्न प्रकार के दोषों और विकारों से भरा हुआ सागर है, जिसके बीच में घिर गई हैं। इस संसार रूपी सागर में मेरी नाव टूट गई है। हे प्रभु, आप शीघ्र इस नाव का पाल बाँधिए, अन्यथा यह जीवन-नौका इस संसार-सागर में डूब जाएगी। हे प्रियतम, आपकी यह विरहिणी निरंतर आपकी बाट जोहती रहती है। आपके आगमन की प्रतीक्षा करती रहती है। आपकी यह दासी मीरा सदा आपके नाम का स्मरण करती रहती है और आपकी शरण में आई है।

3. फागुन के दिन चार …………………………….. चरण कँवल बलिहार रे।।

हे मेरे मन, फागुन मास में होली खेलने का समय अति अल्प होता है। अतः तू जी भरकर होली खेल। अर्थात मानव जीनव अस्थायी है, : इसलिए भगवान कृष्ण से पूर्ण रूप से प्रेम कर ले। जिस प्रकार होली के : उत्सव में नाच आदि का आयोजन होता है, उसी प्रकार कृष्ण-प्रेम में मुझे ऐसा प्रतीत होता है मानो करताल, पखावज आदि बाजे बज रहे हैं और अनहद नाद का स्वर सुनाई दे रहा है, जिससे मेरा हृदय बिना स्वर और राग के अनेक रागों का आलाप करता रहता है। मेरा रोम-रोम भगवान कृष्ण के प्रेम के रंग में डूबा रहता है। मैंने अपने प्रिय से होली खेलने के लिए शील और संतोष रूपी केसर का रंग घोला है। मेरा प्रिय-प्रेम ही होली खेलने की पिचकारी है। उड़ते हुए गुलाल से सारा आकाश लाल हो गया है। अब मुझे लोक-लज्जा का कोई डर नहीं है, इसलिए मैंने हृदय रूपी घर के दरवाजे खोल दिए हैं। अंत में मीरा कहती हैं कि मेरे स्वामी गोवर्धन पर्वत को धारण करने वाले कृष्ण भगवान हैं। मैंने उनके चरण-कमलों में अपना सर्वस्व न्योछावर कर दिया है।

गिरिधर नागर विषय-प्रवेश :

प्रस्तुत काव्य में रसिक शिरोमणि श्रीकृष्ण की अनन्य उपासिका मीराबाई अपना प्रेम प्रकट कर रही हैं। सभी पदों में | श्रीकृष्ण के प्रति मीराबाई के प्रेम, उनकी भक्ति, उत्सुकता, प्रिय-मिलन की आशा, प्रतीक्षा आदि का मार्मिक चित्रण है।

Class 10 Hindi Lokbharti Textbook Solutions

Bij Perle Gele Class 10 Marathi Chapter 14 Question Answer Maharashtra Board

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 14 बीज पेरले गेले Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 14 बीज पेरले गेले Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 Marathi Chapter 14 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 14 बीज पेरले गेले Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई -वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.

(आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली. कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते वाय.एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कम्पाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत असत.

(इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ………………………….
उत्तरः
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कम्पाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत.

(ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ………………………….
उत्तरः
दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण तुटपुंज्या पगारात लेखकाचे वडील घरखर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 10
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 11

प्रश्न 3.
ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 12

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
(i) सही
(ii) निवास
(iii) क्रीडा
(iv) प्रशंसा
उत्तरः
(i) सही – स्वाक्षरी
(ii) निवास – घर
(iii) क्रीडा – खेळ
(iv) प्रशंसा – स्तुती

प्रश्न 5.
खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पन्हा लिहा. (आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)

(अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.
उत्तरः
मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खूणगाठ बांधली.

(आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.
उत्तरः
अचानक दारात मामा-मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

(इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
उत्तरः
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळांत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

(ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.
उत्तर:
मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला.

प्रश्न 6.
स्वमत.

(अ) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

(आ) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

(इ) तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.
उत्तर:
लेखक जेव्हा शिक्षणासाठी काकांकडे राहत होते त्यावेळी क्रिकेट खेळ त्यांना आवडू लागला. ते वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये सभासदांसोबत खेळत असत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करत, आपणही यांच्या सारखे खेळावे. एक क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी मनाशी ठरवले. मॅच पाहण्यासाठी ते मित्रांसोबत जात, त्यांच्यांशी क्रिकेटच्या खेळाच्या गप्पा मारत, इतकेच नव्हे तर वडिलांनीही त्यांचे खेळाचे वेड पाहून जुनी बॅट खरेदी करून दिली. तसेच आंतरशालेय स्पर्धेत १०० धावांचा विक्रम त्यांनी केला. अशाप्रकारे क्रिकेटचे बीज लेखकांत उगवले.

(ई) प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.
उत्तर:
प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे सुखी, समाधानी जीवन प्राप्त न होणे. अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगणे होय.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द याची गरज असते जी गोष्ट पूर्ण करायची आहे, त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, स्वत:चा आत्मविश्वास विकसित करणे, मेहनतीशिवाय यश नाही. त्यामुळे श्रमाला महत्त्व देणे. ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणे या गोष्टींची आवश्यकता असते.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 14 बीज पेरले गेले Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांना मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते.
उत्तर:
लेखकाचे वडील त्या वेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. त्यामुळे घरखर्च भागवताना फार त्रास होत असे म्हणून पैशाअभावी ते मुलांना खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

(ii) लेखक व त्यांच्या थोरल्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची बदली वडगावला झाली. चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांना व त्यांच्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.
(ii) वडिलांची बदली वडगावला झाली.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
उत्तर:
(i) वडिलांची बदली वडगावला झाली.
(ii) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाचा जन्म कुठे झाला?
उत्तर:
लेखकाचा जन्म पुण्यात झाला.

(ii) लेखकाचे वडील कुठल्या खात्यामध्ये नोकरी करत?
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरी करत.

(iii) वडिलांची बदली कोठे झाली?
उत्तरः
वडिलांची बदली वडगावला झाली.

(iv) लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी कोठे रहावे लागले ?
उत्तर:
लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी पुण्यातच त्यांच्या काकांकडे रहावे लागले.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) दुसऱ्या मुलांच्या हातात ……………………….. पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. (वही, पेन, खेळणी, विटी)
(ii) तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती ……………………….. प्रेमळ कुशीत. (आईच्या, ताईच्या, बायकोच्या, बाबांच्या)
(iii) ……………………….. नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. (शालेचे, गावाचे, घराण्याचे, देशाचे)
उत्तर:
(i) खेळणी
(ii) आईच्या
(iii) घराण्याचे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
(i) पोलीस खात्यात नोकरी करणारे – [लेखकाचे वडील]
(ii) लेखक व भाऊ शिक्षणासाठी यांच्याकडे राहिले – [काकांकडे]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 4

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.
(i) बॅट – लाकडी फळी
(ii) स्टंप – यष्टी
(iii) बॉल – चेंडू
(iv) कॅम्प – शिबीर

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) वडिलांची बदली मडगावला झाली.
(ii) लेखक खेळकर होते.
(iii) भाऊ व लेखक यांना शिक्षणासाठी मामांकडे रहावे लागले.
(iv) मुलांनी ऑफिसर व्हावे अशी मामीची इच्छा होती.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून का निरोप घेतला असेल? तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपले मूल मोठे व्हावे, आपले व आपल्या घराण्याचे नाव त्याने उज्ज्वल करावे. मुलांच्या नावाने आपण ओळखले जावे. प्रत्येक पालकांची ही एकच इच्छा असते की, आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्याची प्रसिद्धी व्हावी. त्याप्रमाणेच लेखकांच्या आईवडिलांचीही लेखक व त्यांचे भाऊ मोठे व्हावे, मोठे ऑफिसर व्हावे, आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा होती. लेखकांच्या वडिलांची बदली वडगावला झाल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना काकांकडे पुण्यातच ठेवण्यात आले. आपल्या मुलांना सोडून राहणे आईवडिलांना त्रासदायक होते; परंतु त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मन घट्ट करून लेखकाच्या आईवडिलांनी निरोप घेतला असेल असे मला वाटते.

प्रश्न २. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सर्व खेळात लेखकांस कोणता खेळ आवडत असे?
उत्तर :
सर्व खेळात लेखकांना क्रिकेट खेळ आवडत असे.

(ii) लेखकाचे काका कुठे राहत?
उत्तर :
लेखकाचे काका पुण्याच्या वाय.एम.सी.ए. कंपाऊंडमध्ये राहत.

(iii) लेखकांनी काय व्हायचे ठरविले?
उत्तर :
लेखकांनी क्रिकेट खेळाडू व्हायचे ठरविले.

(iv) लेखक कोणाची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे?
उत्तर :
लेखक सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.
(ii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iii) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(iv) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत,
उत्तर:
(i) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(ii) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iv) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) साहजिकच याचा …………………………… माझ्या बालमनावर होई. (संस्कार, परिणाम, आनंद, दुःख)
(ii) कोणी नाही असे पाहून ते मला …………………………… फेकायला (दगड, गोळा, चेंडू, भाला)
(iii) दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी …………………………… आनंदाने मदत करत असे. (खेळाडूंना, पोलिसांना, ग्राऊंड्समनला, पंचना)
उत्तर:
(i) परिणाम
(ii) चेंडू
(iii) ग्राऊंड्समनला

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 6

प्रश्न 2.
उत्तरे लिहा

(i) खेळासाठी प्रसिद्ध संस्था – वाय. एम. सी. ए.
(ii) लेखकाचा आवडता खेळ – क्रिकेट

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) काका सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(ii) क्रिकेट खेळाडू बनण्याची लेखकाची इच्छा होती.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी लेखकास मिळाली.
(iv) लेखकाचे मामा रात्री प्रार्थना व अभ्यास घेत.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) बरोबर
(iv) चूक

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा,

(i) शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन
(अ) मी प्रथम सिनेमागृहात हजर होत असे.
(आ) मी प्रथम मंदिरात हजर होत असे.
(इ) मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.
(ई) मी प्रथम नाट्यगृहात हजर होत असे.
उत्तर :
शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन!’ असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तरः
लेखक शिक्षणासाठी जेव्हा काकांकडे राहण्यास गेले. त्यावेळी त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. काका वाय, एम. सी. ए. कंपाऊंड मध्ये राहत होते. तेथे वाय.एम.सी.ए.चे सभासद क्रिकेट खेळण्यासाठी येत असत. त्यामुळे लेखक हा खेळ पाहण्यासाठी जात असत. त्याचवेळी त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा वाढीस लागली. शाळा सुटली रे सुटली की ते ग्राऊंडवर हजर होत असत. त्यावेळी ते सभासद लेखकास खेळण्यासाठी बोलवत. त्यांना चेंडू फेकण्यास सांगत आणि लेखकही त्या कामासाठी सदैव तयार होत असत.

अशाप्रकारे क्रिकेटची आवड आणि प्रत्यक्ष खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद व्यक्त करताना लेखक ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे मत व्यक्त करतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न ३. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 7

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांनी संतापाने लेखकास छड्या मारल्या.
उत्तरः
लेखक एके दिवशी शाळा चुकवून ग्राऊंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहण्यास गेले. त्यामुळे वडिलांनी लेखकास छड्या मारल्या.

(ii) लेखकांस त्यांचे वडील खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.
उत्तरः
लेखकांचे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते लेखकांस खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) लेखकाची धडपड सुरू झाली.
(ii) मैदानावर कनात घालण्यास आली.
(iii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iv) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
उत्तर:
(i) मैदानावर कनात घालण्यास आली.
(ii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iii) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
(iv) लेखकाची धडपड सुरू झाली,

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
सातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) माझे ………………………….. स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. (वडील, काका, मामा, तात्या)
(ii) मी तसाच ती बॅट घेऊन ………………………….. दाखवत सुटलो. (आईला, मित्रांना, खेळाडूंना, सभासदाना)
(iii) ………………………….. साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक संघ पुण्यात आला होता. (१९६०, १९४०, १९४५, १९८३)
उत्तर:
(i) वडील
(ii) मित्रांना
(iii) १९४५

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर वाय. एम. सी. ए. चे – उद्गार काढणारे खेळाडू
(ii) वडील या खेळात चॅम्पियन होते – व्हॉलीबॉल

प्रश्न 2.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.

(i) चॅम्पियन – सर्वोत्कृष्ट खेळाडू
(ii) ग्राऊंड – मैदान

प्रश्न 3.
चूकी की बरोबर ते लिहा.

(i) वडील फूटबॉल चॅम्पियन होते.
(ii) पूना क्लब ग्राऊंडवर एक मॅच झाली.
(iii) आईने लेखकास संतापाने छड्या मारल्या.
(iv) वडिलांनी जुनी बॅट विकत घेतली.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) बरोबर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(i) ………………………….. ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.
(अ) पूना क्लबच्या.
(आ) मुंबई क्लबच्या.
(इ) सातारा क्लबच्या.
(ई) महाराष्ट्र क्लबच्या.
उत्तर:
पूना क्लबच्या ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.

(ii) त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा …………………………. .
(अ) तीस रूपये होता.
(आ) शंभर रूपये होता.
(इ) चोवीस रूपये होता.
(ई) दहा रूपये होता.
उत्तरः
त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रूपये होता.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 5.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकांचे वडील कोणत्या खेळात चॅम्पियन होते?
उत्तर:
लेखकांचे वडील ‘व्हॉलीबॉल’ या खेळात चॅम्पियन होते.

(ii) लेखकांच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट किती रूपयांची होती?
उत्तर:
लेखकाच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट सहा रूपयांची होती.

प्रश्न ४. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 8
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 9

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

(i) मॅच संपल्यावर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते – खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी.
(ii) या तासाला लेखकांच्या स्वाक्षरीने वही भरत असे – गणित

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.
(ii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iv) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
उत्तर:
(i) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
(ii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iv) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे …………………………….. व्हावे. (कलाकार, पंच, खेळाडू, नट)
(ii) माझ्या मनात क्रिकेटचे …………………………….. पेरले गेले आणि उगवले ते असे. (बीज, रोप, स्थान, रहस्य)
उत्तर:
(i) खेळाडू
(ii) बीज

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

विद्यार्थी व शिक्षकांनी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
उत्तरः
लेखकांनी आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या. त्यांचे नाव शाळेच्या बोर्डावर झळकले म्हणून विदयार्थी व शिक्षकांनी कौतुकासाठी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.

(i) विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य …………………………..

(अ) मनाला लागले.
(आ) काळजात भिडले.
(इ) आनंद मिळाला.
(ई) सुंदर होते
उत्तरः
विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य काळजात भिडले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला काय वाटले?
उत्तरः
क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला धन्य-धन्य वाटले.

(ii) लेखक दिवसभर कोठे बसून मॅच पाहत हाते?
उत्तरः
लेखक दिवसभर झाडावर बसून मॅच पाहत होते.

स्वाध्याय कृती

*(६) स्वमत

(१) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

(२) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

बीज पेरले गेले Summary in Marathi

बीज पेरले गेले पाठपरिचय

‘बीज पेरले गेले’ हा पाठ लेखक ‘चंदू बोर्डे’ यांनी लिहिला आहे. या पाठात त्यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले हे सांगितले आहे.

बीज पेरले गेले Summary in English

‘Bij Perle gele’ is written by Chandu Borde. He speaks of his childhood memories, including how he got inclined towards playing cricket.

बीज पेरले गेले शब्दार्थ

  • कष्ट – मेहनत – (hard work)
  • यथेच्छ – मन भरे पर्यंत, मनसोक्त – (to one’s heart’s content)
  • संध्याकाळ – सांजवेळ – (evening time)
  • आऊट – बाद करणे – (out)
  • इच्छा – मनिषा, मनोकामना – (wish)
  • पॅक्टिस – सराव – (practice)
  • ग्राऊंड – मैदान – (a playground)
  • स्तुती – कौतुक, प्रशंसा – (praise)
  • मित्र – सखा – (friend)
  • संताप – राग – (violent anger)
  • क्लब – मंडळ – (club)
  • मनसोक्त – मनापासून – (from one’s heart)
  • स्वाक्षरी – सही – (signature)
  • बालमित्र – लहानपणीचे सवंगडी – (childhood friends)
  • खेळकर – (asportive)
  • खोडकर – खोड्या करणारा – (naughty)
  • उपद्व्यापी – खोडकर, त्रासदायक – (mischievous)
  • तुटपुंजा – गरजेपेक्षा कमी, अपुरा, पुरेसा नसलेला – (meagre)
  • परिस्थिती – (condition)
  • खेळणी – खेळण्याच्या वस्तू (बाहूली, चेंडू इ.) – (a toy)
  • विटीदांडू – विटी व दांडू घेऊन खेळायचा खेळ – (the game of trapstick)
  • पतंग – (akite)
  • तक्रार – गा–हाणे – (complaint)
  • पाऊल – पाय, पाऊलखूण – (footmark, a foot)
  • चापटपोळी – थप्पड – (slap)
  • परिणाम – प्रभाव – (an effect)
  • हट्ट – हेका – (obstinacy)
  • उद्देश – (intention)
  • सभासद – सदस्य – (a member)
  • प्रयत्न – मोठा यत्न – (an attempt)
  • प्रार्थना – आराधना – (a prayer)
  • उद्गार – बोल, उच्चार – (utterance, word)
  • मासिक पगार – महिन्याला मिळणारा पगार – (salary)

बीज पेरले गेले बाकाचार

  • भुरळ पडणे – आवड निर्माण होणे
  • शाबासकीची थाप देणे – कौतुक करणे
  • आनंद गगनात मावेनासा होणे – खूप आनंद होणे
  • धन्य वाटणे – कृतकृत्य होणे
  • खूणगाठ मनाशी बांधणे – पक्का निश्चय करणे
  • छाती आनंदाने फुगणे – खूप आनंद होणे
  • नाव उज्ज्वल करणे – कीर्ती मिळवणे/प्रसिद्धी मिळणे

Marathi Akshar Bharati Class 10th Digest 

Class 10 Hindi Chapter 1 Bharat Mahima Question Answer Maharashtra Board

Std 10 Hindi Chapter 1 Bharat Mahima Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Hindi Solutions Lokbharti Chapter 1 भारत महिमा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Hindi Lokbharti 10th Digest Chapter 1 भारत महिमा Questions And Answers

Hindi Lokbharti 10th Std Digest Chapter 1 भारत महिमा Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए:

प्रश्न 1.
निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए:
a. कहीं से हम आए थे नहीं → …………………….
b. वही हम दिव्य आर्य संतान → …………………….
उत्तर:
(a) हम भारतवासी किसी अन्य देश से आकर यहाँ नहीं बसे। हम यहीं के निवासी हैं। सभ्यता के प्रारंभ से हम यहीं रहते आए हैं।
(b) भारतवासी आर्य थे और हम उन्हीं आर्यों की दिव्य संतानें हैं।

प्रश्न 2.
उचित जोड़ियाँ मिलाइए:
संचय
सत्य
अतिथि
रत्न
वचन
दान
हृदय
तेज
देव
उत्तर:
(i) संचय – दान
(ii) सत्य – वचन
(iii) अतिथि – देव
(iv) रत्न – तेज।

Maharashtra Board Solutions

प्रश्न 3.
लिखिए.
a. कविता में प्रयुक्त दो धातुओं के नाम:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 1
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 6

b. भारतीय संस्कृति की दो विशेषताएँ:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 2
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 10

प्रश्न 4.
प्रस्तुत कविता की अपनी पसंदीदा किन्हीं दो पंक्तियों का भावार्थ लिखिए।
उत्तर:
हमारे संचय में था दान, अतिथि थे सदा हमारे देव वचन में सत्य, हृदय में तेज, प्रतिज्ञा में रहती थी टेव। हम भारतीय दीन-दुखियों की सेवा करने के लिए सदैव तत्पर रहते हैं। हम यदि धन और संपत्ति का संग्रह करते भी थे तो दान के लिए करते थे। दानवीरता भारतीयों का गुण रहा है। महर्षि दधीचि और कर्ण जैसे दानवीर इसी भूमि पर हुए हैं। हमारे देश में अतिथियों को देवता के समान माना जाता था। भारतीय सत्यवादी हरिश्चंद्र की संतानें हैं। हमारे हृदय में तेज था, गौरव था। हम सदा अपनी प्रतिज्ञा पर अटल रहते थे। भारतीयों का मानना था- प्राण जाएँ,: पर वचन न जाएँ।

प्रश्न 5.
निम्नलिखित मुद्दों के आधार पर पद्य विश्लेषण कीजिए:
a. रचनाकार का नाम
b. रचना का प्रकार
c. पसंदीदा पंक्ति
d. पसंदीदा होने का कारण
e. रचना से प्राप्त संदेश
उत्तर:
a. रचनाकार का नाम → जयशंकर प्रसाद।
b. रचना की विधा → कविता।
c. पसंद की पंक्तियाँ → व्योमतम पुंज हुआ तब नष्ट, अखिल संसृति हो उठी अशोक। (सूचना: विद्यार्थी अपनी पसंद की पंक्ति लिखेंगे।)
d. पंक्तियाँ पसंद होने का कारण → हम भारतीयों ने पूरे विश्व में ज्ञान का प्रसार किया, जिसके कारण समग्र संसार आलोकित हो गया। अज्ञान रूपी अंधकार का विनाश हुआ और संपूर्ण सृष्टि के सभी दुख-शोक दूर हो गए।
e. रचना से प्राप्त संदेश/प्रेरणा → हमें सदैव अपने देश और इसकी संस्कृति पर गर्व करना चाहिए। जब भी आवश्यकता पड़े, देश के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर देने के लिए तत्पर रहना चाहिए।

Hindi Lokbharti 10th Textbook Solutions Chapter 1 भारत महिमा Additional Important Questions and Answers

पद्यांश क्र. 1
प्रश्न.
निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)

प्रश्न 1.
पद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए, जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों:
(i) अभिनंदन
(ii) आलोक।
उत्तर:
(i) उषा ने हँसकर क्या किया?
(ii) जब भारतीयों ने ज्ञान का प्रचार किया तो संसार में क्या फैला?

प्रश्न 2.
पद्यांश में प्रयुक्त इन शब्दों से सहसंबंध दर्शाने वाले शब्द लिखिए:
(i) हिमालय – ……………………..
(ii) किरण – ……………………..
(iii) विमल – ……………………..
(iv) कोमल – ……………………..
उत्तर:
(i) हिमालय -आँगन
(ii) किरण – उपहार
(iii) विमल -वाणी
(iv) कोमल -कर

Maharashtra Board Solutions

प्रश्न 3.
विधानों के सामने सत्य/असत्य लिखिए:
(i) जब पूरा विश्व जगा तो भारतवासी भी जग गए।
(ii) वीणापाणि ने अपने हाथ में वीणा ली।
(iii) हिमालय के आँगन में किरणों का उपहास मिला।
(iv) सप्तसिंधु में सातों स्वर गूंजने लगे।
उत्तर:
(i) असत्य
(ii) सत्य
(iii) असत्य
(iv) सत्य।

प्रश्न 4.
उचित जोड़ियाँ मिलाइए:
(i) उषा – आलोक
(ii) हीरक – संगीत
(iii) विश्व – अभिनंदन
(iv) वीणा – हार
उत्तर:
(i) उषा – अभिनंदन।
(ii) हीरक – हार
(iii) विश्व – आलोक
(iv) वीणा -संगीत।

कृति 2: (शब्द संपदा)

प्रश्न 1.
पद्यांश में से ढूँढ़कर उपसर्गयुक्त शब्द लिखिए:
(i) ………………. (ii) ……………….
उत्तर:
(i) अभिनंदन
(ii) उपहार।

प्रश्न 2.
अनेक शब्दों के लिए एक-एक शब्द लिखिए:
(i) गले में पहनने की मूल्यवान माला
(ii) सितार जैसा वह वाद्य जो सब वाद्यों में श्रेष्ठ माना जाता है, ……………….
उत्तर:
(i) हार
(ii) वीणा।

प्रश्न 3.
निम्नलिखित शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त शब्द ढूँढ़कर लिखिए:
(i) संपूर्ण
(ii) शोकरहित
(iii) संसार
(iv) आकाश।
उत्तर:
(i) संपूर्ण – अखिल
(ii) शोकरहित – अशोक
(iii) संसार – संसृति
(iv) आकाश – व्योम।

Maharashtra Board Solutions

कृति 3: (सरल अर्थ)

प्रश्न.
उपर्युक्त पद्यांश की प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर:
भारत देश हिमालय के आँगन के समान है। प्रतिदिन उषा भारत को सूर्य की किरणों का उपहार देती है, मानो हँसकर भारत-भूमि का अभिनंदन कर रही हो। ओस की बूंदों पर जब प्रातःकालीन सूर्य की रश्मियाँ पड़ती हैं, तो ओस की बूंदें चमकने लगती हैं और ऐसा लगता है मानो, उषा ने भारत को हीरों का हार पहना दिया हो।

सबसे पहले ज्ञान का उदय भारत में ही हुआ। अर्थात सबसे पहले हम जाग्रत हुए। फिर हमने पूरे विश्व में ज्ञान का प्रसार किया। इसके कारण समग्र संसार आलोकित हो गया। अज्ञानरूपी अंधकार का विनाश हुआ और संपूर्ण सृष्टि के सभी दुख-शोक दूर हो गए।

पद्यांश क्र. 2

प्रश्न.
निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 3
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 5

प्रश्न 2.
सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए:
(i) भारत में केवल …………………………. की ही विजय नहीं रही। (चाँदी/लोहे/सोने)
(ii) यहाँ …………………………. भिक्षु की तरह रहते थे। (लोग/लड़के/सम्राट)
(iii) हमसे चीन को …………………………. की दृष्टि मिली। (धर्म/कर्म/धन)
(iv) हमारा देश सदा प्रकृति का …………………………. रहा। (खिलौना/आँगन /पालना)
उत्तर:
(i) भारत में केवल लोहे की ही विजय नहीं रही।
(ii) यहाँ सम्राट भिक्षु की तरह रहते थे।
(iii) हमसे चीन को धर्म की दृष्टि मिली।
(iv) हमारा देश सदा प्रकृति का पालना रहा।

प्रश्न 3.
उपर्युक्त पद्यांश पर आधारित ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए, जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों:
(i) सम्राट
(ii) धर्म।
उत्तर:
(i) कौन भिक्षु होकर रहते?
(ii) चीन को कौन-सी दृष्टि मिली?

प्रश्न 4.
निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए:
(ii) प्रकृति का रहा पालना यहीं।
उत्तर:
(ii) हमें प्रकृति ने प्रत्येक वस्तु मुक्तहस्त से प्रदान की। यहाँ की शस्य श्यामला भूमि, हिमाच्छादित गिरि शिखर, घाटियाँ, वादियाँ, सदानीरा नदियाँ, झरने, फल-फूल, संसाधनों से भरपूर जंगल सभी अनुपम हैं।

Maharashtra Board Solutions

प्रश्न 5.
आकृति पूर्ण कीजिए:
(i) हमने गोरी को इसका दान दिया – [ ]
(ii) भारत की धरती पर इसकी धूम रही – [ ]
उत्तर:
(i) हमने गोरी को इसका दान दिया – [दया का]
(ii) भारत की धरती पर इसकी धूम रही – [धर्म की]

कृति 2: (शब्द संपदा)

प्रश्न 1.
निम्नलिखित शब्द-समूहों के लिए शब्द लिखिए:
(i) बहुमूल्य चमकीले प्रसिद्ध खनिज पदार्थ, जो आभूषणों आदि में जड़े जाते हैं –
(ii) छोटे बच्चों के लिए एक प्रकार का झूला या हिंडोला –
(iii) वह स्थान जहाँ किसी का जन्म हुआ हो –
(iv) बौद्ध संन्यासियों के लिए प्रयोग किया जाने वाला शब्द –
उत्तर:
(i) रत्न
(ii) पालना
(iii) जन्मस्थान
(iv) भिक्षु।

प्रश्न 2.
निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए:
(i) विजय x ………………….
(ii) धर्म x ………………….
(iii) भूमि x ………………….
(iv) जन्म x ………………….
उत्तर:
(i) विजय x पराजय
(ii) धर्म x अधर्म
(iii) भूमि x आकाश
(iv) जन्म – मरण।

कृति 3: (सरल अर्थ)

प्रश्न.
उपर्युक्त पद्यांश की अपनी पसंदीदा किन्हीं दो पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर:
विजय केवल लोहे की नहीं, धर्म की रही धरा पर धूम भिक्षु होकर रहते सम्राट, दया दिखलाते घर-घर घूम। भारतीयों ने शस्त्रों के बल पर दूसरे देशों को नहीं जीता, बल्कि उन्होंने प्रेमभाव से लोगों के हृदय जीते हैं। भारत में प्राचीन काल से ही लोगों के मन में धर्म की भावना रही है। यहाँ वर्धमान महावीर और गौतम बुद्ध जैसे त्यागी धर्मपुरुष हुए हैं, जिन्होंने अपना विशाल साम्राज्य छोड़कर भिक्षु का स्वरूप धारण किया और घर-घर घूमकर लोगों का कष्ट दूर करने का प्रयास किया, धर्म का प्रचार किया।

पद्यांश क्र. 3

प्रश्न.
निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)

प्रश्न 1.
निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए:
(i) किसी को देख न सके विपन्न।
उत्तर:
(i) भारतीय कभी किसी को दुखी नहीं देख सके। दीन-दुखियों की सेवा करने के लिए हम भारतीय सदैव तत्पर रहते हैं।

प्रश्न 2.
आकृति पूर्ण कीजिए:
(i) हम चरित्र के ऐसे थे – [ ]
(ii) हम दान के लिए यह करते थे – [ ]
(iii) हमारे लिए ये देवता के समान थे – [ ]
(iv) हमें अपने गौरव पर यह था – [ ]
उत्तर:
(i) हम चरित्र के ऐसे थे [पवित्र]
(ii) हम दान के लिए यह करते थे [संचय]
(iii) हमारे लिए ये देवता के समान थे [अतिथि]
(iv) हमें अपने गौरव पर यह था [गर्व]

Maharashtra Board Solutions

प्रश्न 3.
संजाल पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 8
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 11

प्रश्न 4.
आकृति पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 9
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 1 भारत महिमा 12

कृति 2: (शब्द संपदा)

प्रश्न 1.
पद्यांश से उपसर्ग वाले दो शब्द ढूँढकर लिखिए:
(i) ……………………. (ii) …………………….
उत्तर:
(i) अतिथि
(ii) अभिमान।

प्रश्न 2.
निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए:
(i) पूत = …………………….
(ii) गर्व = …………………….
(iii) प्रतिज्ञा = …………………….
(iv) प्यारा = …………………….
उत्तर:
(i) पूत – पावन
(ii) गर्व = घमंड
(iii) प्रतिज्ञा = प्रण
(iv) प्रिय = प्यारा।

प्रश्न 3.
पद्यांश से शब्द ढूँढकर लिखिए:
(i) पवित्र शब्द के लिए प्रयुक्त शब्द – …………………….
(ii) गरीब शब्द के लिए प्रयुक्त शब्द – …………………….
उत्तर:
(i) पवित्र शब्द के लिए प्रयुक्त शब्द – पूत
(ii) गरीब शब्द के लिए प्रयुक्त शब्द – विपन्न।

Maharashtra Board Solutions

कृति 3: (सरल अर्थ)

पदय विश्लेषण
सूचना: यह प्रश्नप्रकार कृतिपत्रिका के प्रारूप से हटा दिया गया है। लेकिन यह प्रश्न पाठ्यपुस्तक में होने के कारण विद्यार्थियों के अधिक अभ्यास के लिए इसे उत्तर-सहित यहाँ समाविष्ट किया गया है।

भाषा अध्ययन (व्याकरण)

प्रश्न. सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

1. शब्द भेद:
अधोरेखांकित शब्दों का शब्दभेद पहचानकर लिखिए:
(i) राजा दशरथ वृद्ध दंपति के सामने बैठ गए।
(ii) सड़क कदाचित कच्ची थी।
उत्तर:
(i) दशरथ – व्यक्तिवाचक संज्ञा।
(ii) सड़क – जातिवाचक संज्ञा।

2. अव्यय:
निम्नलिखित अव्ययों का अपने वाक्यों में प्रयोग कीजिए:
(i) बहुत
(ii) सामने
(iii) किंतु।
उत्तर:
(i) प्रयाग बहुत थक गया था।
(ii) स्कूल के सामने एक बगीचा है।
(iii) घर में दीपक तो था, किंतु उसमें तेल न था।

3. संधि:
कृति पूर्ण कीजिए:

संधि शब्द संधि विच्छेद संधि भेद
उज्ज्व ……………… ………………
अथवा
 प्रश्न + उत्तर ………………………………

उत्तर:

संधि शब्द संधि विच्छेद संधि भेद
उज्ज्वल उत् + ज्वल व्यंजन संधि
अथवा
 प्रश्नोत्तर प्रश्न + उत्तरस्वर संधि

4. सहायक क्रिया:
निम्नलिखित वाक्यों में से सहायक क्रियाएँ पहचानकर उनका ‘मूल रूप लिखिए:
(i) इस पद ने मोहिनी मंत्र का जाल बिछा दिया।
(ii) बालक भूमि पर लेट गया।
उत्तर:

सहायक क्रिया मूल रूप
(i) दिया देना
(ii) गया। Maharashtra Board Solutions जाना

5. प्रेरणार्थक क्रिया:
निम्नलिखित क्रियाओं के प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए:
(i) दौड़ना
(ii) बोलना
(iii) रोना।
उत्तर:

क्रिया प्रथम प्रेरणार्थक रूप द्वितीय प्रेरणार्थक रूप
(i) दौड़ना। दौड़ाना दौड़वाना
(ii) बोलना बुलाना बुलवाना
(iii) रोना रुलाना रुलवाना

6. मुहावरे:
(1) निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए:
(i) दृष्टि फेरना
(ii) राह देखना।
उत्तर:
(i) दृष्टि फेरना।
अर्थ: नजर डालना।
वाक्य: नेताजी ने श्रोताओं पर दृष्टि फेरी।

(ii) राह देखना।
अर्थ: प्रतीक्षा करना।
वाक्य: विद्यार्थी कई दिनों से छुट्टियों की राह देख रहे थे।

(2) अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्ठक में दिए गए उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए: (सपने की संपत्ति होना, चल बसना, भनक पड़ना)
(i) हफ्ते भर की बीमारी में मरीज चला गया।
(ii) दारोगाजी ने उड़ती हुई खबर सुनी कि कल दंगा होने वाला है।
(ii) ऐसा भूकंप आया कि क्षण भर में सारी चहल-पहल विलुप्त हो गई।
उत्तर:
(i) हफ्ते भर की बीमारी में मरीज चल बसा।
(ii) दारोगाजी के कान में भनक पड़ी कि कल दंगा होने वाला है।
(iii) ऐसा भूकंप आया कि क्षण भर में सारी चहल-पहल सपने की संपत्ति हो गई।

7. कारक:
निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त कारक पहचानकर उसका भेद लिखिए:
(i) नारी महान है।
(ii) वह किसी को किसी प्रकार की कमी नहीं होने देती।
(iii) प्रेरणा का सूक्ष्म प्रभाव होता है।
उत्तर:
(i) नारी – कर्ता कारक
(ii) किसी को – कर्म कारक
(iii) प्रेरणा का – संबंध कारक।

Maharashtra Board Solutions

8. विरामचिह्न:
निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विरामचिह्नों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए:
(i) क्या बताऊँ गाय ने दूध देना बंद कर दिया है बूढ़ी हो गई है इस जमाने में गाय भैंस पालने का खर्चा
(ii) हे मेरे मित्रो परिचितो आओ अपने सारे बदले लेने का यही वक्त है
उत्तर:
(i) “क्या बताऊँ। गाय ने दूध देना बंद कर दिया है, बूढ़ी हो गई है। इस जमाने में गाय-भैंस पालने का खर्चा …।”
(ii) “हे मेरे मित्रो, परिचितो! आओ, अपने सारे बदले लेने का यही वक्त है।”

9. काल परिवर्तन:
निम्नलिखित वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए:
(i) मनु पीछे की ओर मुड़ता है। (सामान्य भूतकाल)
(ii) तुम्हारा मुख लाल होता है। (अपूर्ण वर्तमानकाल)
(iii) रोगी की अवस्था बदल जाती है। (पूर्ण भूतकाल)
उत्तर:
(i) मनु पीछे की ओर मुड़ा।
(ii) तुम्हारा मुख लाल हो रहा है।
(iii) रोगी की अवस्था बदल गई थी।

10. वाक्य भेद:
(1) निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचानकर लिखिए:
(i) भारतीय चरित्र के पवित्र होते हैं।
(ii) बादल आए किंतु पानी नहीं बरसा।
उत्तर:
(i) सरल वाक्य
(ii) संयुक्त वाक्य।

(2) निम्नलिखित वाक्यों का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार वाक्य परिवर्तन कीजिए:
(i) तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए। (आज्ञावाचक)
(ii) मास्टर जी ने पुस्तकें लाने के लिए पैसे दिए। (प्रश्नवाचक)
उत्तर:
(i) तुम अपना ख्याल रखो।
(ii) क्या मास्टर जी ने पुस्तकें लाने के लिए पैसे दिए?

Maharashtra Board Solutions

11. वाक्य शुद्धिकरण:
निम्नलिखित वाक्य शुद्ध करके लिखिए:
(i) क्रोध से उसकी नेत्र लाल हो गए।
(ii) राम ने हिरण का शिकार की।
(iii) मैं मेरा काम करता है।
उत्तर:
(i) क्रोध से उसके नेत्र लाल हो गए।
(ii) राम ने हिरन का शिकार किया।
(iii) में अपना काम करता हूँ।

भारत महिमा Summary in Hindi

भारत महिमा कविता का सरल अर्थ

1. हिमालय के आँगन …………………………………… मधुर साम संगीत।. . .

हमारा यह प्यारा भारत देश हिमालय के आँगन के समान है। प्रतिदिन उषा भारत को सूर्य की किरणों का उपहार देती है। तब ऐसा लगता है मानो हँसकर वह भारत-भूमि का अभिनंदन कर रही हो। ओस की बूंदों पर जब प्रातःकालीन सूर्य की रश्मियाँ पड़ती हैं तो ऐसा लगता है जैसे उषा ने भारत को हीरों का हार पहना दिया हो।

सबसे पहले ज्ञान का उदय भारत में ही हुआ अर्थात सबसे पहले हम जाग्रत हुए। फिर हमने पूरे विश्व में ज्ञान का प्रसार किया। इसके कारण समग्र संसार आलोकित हो गया। अज्ञान रूपी अंधकार का विनाश हुआ और संपूर्ण सृष्टि के सभी दुख-शोक दूर हो गए।

वाणी की देवी वीणापाणि (सरस्वती) ने इसी पवित्र भूमि पर प्रेम के साथ अपने कमल के समान कोमल करों में वीणा उठाई, उसकी झंकार से सप्तसिंधुओं में सातों स्वरों का मोहक सरगम गूंजने लगा, मधुर संगीत का जन्म हुआ। इसी महान देश में संगीत के वेद सामवेद की रचना हुई।

2. विजय केवल …………………………………… आए थे नहीं।. . .

भारत के लोगों ने शस्त्रों के बल पर देशों को नहीं जीता। यहाँ प्राचीन काल से ही लोगों के मन में धर्म की प्रखर भावना रही है और उन्होंने संसार में धर्म का प्रचार किया। यहाँ गौतम बुद्ध और वर्धमान महावीर जैसे धर्मपुरुष हुए हैं, जिन्होंने विशाल साम्राज्य छोड़कर भिक्षु का स्वरूप धारण किया और घर-घर घूमकर लोगों का कष्ट दूर करने का प्रयास किया, धर्म का प्रचार किया। हमने मोहम्मद गोरी को पराजित करने के बाद भी दयापूर्वक क्षमा कर दिया। हमारे देश से ही चीन को धर्म की दृष्टि मिली। (भारत के महान सम्राट अशोक ने अपने पुत्र महेंद्र और पुत्री संघमित्रा को बौद्ध धर्म के प्रचार के लिए चीन, स्वर्ण भूमि अर्थात जावा और श्रीलंका भेजा) जावा और श्रीलंका के लोगों को पंचशील (अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, सत्य, ब्रह्मचर्य आदि) के सिद्धांत मिले।

Maharashtra Board Solutions

भारतवासियों ने कभी किसी की संपत्ति या किसी का राज्य छीनने का प्रयास नहीं किया। हमें प्रकृति ने प्रत्येक वस्तु मुक्तहस्त से प्रदान की। प्रकृति की हमारे देश पर महान कृपा रही है। (यहाँ की शस्य श्यामला भूमि, हिमाच्छादित गिरि शिखर, घाटियाँ, वादियाँ, सदानीरा नदियाँ, झरने, फल-फूल, संसाधनों से भरपूर जंगल सभी अनुपम हैं) भारत सदा से हमारी जन्मभूमि है। हम इसी देश की संतानें हैं। हम बाहर के किसी स्थान से आकर यहाँ नहीं बसे हैं। (जैसा कि कुछ विदेशियों का कहना है।)

3. चरित थे पूत …………………………………… प्यारा भारतवर्ष।. . .

भारत के लोग सदा से चरित्रवान रहे हैं। हमारी भुजाओं में भरपूर शक्ति रही है। भारतीयों में वीरता की कभी कमी नहीं रही। साथ ही नम्रता सदा हमारा गुण रहा है। हमने कभी अपनी उपलब्धियों पर घमंड नहीं किया। हमें अपनी सभ्यता और संस्कृति पर गर्व रहा है। हम कभी किसी को दुखी नहीं देख सके। दीन-दुखियों की सेवा करने के लिए हम भारतीय सदैव तत्पर रहते हैं। ‘हम यदि धन और संपत्ति का संग्रह करते भी थे, तो दान के लिए करते थे। दानवीरता भारतीयों का गुण रहा है। हमारे देश में अतिथियों को सदा देवता के समान माना जाता था। भारत के लोग सत्य बोलना अपना धर्म मानते थे। (भारतीय सत्यवादी हरिश्चंद्र की संतानें हैं।) हमारे हृदय में तेज था, गौरव था। हम सदा अपनी प्रतिज्ञा पर अटल रहते थे। प्राण जाए, पर वचन न जाए हमारा जीवनमूल्य रहा है।

आज भी हम भारतीयों की धमनियों में उन्हीं पूर्वजों का रक्त प्रवाहित हो रहा है। आज भी हमारा देश वैसा ही है। आज भी भारतीयों में वैसा ही साहस है। भारतीय आज भी ज्ञान के क्षेत्र में सबसे आगे हैं। आज भी हम पहले के समान शांति के पुजारी हैं। देशवासियों में वैसी ही शक्ति है। हम उन्हीं आर्यों की दिव्य संतानें हैं।

हम जब तक जिएँ, इसी देश के लिए जिएँ। हमें इसकी सभ्यता और संस्कृति पर अभिमान है और हर्ष है कि हमने इस भूमि पर जन्म लिया है। यह हमारा प्यारा भारतवर्ष है। यदि कभी आवश्यकता पड़े, तो इसके लिए अपना सर्वस्व भी न्योछावर कर दें।

Maharashtra Board Solutions

भारत महिमा विषय-प्रवेश :

प्रकृति ने हमारे देश भारत की रचना बड़े प्यार से की है। हमारा देश हिमालय की गोद में बसा हुआ है। हमारा देश सबसे पहले जाग्रत हुआ था और इसकी संस्कृति सबसे पुरानी है। प्रस्तुत कविता में छायावाद के प्रवर्तक जयशंकर प्रसाद जी ने हमारे प्यारे देश भारत के इसी महिमामंडित अतीत का मनोरम चित्रण किया है। कवि की आकांक्षा है कि हमें सदैव अपने देश पर, इसकी सभ्यता और संस्कृति पर गर्व करना चाहिए। आवश्यकता पड़ने पर, हमें देश के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर देने के लिए तत्पर रहना चाहिए।

भारत महिमा मुहावरा –

  • अर्थ निछावर करना – अर्पण करना, समर्पित करना।

Class 10 Hindi Lokbharti Textbook Solutions

Class 10 Hindi Chapter 7 Khula Aakash Question Answer Maharashtra Board

Std 10 Hindi Chapter 7 Khula Aakash Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Hindi Solutions Lokbharti Chapter 7 खुला आकाश Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Hindi Lokbharti 10th Digest Chapter 7 खुला आकाश Questions And Answers

Hindi Lokbharti 10th Std Digest Chapter 7 खुला आकाश Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृवियाँ कीविए:
(1) प्रहवलका पूण् कीविए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 1
उतर:

(2) कृवि पूण् कीविए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 2
उतर:

(3) आकृवि मे वलखिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 3
उतर:

Maharashtra Board Solutions

(4)
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 5
उतर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 33

(5) लखिए:
a.
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 6
उतर:

b.
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 7
उतर:

भाषा हबंदु
(1) हनम्हलखखत संहध हिचछेद की संहध कीहजए और भेद हलखखए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 8
उतर:

संधि शब्द संधि विच्छेद संधि भेद
(i) सज्जन सत् + जन व्यंजन संधि
(ii) नमस्ते नमः+ ते विसर्ग संधि
(iii) स्वागत सु + आगत स्वर संधि
(iv) दिग्दर्शक दिक् + दर्शक व्यंजन संधि
(v) यद्यपि यदि + यपि स्वर संधि
(vi) दुस्साहस दुः + साहस विसर्ग संधि

Maharashtra Board Solutions

(2) हनम्हलखखत शब् का संहध हिचछेद कीहजए और भेद हलखखए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 9
उतर:

संधि विच्छेद संधि शब्दसंधि भेद
(i) दुः +  लभ दुर्लभ विसर्ग संधि
(ii) महा +  आत्मा महात्मा स्वर संधि
(iii) अन् +  आसक्त अनासक्त स्वर संधि
(iv) अंतः +  चेतना अंतश्चेतना विसर्ग संधि
(v) सम् +  तोष संतोष व्यंजन संधि
(vi) सदा + एव सदैव स्वर संधि

(3) हनम्हलखखत आकृहत मे हदए गए शब् का हिचछेद कीहजए और संहध का भेद हलखखए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 10
उतर:

संधि शब्द संधि विच्छेद संधि भेद
(i) दिग्गज’ दिक् + गज व्यंजन संधि
(ii) सप्ताह सप्त + अह स्वर संधि
(iii) निश्चल निः + चल विसर्ग संधि
(iv) भानूदय भानु + उदय स्वर संधि
(v) निस्संदेह निः + संदेह विसर्ग संधि
(vi) सूर्यास्त सूर्य + अस्त स्वर संधि

Maharashtra Board Solutions

(4) पाठो मे आए संहध शब् छाँटकर उनका हिचछेद कीहजए और संहध का भेद हलखखए।

संधि शब्द संधि विच्छेद संधि भेद
(i) निर्जीव निः + जीव विसर्ग संधि
(ii) संभव सम् + भव व्यंजन संधि
(iii) उज्ज्व लउत् + ज्वल व्यंजन संधि

Hindi Lokbharti 10th Textbook Solutions Chapter 7 खुला आकाश Additional Important Questions and Answers

गद्यांश क्र.1
कृति 1: (आकलन)
(1) आकृति पूर्ण कीजिए:

उत्तर:

(2) उत्तर लिखिए: (बोर्ड की नमूना कृतिपत्रिका)

उत्तर:

कृति 2: (स्वमत अभिव्यक्ति)

‘बढ़ती हुई जनसंख्या का मनुष्य जीवन पर प्रभाव’ के बारे में आपके विचार 25 से 30 शब्दों में लिखिए। (बोर्ड की नमूना कृतिपत्रिका)
उत्तर:
आज लगभग सभी देशों की जनसंख्या में बढ़ोत्तरी हो रही है। यह जनसंख्या वृद्धि आज संसार के समक्ष एक समस्या बन गई है। सभी देशों के संसाधन सीमित हैं और बढ़ी हुई जनसंख्या की माँग विशाल है, जिसकी पूर्ति करना संभव नहीं है। इसी का परिणाम है कि आज लोगों के सामने बेकारी की समस्या उत्पन्न हो गई है। जनसंख्या वृद्धि के कारण कृषि पर आधारित लोग परेशान हैं। खेती योग्य जमीन बँटती जा रही है।

अब वह इतने लोगों को रोटी देने में असमर्थ हो गई है। गाँवों की आबादी का बोझ शहरों पर आ पड़ा है। यहाँ शहरों में बेकारी की समस्या है। यहाँ भी लोग रोटी, कपड़ा, मकान की समस्याओं से जूझ रहे हैं। लोग गंदी बस्तियों में रहने के लिए मजबूर हैं। न इतने लोगों के लिए ढंग की शिक्षा व्यवस्था उपलब्ध हो पा रही है और न ही चिकित्सा व्यवस्था।

बढ़ती जनसंख्या ने देश की अर्थव्यवस्था बिगाड़ दी है। इस पर अंकुश लगाकर ही इस समस्या से छुटकारा पाया जा सकता है। तभी मनुष्य के जीवन स्तर में भी सुधार हो पाएगा।

Maharashtra Board Solutions

गद्यांश क्र.2
प्रश्न.
निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)
(2) सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए:
(i) बिलकुल चुपचाप बैठकर सिर्फ ………………………… बारे में सोचें। (मेरे/अपने/सबके)
(ii) दूसरों की सोच-समझ पर ………………………… रखें। (भरोसा/प्रेम/संदेह)
(iii) ………………………… अन्य नहीं, अंतमय है, हमारे ही प्रतिरूप, हमसे अलग या भिन्न नहीं। (दूसरा /सब/वह)
(iv) ………………………… तरह सारे मनुष्य केवल मनुष्य होते और कुछ नहीं। (इसी/उसी/किसी)
उत्तर:
(2) (i) बिलकुल चुपचाप बैठकर सिर्फ अपने बारे में सोचें।
(ii) दूसरों की सोच-समझ पर भरोसा रखें।
(iii) दूसरा अन्य नहीं, अंतमय है, हमारे ही प्रतिरूप, हमसे अलग या भिन्न नहीं।
(iv) उसी तरह सारे मनुष्य केवल मनुष्य होते और कुछ नहीं।

कृति 2: (स्वमत अभिव्यक्ति)

‘आत्मचिंतन के लाभ’ विषय में अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर:
आत्मचिंतन यानी स्वयं के विषय में चिंतन करना। आत्मचिंतन का अर्थ है किसी कार्य को करने या होने के बाद उसे करने के लिए अपनाई. गई क्रिया और विचार पद्धति का विश्लेषण। आत्मचिंतन के द्वारा हमें अपनी गलतियों से सीखने, साथ ही अपने किए गए कार्य को और बेहतर ढंग से करने का मौका मिलता है। किसी भी व्यक्ति को कोई दूसरा जितना सिखा सकता है, उससे कहीं अधिक वह अपने स्वाध्याय एवं आत्मचिंतन के द्वारा सीख सकता है। इस प्रक्रिया में हम शांत भाव से बैठकर किसी समस्या या मुद्दे के बारे में चिंतन कर सकते हैं।

छात्र जीवन में तो इसकी और भी अधिक आवश्यकता है। अपनी क्षमताओं के विषय में अच्छी तरह जाने-समझे बिना हम लक्ष्य निर्धारित कर लेते हैं। शीघ्रातिशीघ्र उसे प्राप्त कर लेना चाहते हैं और बाद में भटक जाते हैं। इसलिए पहले आत्मचिंतन करें, स्वयं को जानें, फिर लक्ष्य प्राप्ति का प्रयास करें।

गद्यांश क्र. 3
प्रश्न.
निम्नलिखित पठित गद्यांश पढकर दी गई ‘सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)
(1) उत्तर लिखिए:

उत्तर:

कृति 2: (स्वमत अभिव्यक्ति)

‘जीवन की सार्थकता के विषय में अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर:
ईश्वर ने हमें सर्वश्रेष्ठ योनि अर्थात मानव योनि में जन्म दिया है। हमारा कर्तव्य है कि हम मानव जाति के लिए कुछ अच्छा कार्य करें। हमें जितनी आयु मिली है, वह समय हम अच्छे कार्यों को करने में लगाएँ। कुछ ऐसा काम करें जिससे समाज और देश का हित हो।

कुछ लोग समय की कमी की बात करते हैं। लेकिन यदि कुछ करने की लगन हो तो समय आड़े नहीं आता। स्वामी विवेकानंद 40 वर्ष की आयु से भी पहले इस संसार से चले गए। ईसा मसीह का 30 वर्ष की आयु में ही प्राणांत हो गया। रामानुजम, रानी लक्ष्मीबाई, नेपोलियन, सिकंदर और अन्य अनेक अल्पायु में ही इस असार संसार को छोड़ गए, फिर भी मानव इतिहास में, ये महापुरुष अपनी छाप छोड़ गए।

सीमित समय में भी जितना अधिक-से-अधिक अच्छा हो सके, हमें देश व समाज के कल्याण के लिए कुछ सकारात्मक अवश्य करना चाहिए।

Maharashtra Board Solutions

गद्यांश क्र. 4
प्रश्न.
निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1: (आकलन)
(1) आकृति पूर्ण कीजिए:

उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 35

(2) जोड़ियाँ मिलाइए:

 आ
(i) शौक भविष्य
(ii) एकनिष्ठ गुलाम
(ii) उज्ज्वल रास्ते
(iv) दरजनों सेवा

उत्तर:

 आ
(i) शौक रास्ते
(ii) एकनिष्ठ सेवा
(iii) उज्ज्वल भविष्य
(iv) दरजनों गुलाम

कृति 2: (स्वमत अभिव्यक्ति)

→ ‘जो हम शौक से करना चाहते हैं, उसके लिए रास्ते निकाल लेते हैं, इसका सोदाहरण अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर:
जिन कामों या चीजों का हमें शौक होता है, जिसमें हमारी रुचि होती है, उसके लिए हम समय, विधा सब निकाल लेते हैं। रुचि सफलता की वाहक है। हम सभी अपनी रुचि के कामों को करते समय उसमें डूब जाते हैं। उसी का परिणाम होता है सफलता। शिक्षा काल में जिस विषय में हमारी रुचि होती है, उसे पढ़ने में हम सारी रात भी जग लेते हैं, जबकि किसी ऐसे विषय की पुस्तक खोलते ही आँखें नींद से भर आती हैं, जो हमें पसंद न हो।

व्यायाम, तैराकी, बागवानी, चित्रकला, गायन, वादन आदि ऐसे अनेक कार्य हैं, जिनका यदि शौक हो तो मनुष्य घंटों बिताने पर भी उनसे ऊब अनुभव नहीं करता। किसी भी काम में सफलता प्राप्त करने के लिए उसमें रुचि होना परम आवश्यक है। बिना रुचि के आगे बढ़ने की संभावना बहुत कम होती है। जिस काम में हमारी रुचि होती है, उसे करने के लिए हम अपनी सारी ऊर्जा लगा देते हैं। न दिन देखते हैं, न ही रात। थकान शब्द तो मानो हमारे शब्दकोश में कभी था ही नहीं।

Maharashtra Board Solutions

→ ‘कंप्यूटर ज्ञान का महासागर’ विषय पर तर्कपूर्ण चर्चा कीजिए।
उत्तर:
कंप्यूटर इस पृथ्वी पर कल्पवृक्ष के समान है। जीवन का कोई भी ऐसा क्षेत्र नहीं है, जहाँ इसका महत्व न हो। सूचना के क्षेत्र में कंप्यूटर के कारण अद्भुत क्रांति आ गई है। इंटरनेट इसकी अनुपम देन है। दुनियाभर की जानकारी हम मिनटों में प्राप्त कर सकते हैं। यह एक सेकंड में दस हजार करोड़ गणितीय गणना कर सकता है।

चाहे मौसम का पूर्वानुमान हो या प्राकृतिक गैस और खनिज भंडारों का पता लगाना हो, रेलगाड़ियों और हवाईजहाजों का आरक्षण कराना हो या संसारभर की जानकारी प्राप्त करनी हो, कंप्यूटर के द्वारा घर बैठे हम मिनटों में कर सकते हैं। यह समय-समय पर भौगोलिक सूचनाओं से संबंधित जानकारी भी देता है। मुद्रण व प्रसारण के क्षेत्र में इसका योगदान असीमित है।

कंप्यूटर एक चालक की भाँति वायुयान का संचालन करता है। चालक के बटन दबाते ही कंप्यूटर स्वयं गति और दिशा का निर्धारण कर लेता है। शिक्षा के क्षेत्र में तो आज कंप्यूटर एक अनिवार्यता बन गया है।

→ महानगरीय/ग्रामीण दिनचर्या के लाभ तथा हानि के बारे में अपने अनुभव के आधार पर लिखिए।
उत्तर:
गाँवों में आज भी खुला आसमान है। वहाँ का वातावरण शुद्ध, प्रकृति की गोद में है, जबकि महानगरों में आसमान दिखाई नहीं पड़ता। बड़े पैमाने पर वाहनों से होने वाला प्रदूषण, लगातार होने वाला शोर, भीड़ और धुआँ असहज महसूस कराता है। भीड़भाड़, ट्रैफिक जाम, और अपराध महानगरों में रोज की बात है। गाँवों में एक प्रकार का ठहराव है। शाम ढलते ही चारों ओर एक प्रकार का सन्नाटा पसर जाता है।

जबकि, महानगरों में जीवन हर समय गतिमान रहता है। देर रात तक ऑफिस, दुकानें खुली रहती हैं। बस, ट्रेन, टैक्सियाँ, स्कूटर्स सड़कों पर दौड़ते रहते हैं। गाँवों में धूप, हरियाली और शांति का आनंद प्राप्त कर सकते हैं। लोग आज भी गर्मजोशी से मिलते हैं। एक-दूसरे के दुख-तकलीफ में काम आते हैं। महानगरों में बहुत-से लोग पड़ोसी तक को नहीं पहचानते। दोस्तों, रिश्तेदारों के लिए समय नहीं निकाल पाते।

यहाँ लोगों के पास पैसा है, सुविधाएँ हैं, पर शांति कोसों दूर है। ग्रामीण लोगों का जीवन महानगरों की भागदौड़ से दूर एवं प्रकृति के करीब होता है। दूसरी ओर महानगरों में लोग हमेशा समय को पकड़ने के लिए दौड़ते रहते हैं। अति व्यस्तता के कारण तनाव, फिर स्वास्थ्य। संबंधी विभिन्न परेशानियाँ उन्हें घेर लेती हैं।

अपवठि ग‍दयांश

नम्वलखिि पररचछे‍ पढ़कर सूचना के अनुसार कृवियाँ कीविए:

हर फकसी को आतमरक् करनी होगी, हर फकसी को अपना कत्यय करना होगा। मै फकसी की सहायता की प्राशा नही करता। मै फकसी का भी प्राह नही करता। इस दुफनया से मदद की प्र्या करने का मुझे कोई अफधकार नही है। अतीत मे फिन लोगो ने मेरी मदद की है या भफ‍व् मे भी लोग मेरी मदद करें, मेरे प्र उन सबकी करुण मौिूद है, इसका दा‍व कभी नही फकया सकता। इसीफलए मै सभी लोगो के प्र फचर कक तज ञँ।

तुमहारी पररफस्फत इतनी बुरी देखकर मै बेहद फचंफतत हँ। लेफकन यह लो फक-‘तुमसे भी जयादा दुखी लोग इस संसार मे है। मै तुमसे भी जयादा बुरी पररफस्फत मे हँ। इंग् मे सब कुछ के फलए मुझे अपनी ही िेब से खच् करना पड़ता है। आमदनी कुछ भी नही है। लंदन मे एक कमरे का फकराया हर सप्ह के फलए तीन पाउंड होता है। ऊपर से अनय कई खच् है। अपनी तकलीिो के फलए मै फकससे फशकायत करू? यह मेरा अपना कम्यल है, मुझे ही भुगतना होगा।’

(फ‍ववकानंद की आतमकथा से)

Maharashtra Board Solutions

(1) कृवि पूण् कीविए:
1.Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 11

2. Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 7 खुला आकाश 12

(2) उतिर वलखिए:
1. पररचछेद मे उखलिखत देश – [ ]
2. हर फकसी को करना होगा – [ ]
3. लेखक की तकलीिे – [ ]
4. हर फकसी को करनी होगी – [ ]

(3) वन‍देानुसार हल कीविए:
(अ) वनम्वलखिि अर् से मेलनेला शब् उपयु्थ् पररचछे‍ से ढूँढ़कर वलखिए ः
1. स्वं की रक् करना – …………………………….
2. दूसरो के उपकारो को मानने ‍वला – …………………………….

(4) लंग पहचानकर वलखिए:
1. जेब [ ]
2. साहित्य [ ]
3. दावा [ ]
4. सेवा [ ]

Maharashtra Board Solutions

खुला आकाश Summary in Hindi

विषय-प्रवेश : प्रस्तुत पाठ डायरी विधा का एक उदाहरण है। कुँवर नारायण जी ने इस पाठ के माध्यम से नगरों की भीड़, वहाँ की जीवन-शैली, जीवन के संघर्ष, आत्मचिंतन आदि पर प्रकाश डाला है। लेखक मानते हैं कि व्यक्ति के विकास में आत्मचिंतन का बड़ा महत्त्व है। इसके द्वारा हम अपनी क्षमताओं के बारे में और अधिक जान सकेंगे। साथ ही अपनी गलतियों से सीख ले सकेंगे।

Class 10 Hindi Lokbharti Textbook Solutions

Khara Nagrik Class 10 Marathi Chapter 15 Question Answer Maharashtra Board

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 15 खरा नागरिक Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 15 खरा नागरिक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 Marathi Chapter 15 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 15 खरा नागरिक Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 19

प्रश्न 2.
खालील घटनांचे परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 20

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 3.
निरंजनची दिनचर्या लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 3
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 21

प्रश्न 4.
खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

(१) अप्रामाणिक x
(२) बेसावध x
(३) हळूहळू x
(४) पास x
उत्तर:
(i) प्रामाणिक
(ii) सावध
(iii) चटकन, भरभर
(iv) नापास

प्रश्न 5.
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.

(i) स्वप्नाळू –
(ii) तार्किक विचार करणारा –
(ii) संवेदनशील –
उत्तर:
(i) स्वप्नाळू – कोकण गाडी बद्दल वाटले की ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते लगेच बोगद्यात शिरते काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला? आपण ही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला.

(ii) तार्किक विचार – त्याचं लक्ष डाव्या बाजूस रूळाखाली करणारा पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. हे छिद्र कसलं? रोज नसतं असं. प्रवाशांनी भरलेली ९.५० ची गाडी येईल तर भयंकर अपघात होईल. हा त्याने तर्कपूर्ण विचार केला.

(iii) संवेदनशील – भीषण अपघात टळण्याची बातमी वर्तमानपत्रात फोटोसह छापून आली होती. घरी मोठमोठी माणसे आली होती. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरूजीही आले. निरंजनने धावत येऊन गुरूजींचे पाय धारले. रडत रडत तो म्हणाला, गुरूजी, मी नापास होणार माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 6.
स्वमत.

(अ) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
निरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.

(आ) तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विदयार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
विद्यार्थी अनेक गुणांनी युक्त असेल तर त्याला आदर्श विद्यार्थी म्हणवला जातो. सर्वप्रथम अभ्यास, नीटनेटके अक्षर, लेखन कौशल्य अंगी असले पाहिजे. शिस्त, समयपालन, नम्रपणा याला प्राधान्य देणेही तितकेच गरजेचे आहे. अंगच्या गुणांमध्ये अभिमानी न होता विनयशील व मोठ्यांचा आदर राखणारा विद्यार्थी खरा आदर्श विदयार्थी असतो. समयसूचकता, धारिष्ट्य, दुसऱ्यांना मदत हे गुण जीवनात फार महत्त्वाचे असतात. अशा गुणांनी युक्त विद्यार्थी सर्वप्रिय होतो.

(इ) तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
उत्तरः
निरंजनला आईवडील नाहीत, त्याच्या मनातील हा सल काढून टाकण्यासाठी त्याला चांगल्या मित्राची गरज आहे. म्हणून मला निरंजनचा मित्र व्हायला आवडेल. त्याची आर्थिक परिस्थितीही कमकुवत असल्यामुळे जेवणाच्या व शिक्षणाच्या खर्चासाठी मी त्याला काही मदत करू शकतो. याचबरोबर निरंजन हा निस्वार्थी, प्रसंगावधान असलेला, हुशार, मेहनती मुलगा आहे. त्यामुळे या सर्वगुणसंपन्न निरंजनशी मैत्री करायला मला आवडेल.

खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 6
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 22
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 23

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 15 खरा नागरिक Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 7

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कोणता विषय जरा अवघडच असतो?
उत्तरः
नागरिकशास्त्र हा विषय जरा अवघडच असतो.

(ii) मामाने निरंजनला कोठे आणून सोडले?
उत्तर:
मामाने निरंजनला चिपळूणला मावशीकडे आणून सोडले

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(iii) मावशीचे घर कोठे होते?
उत्तर:
चिपळूण शहरालगतच्या उपनगरात गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी मावशीचे घर होते.

(३) कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………………… टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. (सकाळच्या, दुपारच्या, थंडीच्या, रात्रीच्या)
(ii) ………………………… गुरुजींचा सल्ला त्याला मोलाचा वाटे. (भोसले, फाटक, भडसावळे, देशमुख)
(iii) गुरुजींचंही ………………………… खूप प्रेम होतं. (सदानंदवर, निरंजनवर, अतुलवर, सचिनवर)
उत्तर:
(i) सकाळच्या
(ii) भडसावळे
(iii) निरंजनवर

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा.
(i) निरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला, कारण
(i) त्याला झोप येत नव्हती.
(ii) अभ्यास पूर्ण झाला नव्हता.
(iii) पहाटे उठायला त्याला आवडत असे.
(iv) त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.
उत्तर:
निरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला कारण त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.

प्रश्न 2.
‘मुंबईला’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
मामा कोठे निघून गेला?

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
रेडिओ : भक्तिगीत :: पक्षी : …………………………
उत्तरः
सुमधुर संगीत

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 8

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘अभ्यासासाठी पहाटेचे वातावरण पोषक असते’ यावर तुमचे विचार मांडा.
उत्तरः
‘लवकर निजे, लवकर उठे त्यास उत्तम आरोग्य लाभे’ या वचनानुसार राहाणाऱ्यांना आरोग्यप्राप्ती होतेच व आयुष्यात यशप्राप्तीही होते. लवकर उठल्याने पहाटेच्या वेळेचा सदुपयोग करता येतो. पहाटे अभ्यासही छान होतो. केलेला अभ्यास लक्षात राहातो. पहाटे गोंगाट, कलकलाट नसल्याने चित्त एकाग्र होते. पुरेशी झोप झाल्याने शरीर व मन दोन्हीही प्रफुल्लित असतात. हवेत सुखद गारवा असतो. पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पहाटेची भूपाळी, जात्यावरच्या ओव्या किंवा रेडिओवरची मधुर सनई मन प्रसन्न करते. शांततेत पाठांतर होते. मनन व चिंतन होते. पहाटे कामांची लगबग नसते, वाहनांची ये-जा नसते म्हणून मन स्थिर होण्यास वेळ लागत नाही. एकाग्र मनाने अभ्यास करता येतो.

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 9

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(i) निरंजन दुपारी कोठे जेवायला जायचा?
उत्तरः
दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा.

(ii) निरंजन कोणाच्या घरी काम करायचा?
उत्तरः
निरंजन मावशीच्या घरी काम करायचा.

(iii) परीक्षा किती वाजता सुरू होणार होती?
उत्तरः
परीक्षा साडेदहा वाजता सुरू होणार होती.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) ………………………… परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. (काकांची, मावशीची, मामाची, आत्याची)
(ii) गुरुजींवर श्रद्धा ठेवायची आणि परीक्षेत ………………………… नंबर पटकवायचा. (दुसरा, पहिला, तीसरा, चौथा)
(iii) साडेदहाची परीक्षा. त्याआधी ………………………… जायचं होतं. (देशमुखांकडे, थोरातांकडे, भडसावळे गुरुजींकडे, मावशीकडे)
उत्तर:
(i) मावशीची
(ii) पहिला
(iii) देशमुखांकडे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा.
भडसावळे गुरुजींनी निरंजनला येथे वार लावून दिले.
(i) स्वत:च्या घरी
(ii) थोरामोठ्यांच्या घरी
(iii) मुख्याध्यापकांकडे
(iv) मावशीकडे
उत्तरः
(ii) थोरामोठ्यांच्या घरी

प्रश्न 2.
सकारण लिहा.

(i) निरंजन आज मनोमन खूश होता कारण …………………………
(ii) निरंजन वार लावून जेवायचा कारण …………………………
उत्तर:
(i) आधीचे पेपर्स चांगले गेले होते.
(ii) मावशीची परिस्थिती यथातथाच होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 3.
‘गुरुजींवर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
निरंजन कोणावर श्रद्धा ठेवायचा?

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.

(i) निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा.
(ii) गुरुजींचं वाक्य लक्षात ठेवून निरंजन खेळायला जायचा.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
गरीब विद्यार्थी मित्राला तुम्ही केलेली मदत स्पष्ट करा.
उत्तरः
अक्षय हा माझ्या बालपणापासूनचा मित्र. घरची परिस्थिती यथातथाच असून तो नेटाने शिकत आहे. दिवसभर स्वत: मोलमजूरी करून तो रात्रशाळेत शिकतो. माझी आई प्रत्येक सणवाराला त्याला जेवायला बोलावते. गोडधोड खाऊ घालते.

माझ्यासारखे त्याला कपडेही घेऊन देते. माझे वडील त्याची वर्षभराची फी भरतात. मी ही जमेल तेवढी त्याला अभ्यासात मदत करतो. त्याचे वडील वाहनचालक आहेत. माझे वडील त्यांनाच गाडी चालवण्यासाठी बोलावून पगार देतात.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 10

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) शेवटची गाडी केव्हां जाते?
उत्तरः
रात्री दोन वाजता शेवटची गाडी जाते.

(ii) निरंजनला कशाचा राग येई?
उत्तर:
लोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा राग येई.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(iii) निरंजनचे लक्ष कुठे गेले?
उत्तरः
डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या मोठ्या भगदाडाकडे निरंजनचे लक्ष गेले.

(iv) निरंजनाच्या काय ध्यानी आले?
उत्तरः
कुणीतरी काँक्रिट फोडून रेल्वेचे रुळ वेडेवाकडे करून ठेवल्याचे निरंजनच्या ध्यानी आले.

प्रश्न 3.
उत्तरे लिहा.

(i) गावाबाहेर डोंगरपायथ्याशी
घर होते + निरंजनच्या मावशीचे

(ii) निरंजनला भयंकर
राग येई + लोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) आता ………………………… आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. (मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, हार्बर रेल्वे)
(ii) या ………………………… जाणं-येणं सोपं झालं होतं. (मार्गामुळं, रस्त्यामुळं, वाटेमुळं, पुलामुळं)
उत्तर:
(i) कोकण रेल्वे
(ii) पुलामुळं

प्रश्न 5.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

(i) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.
(ii) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल
(iii) धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल
(iv) निरंजनला आश्चर्य वाटलं.
उत्तर:
(i) धाधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.
(ii) निरंजनला आश्चर्य वाटलं.
(iii) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.
(iv) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील घटनांचे परिणाम लिहा.

घटना – परिणाम
(i) आता नऊ पन्नासची गाडी येईल. – धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.
(ii) जर दगड बाजूला ठेवायचे विसरलात. – तर दुसरा ठेचकाळून  जीवाला मुकेल.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 2.
सकारण लिहा –
पूर्वीसारखे या नदीच्या पाण्यात उतरून चालत चालत नदी पार करावी लागत नाही कारण –
उत्तरः
आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
निरंजनला लोकांच्याया बेफिकीर प्रवृत्तीचा. …………………………
(i) भयंकर संताप येई.
(ii) भयंकर राग येई.
(iii) भयंकर चिड येई.
(iv) भयंकर आपुलकी वाटे.
उत्तर:
निरंजनला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई.

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 11

प्रश्न 5.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) रात्री पाच वाजता शेवटची गाडी जाते.
(ii) कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

कृती ३ : स्वमत

तुमच्या खबरदारीने भावी धोका टळला असा प्रसंग तुमच्या शब्दात मांडा.
उत्तरः
आम्ही सर्व मुले मे महिन्याच्या सुट्टीत हिमाचलप्रदेशाच्या डोंगरात गिर्यारोहणासाठी गेलो होतो. नदीवरचा पूल ओलांडायचा होता. २५ जणांचा चमू घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. निसर्ग सौंदर्य न्याहाळत सर्वजण पुलावरून जात असताना माझे लक्ष पुलाच्या पुढच्या टोकाकडे गेले. दोरखंडांनी बांधलेल्या पुलाचे एक दोरखंडी टोक तुटून गेले होते. प्रसंगावधान राखून मी सर्व मुलांना मागे जाण्याचे आदेश दिले. दुसऱ्या बाजूने उतरून गावकऱ्यांना सूचित केले. पूल ताबडतोब वापरण्यासाठी बंद करण्यात आला व मोठी मनुष्यहानी टळली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे पुढील सूचनेनुसार कृती करा:
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 12
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 24

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) निरंजनने धावतच कोणाला गाठले?
उत्तर:
निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं.

(ii) निरंजनने स्टेशनमास्तरांना काय सांगितले?
उत्तर:
निरंजनने स्टेशनमास्तरांना पुलावरच्या खराब झालेल्या रूळांबद्दल सांगितले.

(iii) निरंजनने कोणती आर्जवं केली?
उत्तर:
निरंजनने आर्जवं केली की, निदान जागा पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………………… इथून खूप दूर होतं. (गाव, स्टेशन, शहर, वाडी)
(ii) ………………………… किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. (पाच-सहा, दोन-तीन, तीन-चार, सहा-सात)
उत्तर:
(i) स्टेशन
(ii) तीन-चार.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(४) कोष्टक पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 14

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील घटनांचे परिणाम लिहा.
घटना – परिणाम
परीक्षा बुडाली की – नापास

प्रश्न 2.
घटनाक्रम लिहा.

(i) निरंजनने नेमकी जागा दाखवली.
(ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
(iii) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.
(iv) निरंजन एकदम सावध झाला.
उत्तर:
(i) निरंजन एकदम सावध झाला.
(ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
(iii) निरंजनने नेमकी जागा दाखवली.
(iv) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

(i) निरंजनने क्षणभर विचार केला आणि
(अ) स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
(ब) घटनास्थळी पोहचला.
(क) गाववाल्यांना बोलवायला गेला.
(ड) शाळेत निघून गेला.
उत्तर:
निरंजनने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.

(ii) ………………………… लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.
(अ) जिल्हाधिकाऱ्याने
(ब) पोलीसांनी
(क) शिक्षकांनी
(ड) स्टेशनमास्तरांनी
उत्तर:
स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) निरंजन स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.
(ii) निरंजनचे रेल्वेने फिरायचे स्वप्न पूर्ण होणार होते.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 15

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘भावनेपेक्षा कृती श्रेष्ठ’ या विचारांवर स्वमत प्रकट करा.
उत्तरः
आपल्याला मनात काय वाटते यापेक्षा जे वाटते ते विधायक काम प्रत्यक्ष केले पाहिजे. गरिबांना मदत करावीशी वाटते. अंधांना सहारा दयावासा वाटतो; ही भावना जपणे ठिक आहे पण प्रत्यक्ष कृती करणे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आईला, आजीला, कामात मदत करणे, आजोबांची पिशवी उचलणे, बागकाम करून झाडांना पाणी घालणे इ. कितीतरी लहानमोठी कामे करण्यासारखी असतात, ती केली की मनाला समाधान मिळते म्हणून नुसतीच भावना मनात बाळगून अर्थ नाही तर कृती करणे महत्वाचे आहे. भावनेपेक्षा कृती केव्हाही श्रेष्ठच!

प्रश्न ५. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतीबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 16

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) अपघाताची पहिली खबर देणारा – निरंजन
(ii) निरंजनचा फोटो काढणारे – वार्ताहर

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(i) निरंजनने धावत पुढे जाऊन कोणाचे पाय धरले?
उत्तर:
निरंजनने धावत पुढे जाऊन भडसावळे गुरुजींचे पाय धरले.

(ii) निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश क्यायचं असे कोणी ठरवलं?
उत्तर:
निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश दयायचं असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) निरंजनचा ………………………… पेपर चुकला होता. (भूगोलाचा, गणिताचा, नागरिकशास्त्राचा, मराठीचा)
(ii) हे बघ, शाळेचे सगळे ………………………… आलेत. (शिक्षक, विदयार्थी, अधिकारी, कर्मचारी)
उत्तर:
(i) नागरिकशास्त्राचा
(ii) अधिकारी

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 17

प्रश्न 2.
कोण कोणास म्हणाले.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 18

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 3.
सकारण लिहा.

(i) निरंजनचे कौतुक झाले कारण –
उत्तर:
रेल्वेचा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला होता.

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.

(i) निरंजनला वया पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार नव्हती.
(ii) गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं, तेव्हां साऱ्यांचेच डोळे पाणावले.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

स्वाध्याय कृती

निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.

(i) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
निरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.

खरा नागरिक Summary in Marathi

खरा नागरिक पाठपरिचय

‘खरा नागरिक’ हा पाठ लेखक ‘सुहास बारटक्के’ यांनी लिहिला आहे. या पाठात शालेय विषय केवळ अभ्यासायचे नसून आचरणात आणायचे असतात, हे ‘निरंजन’ या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 25

खरा नागरिक Summary in English

“Khara Nagrik’ is written by Suhas Bartakke. He has beautifully expressed how school subjects are not simply to be studied, but are also meant for their application to daily activities. He spreads this message through a character named Niranjan.

खरा नागरिक शब्दार्थ

  • सल्ला – उपदेश – (advice)
  • चटकन – लगेच – (quickly)
  • आल्हाददायक – सुखावह, सुखद – (pleasant)
  • रीत – पद्धत – (trick)
  • मोलाचे – उपयुक्त – (valuable)
  • अपार – खूप – (a lot)
  • श्रद्धा – विश्वास – (belief)
  • लाडका – आवडता – (favourite)
  • शेण – गाईचा मल – (cow dung)
  • गोठा – गुरे बांधण्याची जागा – (cow shed)
  • यथातथा – बेताचा – (below average)
  • प्रगती – सुधारणा – (progress)
  • उजळणी – मनन, चिंतन – (revision)
  • बेफिकीर – निष्काळजी – (carelessness)
  • जाणीवपूर्वक – मुद्दाम – (deliberately)
  • प्रवृत्ती – मानसिकता – (attitude)
  • दिमाख – ऐट – (pomp)
  • बोगदा – डोंगराच्या पोटातून आरपार केलेला मार्ग – (a tunnel)
  • भगदाड – जमिनीत, भिंतीत – (a large पडलेला खड्डा : uneven hole)
  • क्षणभर – थोड्या वेळासाठी – (for a moment)
  • घातपात – अपघात – (casualty)
  • कट – कारस्थान – (plan)
  • उपद्व्याप – कारभार – (fright work)
  • किंकाळ्या – कर्कश आवाज – (cheerfulness)
  • अपुरे – अपूर्ण – (incomplete)
  • स्फोट – ब्लास्ट – (blast)
  • आर्जव – विनंती – (request)
  • तथ्य – अर्थ – (reason)
  • नेमकी – योग्य – (appropriate)
  • दीर्घकाळ – खूपवेळा – (a long time)
  • पंचनामा – शहानिशा – (scrutiny)
  • गांभीर्य – महत्त्व – (seriousness)
  • चाणाक्ष – धूर्त, बुद्धिमान – (adroit)
  • कौतुक – वाहवा, प्रशंसा – (appreciation)
  • निराश – उदास – (disappointed)
  • सवलती – सोयी – (facilities)
  • रद्द – बाद – (to cancel)
  • वार्ताहर – बातमीदार – (reporter)
  • स्तुती – प्रशंसा – (appreciation)
  • भीषण – भयंकर – (fierce, dire)
  • जिल्हाधिकारी – (District Collector)
  • खास बाब – विशिष्ट गोष्ट – (special case)
  • वसतिगृह – छात्रालय – (hostel)

खरा नागरिक वाक्प्रचार

  • मोलाचा वाटणे – महत्वाचा वाटणे, उपयुक्त वाटणे
  • वार लावून जेवणे – अगोदर ठरवल्याप्रमाणे दररोज एकेकाच्या घरी जेवायला जाणे.
  • जीवाला मुकणे – मृत्यू पावणे
  • हुरळून जाणे – आनंदी होणे
  • कानठळ्या बसणे – अती मोठ्या आवाजाचा त्रास होणे
  • कानात घूमणे – वारंवार तेच ऐकू येणे
  • ताब्यात देणे – हवाली करणे, सोपविणे
  • हृदयाशी धरणे – प्रेमाने जवळ घेणे
  • डोळे पाणावणे – आनंदाश्रू येणे
  • यथातथा असणे – बेताचा असणे
  • तथ्य वाटणे – अर्थ असणे
  • मनोमन खूश होणे – मनात आनंद वाटणे

Marathi Akshar Bharati Class 10th Digest 

Class 10 Hindi Chapter 10 Budhi Kaki Question Answer Maharashtra Board

Std 10 Hindi Chapter 10 Budhi Kaki Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी Notes, Textbook Exercise Important Questions, and Answers.

Hindi Lokbharti 10th Digest Chapter 10 बूढ़ी काकी Questions And Answers

Hindi Lokbharti 10th Std Digest Chapter 10 बूढ़ी काकी Textbook Questions and Answers

कृति

(कृतिपत्रिका के प्रश्न 3 (अ) के लिए

* सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए :

प्रश्न 1.

 स्वभाव के आधार पर पात्र का नाम
१. क्रोधी ………………….
२. लालची ………………….
३. शरारती ………………….
४. स्नेहिल ………………….

उत्तर:

 स्वभाव के आधार पर पात्र का नाम
१. क्रोधीरूपा
२. लालचीबुद्धिराम
३. शरारतीदोनों लड़के
४. स्नेहिललाड़ली

प्रश्न 2.
कृति पूर्ण कीजिए:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 1
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 17

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 3.
बुद्धिराम का काकी के प्रति दुर्व्यवहार दर्शाने वाली चार बातें :
१) ………………….
४) ………………….
२) ………………….
४) ………………….
उत्तर :
(i) बूढ़ी काकी की संपत्ति अपने नाम लिखाते समय किए गए लंबे-चौड़े वादों को बुद्धिराम द्वारा न निभाना।
(i) बूढ़ी काकी को भरपेट भोजन न देना।
(iii) भोजन कर रहे मेहमानों के बीच रेंगती हुई बूढ़ी काकी के पहुँच जाने पर बुद्धिराम द्वारा निर्दयतापूर्वक पकड़कर उनकी कोठरी में ले जाकर पटक देना।
(iv) बूढ़ी काकी के व्यवहार से रुष्ट होने के कारण तिलक उत्सव में सभी मेहमानों और घरवालों के भोजन कर लेने के बाद भी बुद्धिराम द्वारा उन्हें खाने के लिए न पूछना।

प्रश्न 4.
कारण लिखिए :
a. बूढ़ी काकी ने भतीजे के नाम सारी संपत्ति लिख दी _____________________
b. लाड़ली ने पूड़ियाँ छिपाकर रखीं _____________________
c. बुद्धिराम ने काकी को अँधेरी कोठरी में धम से पटक दिया _____________________
d. अंग्रेजी पढ़े नवयुवक उदासीन थे _____________________
उत्तर:
a. बूढ़ी काकी के परिवार में अब एक भतीजे के सिवाय और कोई नहीं था, इसलिए उन्होंने भतीजे के नाम सारी संपत्ति लिख दी।
b. बुद्धिराम और रूपा दोनों ने ही बूढ़ी काकी को उनकी निर्लज्जता के लिए दंड देने का निश्चय कर लिया था। इसलिए बूढ़ी काकी को किसी ने नहीं पूछा।
c. बूढ़ी काकी रेंगती हुई भोजन कर रहे मेहमान मंडली के बीच पहुँच गई थी। इससे कई लोग चौंककर उठ खड़े हुए थे। बुद्धिराम को इससे गुस्सा आया और उसने काकी को वहाँ से उठाकर कोठरी में ले जाकर धम से पटक दिया।
d. अंग्रेजी पढ़े नवयुवक उदासीन थे, क्योंकि वे गँवार मंडली में बोलना अथवा सम्मिलित होना अपनी प्रतिष्ठा के प्रतिकूल समझते थे।

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 5.
सूचना के अनुसार शब्द में परिवर्तन कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 2
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 30

अभिव्यक्ति

‘बुजुर्ग आदर-सम्मान के पात्र होते हैं, दया के नहीं इस सुवचन पर अपने विचार लिखिए।
उत्तर :
हमें यह बात याद रखनी चाहिए कि आज जो व्यक्ति बुजुर्ग है वह हमेशा बूढ़ा और असहाय नहीं था। वह भी पहले युवा था। उसने अपने परिवार का पालन-पोषण और उसकी देखरेख की थी। उसने तरह-तरह की समस्याओं का सामना किया था और उन्हें अपने तरीके से हल किया था। उसे जीवन जीने का अनुभव है। लेकिन वृद्ध हो जाने पर किसी-किसी परिवार में बुजुर्गों को किनारे कर दिया जाता है। उनकी सलाह या सुझाव को कोई महत्त्व नहीं दिया जाता। इस तरह के व्यवहार से बुजुर्गों को अपने सम्मान पर ठेस लगती महसूस होती है।

किसी-किसी परिवार में तो बुजुर्गों के खाने-पीने की भी किसी को चिंता नहीं रहती। घर के लोग अपने में मगन रहते हैं और बुजुर्गों का कोई ख्याल नहीं रखता। बुजुर्गों को खाने-पीने के लिए उनका मुँह ताकना पड़ता है। हमें यह बात नहीं भूलनी चाहिए कि हम इन बुजुर्गों की संतान हैं। उनको पर्याप्त सम्मान देना और उनकी हर प्रकार से देखरेख करना हमारा फर्ज है। बुजुर्गों की प्रसन्नता और उनके आशीर्वाद से ही परिवार फूलता-फलता और खुशहाल रहता है। इसलिए बुजुर्गों को हमें सदा आदर-सम्मान देना चाहिए और उनकी देखरेख करनी चाहिए।

भाषा बिंदु

प्रश्न 1.
निम्नलिखित क्रियाओं के प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए :

मूल क्रिया प्रथम प्रेरणार्थक रूप द्वितीय प्रेरणार्थक रूप
भूलना ………………………. ……………………….
पीसना ………………………. ……………………….
माँगना ………………………. ……………………….
तोड़ना ………………………. ……………………….
बेचना ………………………. ……………………….
कहना ………………………. ……………………….
नहाना ………………………. ……………………….
खेलना ………………………. ……………………….
खाना ………………………. ……………………….
फैलना ………………………. ……………………….
बैठना ………………………. ……………………….
लिखना ………………………. ……………………….
जुटना ………………………. ……………………….
दौड़ना ………………………. ……………………….
देखना ………………………. ……………………….
जीना ………………………. ……………………….

उत्तर :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 31

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 2.
पठित पाठों से किन्हीं दस मूल क्रियाओं का चयन करके उनके प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप निम्न तालिका में लिखिए :

मूल क्रिया प्रथम प्रेरणार्थक रूप द्वितीय प्रेरणार्थक रूप
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….
………………………. ………………………. ……………………….

उत्तर :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 32
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 33

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

उपयोजित लेखन

मेरा प्रिय वैज्ञानिक’ विषय पर निबंध लेखन कीजिए।
उत्तर :
यों तो दुनिया में एक-से-एक बड़े वैज्ञानिक हैं, पर मेरे प्रिय वैज्ञानिक तो सर जगदीशचंद्र बोस ही हैं। सर जगदीशचंद्र बोस की बात ही निराली है। उन्होंने यह सिद्ध करके बता दिया कि पेड़-पौधे भी हमारी तरह साँस लेते हैं और उन्हें पानी और भोजन की आवश्यकता होती है। उनमें भी जान होती है। यदि पेड़-पौधों को सताया या कष्ट दिया जाए, तो वे बीमार हो जाते हैं और उनकी प्रकृति के विरुद्ध उन्हें भोजन दिया जाए अथवा जहरीला रसायन दिया जाए, तो वे मर जाते हैं। वैसे पेड़-पौधों के संपर्क में रहने वाले प्रत्येक व्यक्ति को मालूम होता है कि पेड़-पौधों को नुकसान पहुँचाने या विषैले पदार्थों के संपर्क में आने से वे क्षतिग्रस्त या मृत हो सकते हैं, पर इस बात को सिद्ध किया था सर जगदीशचंद्र बोस ने।

अपने शोध को सिद्ध करने के लिए उन्होंने खुद चुंबकीय क्रेश्कोग्राफ नामक यंत्र तैयार किया। उन्होंने इस यंत्र की सहायता से सब के सामने अपने प्रयोग से यह सिद्ध कर दिया कि पेड़-पौधों में जीवन होता है और प्राणियों की तरह उनमें भी विभिन्न क्रियाएँ होती हैं। इस प्रकार के सूक्ष्म रहस्य का उद्घाटन करने वाले वे पहले वैज्ञानिक थे। वे सच्चे अर्थों में एक महान वैज्ञानिक थे। ऐसे महान वैज्ञानिक पर हमें गर्व है।

Hindi Lokbharti 10th Textbook Solutions Chapter 10 बूढ़ी काकी Additional Important Questions and Answers

गद्यांश क्र.1
प्रश्न. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए :

कृति 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 3
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 4
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 6
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 7

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 2.
उत्तर लिखिए :
(i) बूढ़ी काकी का शारीरिक स्वास्थ्य –
(ii) बूढ़ी काकी के परिवार में अब बचा एकमात्र सदस्य –
(iii) बुद्धिराम ने इस तरह लिखाई बूढ़ी काकी की संपत्ति –
(iv) बूढ़ी काकी के रोने का ढंग –
उत्तर:
(i) बूढ़ी काकी के नेत्र, हाथ, पैर आदि सभी अंग जवाब दे चुके थे।
(ii) उनका भतीजा बुद्धिराम।
(iii) खूब लंबे-चौड़े वादे करके।
(iv) बूढ़ी काकी गला-फाड़कर रोती थीं।

प्रश्न 3.
आकृति में दिए गए रिक्त स्थानों में उत्तर लिखकर आकृति पूर्ण कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 5
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 8

कृति 2 : (स्वमत अभिव्यक्ति)

प्रश्न.
बुढ़ापा बहुधा बचपन का पुनरागमन होता है’ इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में व्यक्त कीजिए।
उत्तर :
कहते हैं, बुढ़ापा बचपन का ही एक रूप है। वृद्धावस्था : में मनुष्य की हरकतें बच्चों जैसी हो जाती हैं। इस अवस्था में मनुष्य के अंग-प्रत्यंग कमजोर हो जाते हैं और उन्हें बच्चों की तरह दूसरों का सहारा लेना पड़ता है। दिमाग कमजोर हो जाता है। दाँत गिर जाते हैं और मनुष्य का मुँह बच्चों की तरह पोपला हो जाता है। इतना ही नहीं, बच्चों की तरह ही वृद्धों को भी मान-अपमान की परवाह नहीं होती। जिस तरह लोग बच्चों की बातों पर ध्यान नहीं देते, उसी तरह वृद्धों की बातों पर भी कोई ध्यान नहीं देता। उनकी इच्छा-अनिच्छा का भी कोई महत्त्व नहीं होता। इस तरह वृद्धावस्था और बचपन की अधिकांश बातों में समानता होती है। इसलिए कहा जा सकता है कि बुढ़ापा बहुधा बचपन का पुनरागमन होता है।

गद्यांश क्र.2
प्रश्न. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए :

कृति 1 : (आकलन)

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 9
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 11
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 12

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 2.
आकृति पूर्ण कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 10
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 13

प्रश्न 3.
कारण लिखिए :
(i) उत्सव के दिन बूढ़ी काकी को अपनी स्थिति पर रोना आया, पर वे रो नहीं सकीं।
उत्तर:
(i) उत्सव के दिन बूढ़ी काकी को अपनी स्थिति पर रोना आया, पर वे रो नहीं सकीं, क्योंकि उन्हें रूपा का डर था।

प्रश्न 4.
त्तर लिखिए :
मुखराम के तिलक उत्सव की तैयारियाँ :
उत्तर:
मुखराम के तिलक उत्सव की तैयारियाँ :
(i) पूड़ियाँ-कचौड़ियाँ निकल रही थीं।
(ii) एक बड़े हंडे में मसालेदार तरकारी पक रही थी।

कृति 2 : (स्वमत अभिव्यक्ति)

प्रश्न.
‘बुढ़ापा तृष्णा रोग का अंतिम समय है’ इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर :
मनुष्य के जीवन की चार अवस्थाएँ होती हैं – बचपन, किशोरावस्था, युवावस्था और बुढ़ापा। अपने जीवन में मनुष्य की तरह-तरह की कामनाएँ होती हैं और उनकी पूर्ति करने का वह भरसक प्रयास करता है। बचपन से लेकर युवावस्था तक मनुष्य को अपनी कामनाओं की जल्द से जल्द पूरी होने की उतनी चिंता नहीं रहती, जितनी बुढ़ापे में। वृद्धावस्था में मनुष्य के जीवन के गिने-चुने वर्ष ही बचे होते हैं। इसलिए उसका प्रयास यह होता है कि अपने बचे-खुचे दिनों में वह अपनी सारी कामनाएं पूरी कर ले। ऐसे में उसे किसी भी तरह अपने उद्देश्य को पूरा कर लेना उचित जान पड़ता है। उसके लिए उसे बुरे-भले, मान-अपमान की परवाह नहीं होती। उसका लक्ष्य येनकेन प्रकारेण अपनी इच्छा पूरी करना होता है। इस प्रकार बुढ़ापा तृष्णा रोग का अंतिम समय है।

गद्यांश क्र.3
प्रश्न. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए:

कृति 1 : (आकलन)

प्रश्न 1.
उत्तर लिखिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 15
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 18
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 19

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 2.
आकृति पूर्ण कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 16
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 20

कृति 2 : (स्वमत अभिव्यक्ति)

प्रश्न.
‘लड़कों का बूढों से स्वाभाविक विवेष होता ही है’ इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर :
लड़कों और बूढ़ों के बीच पीढ़ियों का अंतर होता है। लड़कों और बूढ़ों में हर बात को लेकर अंतर होना स्वाभाविक है। अधिकांश बूढ़ों की आदत होती है कि वे हर बात को अपने ढंग से सोचते हैं। वे उसमें अपने जमाने की विचारधारा थोपने की कोशिश करते हैं। इसका कारण यह है कि किसी चीज के बारे में उनकी एक धारणा बनी होती हैं। हर बात को वे अपने पैमाने पर कसने की कोशिश करते हैं। जब कि नई पीढ़ी के लड़कों की सोच अलग ढंग की होती हैं। उन्हें पुराने दकियानूसी विचार पसंद नहीं आते। इसलिए बात-बात पर दोनों के विचारों में टकराव होता है। इस तरह लड़कों और बूढ़ों में स्वाभाविक विद्वेष होता है।

गद्यांश क्र. 4
प्रश्न. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई । सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए :

कृति 1 : (आकलन)

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 21
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 23

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 2.
उत्तर लिखिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 22
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 24

प्रश्न 3.
कारण लिखिए :
(i) घरवालों ने भोजन किया, परंतु बूढ़ी काकी को किसी ने नहीं पूछा –
(ii) रात के ग्यारह बज गए थे। लाड़ली की आँखों में नींद न थी –
उत्तर:
(i) लाड़ली उन पूड़ियों को बूढ़ी काकी के पास ले जाना चाहती थी, ताकि वे उन्हें खा सके।
(ii) बूढ़ी काकी को पूड़ियाँ खिलाने की खुशी लाड़ली को सोने न देती थी।

गद्यांश क्र.5
प्रश्न. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए :

कृति 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 25
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 26
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 27
Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी 28

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

प्रश्न 2.
कारण लिखिए :
(i) रूपा का हृदय सन्न हो गया –
(ii) रूपा बैठी स्वर्गीय दृश्य का आनंद लेने में निमग्न थी –
उत्तर:
(i) रूपा का हृदय सन्न हो गया, क्योंकि उसने देखा कि बूढ़ी काकी पत्तलों पर से पूड़ियों के टुकड़े उठा-उठाकर खा रही हैं।
(ii) रूपा बैठी स्वर्गीय दृश्य का आनंद लेने में निमग्न थी, क्योंकि बूढ़ी काकी भोले बच्चों की तरह सब कुछ भूलकर बैठी हुई खाना खा रही थीं और उनके एक-एक रोएँ से सच्ची सदिच्छाएँ निकल रही थीं।

प्रश्न 3.
रिश्ता पहचानिए :
(i) बूढ़ी काकी, रूपा की लगती हैं –
(ii) रूपा, बूढ़ी काकी की लगती हैं –
उत्तर:
(i) बूढ़ी काकी, रूपा की लगती हैं – चचेरी सास।
(ii) रूपा, बूढ़ी काकी की लगती है – बहू।

कृति 2 : (स्वमत अभिव्यक्ति)

प्रश्न.
शादी-ब्याह अथवा पारिवारिक समारोहों में प्रीतिभोज में अनाप-शनाप खर्च करना कितना उचित’ विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए।
उत्तर :
हमारे देश में शादी-ब्याह तथा छोटे-मोटे पारिवारिक समारोहों में प्रीतिभोज में लोगों को खिलाने-पिलाने की पुरानी परंपरा चली आ रही है। समर्थ व्यक्तियों को इस तरह का खर्च करना ज्यादा नहीं अखरता, पर आर्थिक दृष्टि से कमजोर लोगों के लिए इस तरह के ३ खर्च का भार उठाना मुश्किल होता है। पर सामाजिक बंधनों तथा अपने ३ नाम के लिए ऐसे समारोह आयोजित करना आज एक फैशन हो गया । हैं। यह फैशन दिनोदिन बढ़ता ही जा रहा है। कुछ लोग तो अपनी प्रतिष्ठा बढ़ाने के लिए कर्ज लेकर लोगों को बुलाकर खिलाते-पिलाते ३ हैं। बाद में यह कर्ज चुकाना उनके लिए समस्या बन जाता है और उन्हें अपनी जायदाद बक बेचनी पड़ जाती है। लोगों को इस तरह के उत्सवों में अनावश्यक रूप से पैसे उड़ाने से बाज आना चाहिए। इस तरह के उत्सवों-समारोहों में अनाप-शनाप खर्च करना अपने ऊपर एक तरह का आर्थिक बोझ लादना है, जिससे कोई लाभ नहीं होता।

उपक्रम/कृति/परियोजना

श्रवणीय
बड़ों से कोई ऐसी कहानी सुनिए जिसके आखिरी हिस्से में कठिन परिस्थितियों से जीतने का संदेश मिल रहा हो।

संभाषणीय
वृद्धाश्रम’ के बारे में जानकारी इकट्ठा करके चर्चा कीजिए।

लेखनीय
‘भारतीय कुटुंब व्यवस्था’ पर भाषण के मुद्दे लिखिए।
उत्तर:
भारतीय कुटुंब व्यवस्था के मुद्दे :

  • कुटुंब किसे कहते हैं?
  • प्राचीन भारतीय कुटुंब।
  • आधुनिक कुटुंब।
  • कुटुंब व्यवस्था में बदलाव के कारण।
  • कुटुंब व्यवस्था के आधार।
  • कुटुंब बनने-टूटने के कारण।
  • कुटुंब की आवश्यकता।
  • संयुक्त कुटुंब एवं एकल कुटुंब से लाभ-हानि।
  • वसुधैव कुटुंबकम्।

Maharashtra Board Class 10 Hindi Solutions Chapter 10 बूढ़ी काकी

पठनीय
‘चलती-फिरती पाठशाला’ उपक्रम के बारे में जानकारी इकट्ठी करके पढ़िए और सुनाइए।

बूढ़ी काकी Summary in Hindi

विषय – प्रवेश : ‘बूढ़ी काकी’ कथा उन दयनीय व्यक्तियों की व्यथा है, जिन्हें परिस्थितिवश मजबूरी में अपनी पूरी संपत्ति किसी अन्य व्यक्ति को सौंपनी पड़ती है और खुद उसकी दया पर जीना पड़ता है। बूढ़ी काकी अपने पति और जवान बेटों की मृत्यु के पश्चात अपने एकमात्र भतीजे बुद्धिराम के वादों पर विश्वास करके अपनी सारी संपत्ति उसके नाम लिख देती हैं। लेकिन थोड़े दिनों के बाद ही ऐसी स्थिति हो जाती है कि उसे पेट भर भोजन मिलना भी मुश्किल हो जाता है। एक बार तो बूढ़ी काकी के जीवन में ऐसी घटना घटती है, जिसके बारे में जानकर दिल दहल उठता है।

बुद्धिराम के बेटे के तिलक समारोह में सभी मेहमान और घर के सभी लोग भोजन कर सोने चले जाते हैं, पर बूढ़ी काकी को खाने के लिए कोई नहीं पूछता। भूख से व्याकुल बूढ़ी काकी रात के अंधेरे में कूड़े में फेंकी गई पत्तलों पर छूटे जूठन को बीन–बीनकर खाकर अपना पेट भरती हैं। बुद्धिराम की पत्नी रूपा यह दृश्य देखती है, तो उसकी रूह काँप उठती है और वह इस अधर्म के लिए ईश्वर से क्षमा करने की प्रार्थना करती है और बूढ़ी काकी को परोसकर भरपेट भोजन कराती है और उससे अपनी भूल के लिए बुरा न मानने के लिए कहती है।

बूढ़ी काकी मुहावरे – अर्थ

  • सब्जबाग दिखाना – बड़े–बड़े झूठे वादे करना।
  • गला फाड़ना – शोर करना, चिल्लाना।
  • लाले पड़ना – किसी चीज के लिए तरसना।
  • उबल पड़ना – क्रोधित होना।
  • पानी उतर जाना – बेइज्जत होना।
  • होंठ चाटना – कोई स्वादिष्ट पदार्थ अधिक खाने की इच्छा रखना।
  • कलेजे में हूक सी उठना – मन में दुख होना।
  • कलेजा पसीजना – दया आना।
  • हृदय सन्न रह जाना – घोर आश्चर्य में डूब जाना।
  • छाती पर सवार होना – सामने अड़े रहना।
  • दम घुटना – हवा की कमी के कारण या गर्मी की अधिकता से साँस रुकना।

Class 10 Hindi Lokbharti Textbook Solutions